शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

धक्कादायक ! २ मुलांच्या आईने कुमारी असल्याची थाप मारून पैसे घेऊन केले लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 17:34 IST

या रॅकेटमधील एजंट महिला आणि अन्य एकाचा पोलीस शोध घेत आहेत.

ठळक मुद्देआरोपी महिलेला अटक

औरंगाबाद : दोन मुलांची आई असताना कुमारी असल्याची थाप मारून एजंट महिलेच्या माध्यमातून लाखो रुपये आणि दागिने घेऊन तरुणासोबत विवाह करणाऱ्या महिलेला क्रांतीचौक पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याखाली १२ फेब्रुवारी रोजी अटक केली. या रॅकेटमधील एजंट महिला आणि अन्य एकाचा पोलीस शोध घेत आहेत.

कविता रमेश देठे ऊर्फ सीमा अनिल रेसवाल असे अटकेतील महिलेचे नाव आहे. निरीक्षक उत्तम मुळक म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील श्रीराम वीरभान पाटील हे लग्नासाठी वधूचा शोध घेत होते. एक एजंट महिला सीमा रवी राठोड ऊर्फ सविता किसन माळी आणि अमोल रमेश देठे त्यांना जाऊन भेटली.  तिने तिच्या ओळखीची गरीब तरुणी उपवर असल्याचे सांगितले. काही दिवसांनी एजंट महिलेने कविताची ओळख सुनीता म्हणून श्रीरामसोबत करून दिली. तिने लग्नाची तयारी दर्शविली. मात्र, लग्नासाठी पैसे नसल्याचे सांगितले. श्रीरामने खर्च उचलण्याची तयारी दर्शविली.  ३० जानेवारी २०१९ रोजी त्यांचा जळगावात विवाह झाला. तत्पूर्वीच श्रीरामकडून कविता, तिची साथीदार व अमोल देठे यांनी १ लाख रुपये घेतले होते. श्रीरामने तिच्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे घातले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आईची प्रकृती ठीक नाही, तिला भेटायला म्हणून कविता श्रीरामला घेऊन औरंगाबाद आली.  लघुशंकेला जाऊन येते, असे सांगून कविताने तेथून धूम ठोकली. कविता न परतल्याने श्रीरामने क्रांतीचौक ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दिली. पोलीस  तपास करीत असताना श्रीरामची पत्नी हरवली नाही ,ती स्वत:हून पळून गेल्याचे समजले. शिवाय ती दोन मुलांची आई आहे.  तिने खोटे नाव सांगून  पैशासाठी लग्न  केल्याचे समोर आले. श्रीराम यांनी १२ फेब्रुवारी रोजी फिर्याद नोंदविली. 

आरोपी कविताला अटकपोहेकॉ. जैस्वाल यांनी कविताला पकडले. तेव्हा तिने गुन्ह्याची कबुली दिली. श्रीरामकडून घेतलेल्या रकमेपैकी ५० हजार रुपये पोलिसांच्या स्वाधीन केले. कविताने अशा प्रकारे लग्नाचे आमिष दाखवून किती उपवरांना फसविले, याचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादmarriageलग्न