शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

गोगलगायने शेकडो एकरवरील सोयाबीन केलं फस्त, तिबार पेरणी करूनही शेतकऱ्यांचे हात रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 19:25 IST

शेतकऱ्यांचा कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप 

- सुनील घोडकेखुलताबाद: खुलताबाद तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीन पिकावर लाखो गोगलगायींनी चांगलाच हल्ला चढविला आहे. गोगलगायने शेकडो एकरवरील सोयाबीन पीक फस्त केल्याने दुबार-तिबार पेरणी करूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. 

यंदाच्या वर्षी पावसाचे उशिरा आगमन झाल्याने खरीपाच्या पेरण्या उशिरा झाल्या आहेत. खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांची पेरणी केली. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून लाखो गोगलगायी शेकडो एकरवरील सोयाबीन पिकावर हल्ला चढवून उभे पिक फस्त करत आहेत. दुबार- तिबार पेरणी करूनही हाती काहीच लागत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथील शेतकरी साहेबरा पुंजाजी श्रीखंडे यांनी तीनदा पेरणी केलेली सोयाबीन गोगलगायींनी फस्त केली आहे. मावसाळा येथील सोमीनाथ गोरे, विजय श्रीखंडे, मनोहर श्रीखंडे, कारभारी यादव वरकड, सोमीनाथ वरकड, संतोष गवळी, कैलास वरकड या शेतक-यांनी सोयाबीनची दुबार पेरणी करूनही सोयाबीन गोगलगायींच्या तावडीतून वाचवू शकले नाही. गोगलगायीचा धुमाकूळ गेल्या दीड महिन्यापासून सुरूच असल्याने अनेक शेतक-यांनी सोयाबीन काढून बाजरी तूरीची लागवड केली आहे. 

कृषी विभागाचे दुर्लक्षमावसाळा परिसरात गेल्या दीड महिन्यापासून गोगलगायी सोयाबीन पिकांवर तुटून पडल्या आहेत. उभी पिके या गोगलगायीनी फस्त केली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तोंडी कल्पना देवूनही गोगलगायीचा नायनाट करण्याबाबत मार्गदर्शन होत नसल्याचे मावसाळा येथील त्रस्त शेतकरी सोमीनाथ गोरे यांनी सांगितले. 

तिबार केली पेरणीगोगलगायीने सोयाबीन पिकावर चांगलाच ताव मारला. तिनदा सोयाबीन लावले पंरतू गोगलगायी कोवळी सोयाबीन फस्त करत असल्याचे मावसाळा येथील शेतकरी साहेबराव श्रीखंडे यांनी सांगितले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी