शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

सिल्लोड तालुक्याची तहान वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:31 IST

९९ गावांत ‘पाणीबाणी’: वाढत्या तापमानामुळे टंचाईच्या झळाही तीव्र; प्रशासनाची कसरत

श्यामकुमार पुरेसिल्लोड : सिल्लोड शहरासह तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वाढत्या तापमानामुळे दिवसेंदिवस टंचाईच्या झळाही तीव्र होत असून तालुक्यातील ५९ गावांना ८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून २३ गावांसाठी ४६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. १७ गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव प्रलंबित असल्याने तालुक्यातील तब्बल ९९ गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.सिल्लोड शहराला खेळणा येथील खोदलेल्या चारीतून दर सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. चारनेर-पेंडगाव व केळगाव वगळता सर्वच प्रकल्प कोरडे पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. चारनेर-पेंडगाव प्रकल्पाच्या संपादीत क्षेत्रातील विहिरी प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. २०१२ च्या दुष्काळाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. थेंब थेंब पाण्यासाठी प्रशासन तारेवरची कसरत करताना दिसत आहे. केळगाव, जांभई जलसाठ्यावर टँकरला पाणी भरण्यासाठी २४ तास वीजपुरवठा करावा, असे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी देऊन देखील त्याची अंमलबजावणी महावितरणकडून होताना दिसत नाही.या गावांची तहान टँकरवरतालुक्यातील मोहाळ, टाकळी जिवरग, पिंपळगाव पेठ, वांगी बुर्द, पळशी, लोणवाडी, पानस, कायगाव, बोजगाव, वरुड पिंप्री, सराटी, अंधारी, बोदवड, वडोदचाथा, बाळापूर, अनाड, देऊळगाव बाजार, वडाळी टाका, धावडा, जळकी घाट, पांगरी, डकला, धानोरा, केºहाळा तांडा, पिंपळदरी, पिंपळदरीवाडा, मुखपाठ, दीडगाव, कोटनांद्रा, धोत्रा, चिंचपूर, तलवाडा, गव्हाली, पिरोळा, म्हसला खुर्द, सावखेड़ा खु -बु, डोंगरगाव, बहुली, भराडी, चिंचवण, रेलगाव वाडी, नानेगाव वस्ती, पालोद वाडी, मांडगाव, मुर्डेश्वर वस्ती, शिरसाळा तांडा, बोरगाव सारवाणी, गोळेगाव बु, हळदा, वांगी खु, गव्हाली तांडा, उपळी, खातखेडा, पानवडोद खु, टाकळी खु, मांडणा वाडी, मोढा आदी ५९ गावांमध्ये ८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.१७ गावांचे प्रस्ताव प्रलंबितपानवडोद खुर्द, वाडी, चिंचपूर, लोणवाडी, सासूरवाडा, निल्लोड वाड्या, भवन वाड्या, गोळेगाव खुर्द, जंजाळा, नाटवी, उंडणगाव वाड्या, आसडी, डोंगरगाव, पिंपळदरी, कोटनांद्रा, नानेगाव, वडाळा, गव्हाली या गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.पाणी जपून वापरण्याचे आवाहनसिल्लोड शहराला पाणीपुरठा करणारा खेळणा प्रकल्पात ३० बाय १० मीटर आकाराचे दोन नवीन चर खोदण्यात येत असून दोन दिवसांपूर्वीच हे काम हाती घेण्यात आले आहे. तर जुन्या चरातील साचलेला गाळ मशीनद्वारे काढण्यात येत आहे. नवीन चरला काही प्रमाणात पाणी लागले असून चराची लांबी रुंदी व खोली वाढताच त्यात पाणीसाठा वाढताच शहराला पाणीपुरठा केला जाईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा व नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले आहे.सिल्लोड शहराला तीन दिवसांत पाणी पुरवूयंदा दुष्काळाची पुनरावृत्ती झाली असून २०१२ मध्ये ९० गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता तर तब्बल १२५ टँकरने या गावांना पाणीपुरवठा केला जात होता. हीच परिस्थिती यंदा उद्भवली आहे. खेळणा धरण क्षेत्रात पाऊसच पडला नाही तरीही चरातून प्रती माणसी शासनाच्या २० लिटर पाण्याऐवजी प्रती माणसी चाळीस लिटर पाणी पुरविणार आहे. धरणातच दोन चर खोदण्याचे काम हाती घेतले असून चरातून पाणी उपलब्ध होताच सिल्लोड शहराला तीन दिवसात पाणी पुरवू, अशी माहिती आ. अब्दुल सत्तार यांनी दिली.फोटो....सिल्लोड येथील खेळणा मध्यम प्रकल्पात चर खोदकामाची पाहणी करताना आ. अब्दुल सत्तार व न.प. अधिकारी.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपात