शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

धक्कादायक ! २ मुलांच्या आईने कुमारी असल्याची थाप मारून पैसे घेऊन केले लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 17:34 IST

या रॅकेटमधील एजंट महिला आणि अन्य एकाचा पोलीस शोध घेत आहेत.

ठळक मुद्देआरोपी महिलेला अटक

औरंगाबाद : दोन मुलांची आई असताना कुमारी असल्याची थाप मारून एजंट महिलेच्या माध्यमातून लाखो रुपये आणि दागिने घेऊन तरुणासोबत विवाह करणाऱ्या महिलेला क्रांतीचौक पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याखाली १२ फेब्रुवारी रोजी अटक केली. या रॅकेटमधील एजंट महिला आणि अन्य एकाचा पोलीस शोध घेत आहेत.

कविता रमेश देठे ऊर्फ सीमा अनिल रेसवाल असे अटकेतील महिलेचे नाव आहे. निरीक्षक उत्तम मुळक म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील श्रीराम वीरभान पाटील हे लग्नासाठी वधूचा शोध घेत होते. एक एजंट महिला सीमा रवी राठोड ऊर्फ सविता किसन माळी आणि अमोल रमेश देठे त्यांना जाऊन भेटली.  तिने तिच्या ओळखीची गरीब तरुणी उपवर असल्याचे सांगितले. काही दिवसांनी एजंट महिलेने कविताची ओळख सुनीता म्हणून श्रीरामसोबत करून दिली. तिने लग्नाची तयारी दर्शविली. मात्र, लग्नासाठी पैसे नसल्याचे सांगितले. श्रीरामने खर्च उचलण्याची तयारी दर्शविली.  ३० जानेवारी २०१९ रोजी त्यांचा जळगावात विवाह झाला. तत्पूर्वीच श्रीरामकडून कविता, तिची साथीदार व अमोल देठे यांनी १ लाख रुपये घेतले होते. श्रीरामने तिच्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे घातले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आईची प्रकृती ठीक नाही, तिला भेटायला म्हणून कविता श्रीरामला घेऊन औरंगाबाद आली.  लघुशंकेला जाऊन येते, असे सांगून कविताने तेथून धूम ठोकली. कविता न परतल्याने श्रीरामने क्रांतीचौक ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दिली. पोलीस  तपास करीत असताना श्रीरामची पत्नी हरवली नाही ,ती स्वत:हून पळून गेल्याचे समजले. शिवाय ती दोन मुलांची आई आहे.  तिने खोटे नाव सांगून  पैशासाठी लग्न  केल्याचे समोर आले. श्रीराम यांनी १२ फेब्रुवारी रोजी फिर्याद नोंदविली. 

आरोपी कविताला अटकपोहेकॉ. जैस्वाल यांनी कविताला पकडले. तेव्हा तिने गुन्ह्याची कबुली दिली. श्रीरामकडून घेतलेल्या रकमेपैकी ५० हजार रुपये पोलिसांच्या स्वाधीन केले. कविताने अशा प्रकारे लग्नाचे आमिष दाखवून किती उपवरांना फसविले, याचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादmarriageलग्न