शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

धक्कादायक निष्कर्ष; एक लाख शेतकऱ्यांना जगणं होतंय असह्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 07:55 IST

माजी आयुक्त केंद्रेेकर यांच्या पाहणीतील धक्कादायक निष्कर्ष

विकास राऊत 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील एक लाख शेतकऱ्यांना जगणे असह्य होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष माजी विभागीय आयुक्त सुनील केेंद्रेकर यांच्या काळातील पाहणीतून पुढे आला आहे. केंद्रेकर यांनी विभागातील २१ लाख शेतकरी कुटुंबांचा सर्व्हे जानेवारी-२०२३ मध्ये करण्यास सुरुवात केली. 

१५ मेपर्यंत पाच लाख कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण झाला होता. या सर्व्हेतील निष्कर्षाच्या संदर्भावरून शुक्रवारी विधानसभेत गदारोळ झाला. केंद्रेकर ३ जुलैला कार्यमुक्त झाल्यानंतर त्यांनी सर्व्हे अहवाल शासनाकडे दिला. १ लाख ५ हजार शेतकरी कुटुंब अतिसंवेदनशील असल्याचा निष्कर्ष त्यांनी दिला होता.  

सर्व्हे कसा ? n शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत थेट संवाद, दुसरीकडे दहा लाख शेतकऱ्यांची ऑनलाइन माहिती भरून घेतल्याचा दावा. n मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, जि. प. सीईओं, तलाठ्यांच्या पथकाने घरी जाऊन फॉर्म भरून घेतला. शेतकऱ्यांच्या एकूण स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रश्नांचे बारा विभाग करून त्यामध्ये १०४ प्रश्नांची माहिती घेण्यात आली. 

समोर काय आले?  शेतकऱ्यांची खचलेली मानसिक स्थिती, बिकट आर्थिक परिस्थिती, सावकार व बँकांचे वाढलेले कर्ज. यातून निर्माण होणारे आत्महत्येचे विचार. काय करता येईल?

शेतकऱ्यांना दोन हंगामांत एकरी २० हजार रुपये रोख द्यावे, तेलंगणाप्रमाणे नगदी पैसे मिळावे. शासनाकडून मदतीसाठी ४० हजार कोटींच्या आसपास रकमेची तरतूद करावी. ही मदत देताना किमान-कमाल एकरची अट काढावी. नुकसान भरपाई, विमा, ठिबक अनुदान बंद करावे, असेही अहवालात म्हटले आहे. 

शेतकऱ्यांना महिन्याला ५,००० रुपये द्या : खडसे मुंबई : मराठवाड्यात १०० दिवसात १७०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विविध कारणांमुळे १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात आहेत. माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या सर्व्हेतून ही बाब समोर आली. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना प्रतिमहिना ५०० रुपये देण्याऐवजी ५ ते ६ हजार रुपये द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केली.  शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान मिळावे, १२ तास वीज चालू करावी, कृषी विभागातील रिक्त ५० टक्के जागांची भरती करावी, अशा मागण्याही खडसे यांनी केल्या. केंद्रेकर हे महसूल विभागात होते. महसूलला अहवाल दिला असेल तर तो मागवून घेऊ, असे यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीIndiaभारत