शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

सिल्लोडच्या मिरचीचा ठसका देश-विदेशात; आता जीआय मानांकनासाठी येणार केंद्रीय पथक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 18:38 IST

चेन्नई येथील जीआय केंद्रीय तज्ज्ञांचे पथक परीक्षणासाठी सिल्लोड तालुक्यातील आमठाणा, शिवना, गोळेगाव या गावशिवारांत येणार आहे.

- श्यामकुमार पुरे

सिल्लोड : तिखटपणा अधिक आणि टिकण्याची क्षमता जास्त असल्याने राज्यभर नावलैकिक मिळविलेल्या सिल्लोड तालुक्यातील आमठाणा, शिवना, गोळेगाव येथील मिरचीला जीआय मानांकन देण्याच्या अनुषंगाने चेन्नई येथील जीआय केंद्रीय तज्ज्ञांचे पथक लवकरच परीक्षणासाठी येणार आहे.

सिल्लोड तालुक्यातील आमठाणा, शिवना, गोळेगाव शेतशिवारात मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. येथील मिरची चवीला अधिक तिखट असून ती अधिक काळ टिकते. त्यामुळे या मिरचीची राज्यभर ओळख आहे. या भागातील उष्ण व दमट हवामान, जमिनीची काळी पोत, जमिनीत झिंक, मँगनीज, फॉस्फरस व ह्युमिक ॲसिडचे प्रमाण अधिक असल्याने मिरचीत कॅपसेनॉईड घटक अधिक आढळला आहे. ही मिरची बुरशीला लवकर दाद देत नाही. कॅपसेनॉईडमुळे मिरचीची पँजन्सी अधिक होते. पँजन्सीमध्ये नाकाला झोंबणारा उग्र वास, तिखट चव, त्वचेला स्पर्श झाल्यावर लाही लाही होणे ही बाब विचारात घेतली जाते. सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठानचे किरण पवार व डॉ. संतोष पाटील यांनी याबाबत एक प्रस्ताव पाठवून सदर बाब केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर मिरचीला मानांकन मिळवून देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या अनुषंगाने लवकरच चेन्नई येथील जीआय केंद्रीय तज्ज्ञांचे पथक परीक्षणासाठी सिल्लोड तालुक्यातील आमठाणा, शिवना, गोळेगाव या गावशिवारांत येणार आहे.

विदेशांतही केली जाते निर्यातसिल्लोड तालुक्यातील मिरचीची पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश तसेच उत्तर भारत, मुंबई या देशांतील भागासह दुबई, पाकिस्तान, बांगलादेश व अरब देशांतही निर्यात केली जाते. दरम्यान, आजवर राज्यातील देवगड हापूस, नाशिकची द्राक्षे, जळगावची केळी व भरीत वांगी, वाहेगाव हळद, अलिबागचा पांढरा कांदा, नागपुरी संत्री, आदी राज्यातील ३४ उत्पादनांना जीआय मानांकन मिळाले आहे. आता सिल्लोड तालुक्यातील मिरचीची त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद