शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गोगलगायने शेकडो एकरवरील सोयाबीन केलं फस्त, तिबार पेरणी करूनही शेतकऱ्यांचे हात रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 19:25 IST

शेतकऱ्यांचा कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप 

- सुनील घोडकेखुलताबाद: खुलताबाद तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीन पिकावर लाखो गोगलगायींनी चांगलाच हल्ला चढविला आहे. गोगलगायने शेकडो एकरवरील सोयाबीन पीक फस्त केल्याने दुबार-तिबार पेरणी करूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. 

यंदाच्या वर्षी पावसाचे उशिरा आगमन झाल्याने खरीपाच्या पेरण्या उशिरा झाल्या आहेत. खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांची पेरणी केली. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून लाखो गोगलगायी शेकडो एकरवरील सोयाबीन पिकावर हल्ला चढवून उभे पिक फस्त करत आहेत. दुबार- तिबार पेरणी करूनही हाती काहीच लागत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथील शेतकरी साहेबरा पुंजाजी श्रीखंडे यांनी तीनदा पेरणी केलेली सोयाबीन गोगलगायींनी फस्त केली आहे. मावसाळा येथील सोमीनाथ गोरे, विजय श्रीखंडे, मनोहर श्रीखंडे, कारभारी यादव वरकड, सोमीनाथ वरकड, संतोष गवळी, कैलास वरकड या शेतक-यांनी सोयाबीनची दुबार पेरणी करूनही सोयाबीन गोगलगायींच्या तावडीतून वाचवू शकले नाही. गोगलगायीचा धुमाकूळ गेल्या दीड महिन्यापासून सुरूच असल्याने अनेक शेतक-यांनी सोयाबीन काढून बाजरी तूरीची लागवड केली आहे. 

कृषी विभागाचे दुर्लक्षमावसाळा परिसरात गेल्या दीड महिन्यापासून गोगलगायी सोयाबीन पिकांवर तुटून पडल्या आहेत. उभी पिके या गोगलगायीनी फस्त केली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तोंडी कल्पना देवूनही गोगलगायीचा नायनाट करण्याबाबत मार्गदर्शन होत नसल्याचे मावसाळा येथील त्रस्त शेतकरी सोमीनाथ गोरे यांनी सांगितले. 

तिबार केली पेरणीगोगलगायीने सोयाबीन पिकावर चांगलाच ताव मारला. तिनदा सोयाबीन लावले पंरतू गोगलगायी कोवळी सोयाबीन फस्त करत असल्याचे मावसाळा येथील शेतकरी साहेबराव श्रीखंडे यांनी सांगितले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी