शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

साहेब, चपरासीसुद्धा फिरकला नाही; अतिवृष्टीग्रस्त शेतकरी ढसाढसा रडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 11:38 IST

आता तोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे शेवटच्या टप्प्यात परतीच्या अतिवृष्टीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा जवळपास शंभर टक्के खर्च करून झालेला होता

औरंगाबाद - जिल्ह्यातील करमाड तालुक्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांचा अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त क्षेत्रात पीक पाहणी दौरा सुरू आहे. यात बुधवारी फेरन जळगाव व ढवळापुरी या भागात पाहणी सुरू असता ढवळापुरी येथील शेतकरी अक्षरशः ढसाढसा रडले. सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी, महसूल विभाग किंवा कृषी विभागाचे कोणीही साधे पंचनामा करायला देखील आले नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे.

आता तोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे शेवटच्या टप्प्यात परतीच्या अतिवृष्टीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा जवळपास शंभर टक्के खर्च करून झालेला होता. पुढील पंधरा दिवसात सोयाबीन, मूग , उडीद अशा पिकांची सोंगणीची वेळ आली होती. कपाशीच्या देखील अनेक ठिकाणी कैऱ्या सडल्या असून ज्या ठिकाणी कापूस लागलेला आहे तो कापूस देखील पूर्ण भिजून गेलेला आहे. डाळिंबासारख्या फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. त्यामुळे शासनाने हेक्टरी 50 हजार ची मदत करावी अशी मागणी डॉ.कल्याण काळे यांनी केलेली आहे.  औरंगाबाद जिल्ह्याला पहिल्यांदा कृषी मंत्री पद तर अनेक वर्षानंतर स्थानिक पालकमंत्र्यांकडे सहकार मंत्री पद मिळाल्याने आपण त्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार असून ते देखील ही परिस्थिती समजून मदत करतील अशी अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली. मात्र शासनाने जर झोपेचे सोंग घेतले तर वेळप्रसंगी आंदोलन करून शेतकऱ्यांना मदत देईपर्यंत मंत्र्यांना बाहेर फिरू देणार नाही. असा  इशारा देखील त्यांनी यावेळी दिला 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीcongressकाँग्रेसministerमंत्री