शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

दुकान फोडून ६ लाखांचे दागिने लंपास

By admin | Updated: August 7, 2014 01:15 IST

शेलगाव : बदनापूर तालुक्यातील जालना-औरंगाबाद महामार्गावरील लोळगे ज्वेलर्स ही दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख ९७ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास केले.

शेलगाव : बदनापूर तालुक्यातील जालना-औरंगाबाद महामार्गावरील लोळगे ज्वेलर्स ही दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख ९७ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.जालना येथील रहिवासी सराफा व्यापारी राजेश बाबूराव लोळगे यांची शेलगावात लोळगे ज्वेलर्स ही सोन्याचांदीचे दुकान आहे. मंगळवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास लोळगे दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान, मध्यरात्री अज्ञान चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. दुकानातील सोन्याचांदीचे दागिने असा वरील किंमतीचा ऐवज चोरून नेला.लोळगे हे आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले. दुकान उघडल्यानंतर साहित्य अस्ताव्यस्त झालेले पाहून दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती बदनापूर पोलिसांना दिली. त्यावर पोलिस निरीक्षक पंकज जाधव, फौजदार राजपूत, कॉ. शिवनकर आदींनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तसेच जालना येथून श्वानपथकासही पाचरण करण्यात आले. श्वानाने जालना मार्गावर गावाच्या मुख्यरस्त्याच्या कमानीपर्यंत माग काठून तेथेच घुटमळले. चारीच्या या घटनेमुळे शेलगाव ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.(वार्ताहर)जिल्ह्यात बुधवारी रात्री शेलगावच्या सराफा दुकानासह चार ठिकाणी चोऱ्या झाल्या. जालना शहरातील गांधीनगरातील संतोष घुले यांच्या घरी झालेल्या चोरीत ११ हजाराचे संसार उपयोगी साहित्य चोरून नेले. कुंभारपिंपळगाव ता घनसावंगी येथील बीएसएलच्या टावरवरील ५४ हजार रूपये किमतीच्या ६ बॅटऱ्या चोरून नेल्या, तर धावडा ता. भोकरदन येथील राजू देशमुख यांच्या टेम्पोचे २२ हजार रूपये किमतीचे टायर चोरट्यांनी चोरून नेले.४मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. काही दिवसापूर्वीच जालना- औरंगाबाद ग्रामीण बँक फोडण्याचा चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. बँकेच्या तीन कुलूपे तोडल्यानंतर सायरनचा आवाज झाल्याने चोरट्यांनी पळ काढला होता. तसेच गावातील बैल, विहिरीवरील मोटारींच्या चोरीच्या घटनाही झालेल्या आहेत. गावात पोलिस चौकी स्थापन करून कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.