शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले; आधी पिके गेली आता वीज कोसळून १५ जनावरे दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 16:20 IST

rainfall in Aurangbad : दोन वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांची १५ जनावरे दगावली

कन्नड ( औरंगाबाद ) : तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज कोसळल्याने चार शेतकऱ्यांची १५ पाळीव जनावरे मृत्युमुखी पडल्याची घटना आज दुपारी घडली. एका ठिकाणी यात १ बैल, ७ गाई, ३ गोऱ्हे व वासरू तर दुसऱ्या ठिकाणी दोन म्हशी व व वगारू दगावले आहे. ( 15 animals were killed due to lightning ) आधीच अतिवृष्टीने ( Heavy rainfall in Aurangabad ) कंबरडे मोडलेला शेतकरी या अपघाती घटनेमुळे हतबल झाला आहे.

अतिवृष्टीने हातची पिके गेल्याने शेतकरी मोडून पडला आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांची भिस्त पशुधनावर आहे. जेहूर - ठाकूरवाडी व उंबरखेडा येथील काही शेतकरी गायरानात आपली जनावरे चरण्यासाठी घेऊन गेली होती. दरम्यान, दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. यावेळी जेहूर - ठाकूरवाडीजवळ गट नंबर ७० मधील गायरानात वीज कोसळली. यात शिवराम मेंगाळ यांचे ३ (२ गाय व वासरू), पुंजाराम मधे यांचे ८ (५ गाय ३ वासरु) व अंबादास मेंगाळ यांचा १ बैल दगावला. तर दुसऱ्या घटनेत उंबरखेडा येथील अविनाश नामदेव निकम यांच्या शेतात (गट क्र ६१) सुद्धा वीज कोसळल्याने दोन म्हशी व एक वगारु मृत झाले.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादRainपाऊस