शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

कापसाच्या थप्पीने त्वचेचे आजार; कमी भावात तरी कसा विकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 11:50 IST

लग्नसराई सुरू झाल्याने शेतकऱ्यांना खर्चासाठी कापूस विक्री करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

छत्रपती संभाजीनगर : गतवर्षीप्रमाणे आताही कापसाचे दर वाढले नाहीत. कापसाच्या दरवाढीची आशा मावळल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. भाववाढीच्या अपेक्षेने मागील चार महिन्यांपासून घरात कोंबून ठेवलेल्या कापसातील पिसवा, अळी आणि अन्य कीटकांमुळे शेतकऱ्यांना विविध त्रासांना सामोरे जावे लागत आहे. काही शेतकऱ्यांच्या अंगावर पुरळ येत आहे तर काहींच्या संपूर्ण शरीराला खाज येते.

दोन रूमचे घर; एक खोली कापसाने पॅकग्रामीण भागातील प्रत्येक गावात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे केवळ दोन रूमचे घर असते. यातील एका खोलीत ते कापूस ठेवतात तर दुसऱ्या खोलीत संसारोपयोगी साहित्य ठेवतात. कापसाने पॅक झालेल्या खोलीत शेतकऱ्यांना झोपावे लागते.

उंदीर अन् विस्तवाचा धोकाघरात कोंबून ठेवलेल्या कापसाला आग आणि उंदरांचा धोका असतो. यामुळे या दोन्हींपासून कापसाचे संरक्षण करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.

भाव ७ हजारांच्या पुढे सरकला नाहीजिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामातील कापसाचे क्षेत्र ७५ टक्क्यांवर असते. गतवर्षी ७ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर कापसाला मिळाला नाही. यंदाही कापसाचा दर ७ हजारांच्या पुढे सरकलाच नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

अंगाला खाज; बालके हैराणकापसाच्या थप्पीवर प्राण्याच्या अंगावर असतात तशा पिसवा, अन्य बारीक किडे असतात. हे किडे शेतकऱ्यांना आणि त्यांच्या मुलांना चावतात. यामुळे अंगाला खाज येणे, पुरळ येण्याचा प्रकार होतो.

कापसाने संक्रांत आणलीकापसाचा सिझन सुरू झाला तेव्हापासून कापसाचा दर ७ हजारांपर्यंतच आहे. संक्रांतीनंतर कापसाचे दर वाढतील, या आशेपोटी मागील चार महिन्यांपासून शेतकऱ्यांनी घरात कापूस कोंबून ठेवला होता. मात्र, कापसावरच संक्रांत आल्याचे दिसून येते.

लग्नसराईने चणचण, आता विकावाच लागणारलग्नसराई सुरू झाल्याने शेतकऱ्यांना खर्चासाठी कापूस विक्री करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. शिवाय कापसाचा दर वाढत नसल्याने गतवर्षी वर्षभर कापूस सांभाळून काही लाभ झाला नव्हता. यामुळे शेतकऱ्यांनी आता कापसाची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

कापूस विकण्याचा निर्णय कापसाचे दर वाढतील या आशेपोटी आम्ही घरात कापूस कोंबून ठेवला आहे. आता या कापसातील किडे रोज चावतात. यामुळे कापूस विकण्याचा निर्णय घेतला.- रामदास पाटील, शेतकरी

सध्या तरी ७ हजारांपर्यंतच दरसीसीआयचा दर ७ हजारपर्यंतच आहे. शिवाय खासगी जिनिंगवर कापूस याच दराने खरेदी केला जातो. यामुळे आम्ही शेतकऱ्यांकडून ६८०० ते ७००० रुपये क्विंटल दराने कापूस खरेदी करतो.- लक्ष्मणराव जाधव, व्यापारी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFarmerशेतकरीcottonकापूस