शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

ओढ्यात पोहणे जीवावर बेतले; एकाच वस्तीतील तीन मुलांचा बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 13:14 IST

सिल्लोडमध्ये मागील वर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती

ठळक मुद्देसहा मुले पाण्याने तुडूंब भरलेल्या या ओढ्याकडे गेले पाणी पाहून यातील तिघांना पोहण्याचा मोह झाला

सिल्लोड (औरंगाबाद ) : सिल्लोड शहरातील यशवंतनगरजवळ सय्यद अलाउद्दीन यांच्या दर्गाशेजारील ओढ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ वाजता घडली.अबरारखा मुश्ताकखा पठाण (११), अनसखा अमजदखा (१४) व मोईज हारुण शाह (१२, सर्व रा. यशवंतनगर झोपडपट्टी, मोहंमदिया कॉलनी, सिल्लोड) अशी बुडून मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत. 

बुधवारी रात्री सिल्लोड शहरासह तालुक्यात सर्वदूर चांगला पाऊस झाल्याने ओढ्यातील खड्डे व शिवडीत चांगलेच पाणी जमा झाले होते. गुरुवारी या कॉलनीतील सहा मुले या ओढ्याकडे गेले असता यातील तिघांना पोहण्याचा मोह आला आणि ते जिवाला मुकले. तिघे जण पाण्यात बुडत असल्याचे पाहून घाबरलेली सोबतची तिन्ही मुले धावत वस्तीकडे गेली व त्यांनी कुटुंबियांना माहिती दिली. वस्तीतील नागरिक ओढ्याजवळ पोहोचेपर्यंत तिन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

गरीब कुटुंबातील मुलेमुलांच्या कुटुंबियांसह स्थानिक नागरिकांनी तिन्ही मुलांना पाण्याबाहेर काढून सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृत मुले एकाच वस्तीतील रहिवासी असून, गरीब कुटुंबातील आहेत. यातील अबरारखा मुश्ताकखा पठाण व अनसखा अमजदखा हे मामेभाऊ आहेत. सायंकाळी तिन्ही मुलांवर येथे शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षीची पुनरावृत्तीगेल्या वर्षीही पावसाळ्यात सिल्लोड शहरातील रजाळवाडी पाझर तलावावर पोहायला गेलेल्या सिल्लोडमधीलच तीन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादWaterपाणी