शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

अर्ध्या मराठवाड्यात श्रावणसरी; अनेक जिल्ह्यांत सूर्यदर्शनच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 13:54 IST

परभणी, नांदेड, लातूर, औरंगाबादेत पाऊस

ठळक मुद्देसतंतधार पावसाने पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. सिद्धेश्वर धरणाच्या १४ दरवाजांपैकी आठ दरवाजे उघडण्यात आले

औरंगाबाद : लातूर, परभणी, नांदेड व औरंगाबादेत श्रावणसरी कोसळल्याने अर्धा मराठवाडा चिंब झाला. अनेक ठिकाणी सूर्यदर्शनच झाले नाही. तसेच पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे.

लातूर :  रिमझिम लातूर : जिल्ह्यात आठवडाभरापासून होत असलेल्या रिमझिम पावसामुळे खरीप हंगामातील पिके बहरली आहेत़ मूग दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे, तर सोयाबीन फुलो-यात आहे़ काही ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी कीडनाशकांची फवारणी करीत आहेत़ या पावसामुळे त्यात व्यत्यय येत असून आणखीन किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतक-यांतून व्यक्त होत आहे़ 

परभणी : पिकांना दिलासापरभणी : जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशीही भीज पाऊस होत आहे. या पावसामुळे सोयाबीन-कापूस या दोन्ही पिकांना दिलासा मिळाला असून, पिकांच्या वाढीसाठी पाऊस पोषक मानला जात आहे. चार दिवसांपासून संततधार पाऊस होत असल्याने भूजल पातळीत कमालीची वाढ झाली असून, प्रकल्पांतील पाणीसाठाही वाढला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ५०४ मि.मी. पाऊस झाला. या पावसामुळे जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पात ९९.५४ टक्के पाणीसाठा झाला.

नांदेड : भोकरला सर्वाधिकनांदेड : जिल्ह्यात रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १३़६ मि़मी़ पावसाची नोंद झाली़ यात सर्वाधिक भोकर तालुक्यात ४३़१ मि़मी़ पाऊस झाला़ हिमायतनगर तालुक्यात २० मि़मी़, देगलूर तालुक्यात १६़८ मि़मी़, किनवट १५़६ मि़मी़, नांदेड ८ मि़मी़, बिलोली १०़७ मि़मी़, मुखेड १२़६ मि़मी़, कंधार ५़३ मि़मी़, हदगाव १२़३ मि़मी़, मुदखेड १०़९ मि़मी़, हिमायतनगर २० मि़मी़, माहूर ११़४ मि़मी, धर्माबाद १८़१ मि़मी़, उमरी २०़२ मि़मी़, अर्धापूर १२़६ मि़मी़ आणि नायगाव तालुक्यात ११़४ मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे़ 

हिंगोली : जलसाठा वाढलाकळमनुरी/ औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : यावर्षी मृग नक्षत्रापासूनच दमदार पाऊस पडत आहे़ मागील २ ते ३ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे़ त्यामुळे जलस्तर वाढला आहे़ पावसामुळे इसापूर धरणाचा पाणीसाठा वाढतच चालला आहे़ धरणात सध्या ५७़ ६१ टक्के जलसाठा आहे़ 

‘सिद्धेश्वर’चे दरवाजे उघडलेऔंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाच्या १४ दरवाजांपैकी आठ दरवाजे उघडण्यात आले असून, याद्वारे ८ हजार ९१३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीत सोडण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरल्याने मागील चार दिवसांपासून टप्प्याटप्प्याने धरणाचे दरवाजे उघडले जात आहेत. 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसDamधरण