शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

धक्कादायक निष्कर्ष; एक लाख शेतकऱ्यांना जगणं होतंय असह्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 07:55 IST

माजी आयुक्त केंद्रेेकर यांच्या पाहणीतील धक्कादायक निष्कर्ष

विकास राऊत 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील एक लाख शेतकऱ्यांना जगणे असह्य होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष माजी विभागीय आयुक्त सुनील केेंद्रेकर यांच्या काळातील पाहणीतून पुढे आला आहे. केंद्रेकर यांनी विभागातील २१ लाख शेतकरी कुटुंबांचा सर्व्हे जानेवारी-२०२३ मध्ये करण्यास सुरुवात केली. 

१५ मेपर्यंत पाच लाख कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण झाला होता. या सर्व्हेतील निष्कर्षाच्या संदर्भावरून शुक्रवारी विधानसभेत गदारोळ झाला. केंद्रेकर ३ जुलैला कार्यमुक्त झाल्यानंतर त्यांनी सर्व्हे अहवाल शासनाकडे दिला. १ लाख ५ हजार शेतकरी कुटुंब अतिसंवेदनशील असल्याचा निष्कर्ष त्यांनी दिला होता.  

सर्व्हे कसा ? n शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत थेट संवाद, दुसरीकडे दहा लाख शेतकऱ्यांची ऑनलाइन माहिती भरून घेतल्याचा दावा. n मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, जि. प. सीईओं, तलाठ्यांच्या पथकाने घरी जाऊन फॉर्म भरून घेतला. शेतकऱ्यांच्या एकूण स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रश्नांचे बारा विभाग करून त्यामध्ये १०४ प्रश्नांची माहिती घेण्यात आली. 

समोर काय आले?  शेतकऱ्यांची खचलेली मानसिक स्थिती, बिकट आर्थिक परिस्थिती, सावकार व बँकांचे वाढलेले कर्ज. यातून निर्माण होणारे आत्महत्येचे विचार. काय करता येईल?

शेतकऱ्यांना दोन हंगामांत एकरी २० हजार रुपये रोख द्यावे, तेलंगणाप्रमाणे नगदी पैसे मिळावे. शासनाकडून मदतीसाठी ४० हजार कोटींच्या आसपास रकमेची तरतूद करावी. ही मदत देताना किमान-कमाल एकरची अट काढावी. नुकसान भरपाई, विमा, ठिबक अनुदान बंद करावे, असेही अहवालात म्हटले आहे. 

शेतकऱ्यांना महिन्याला ५,००० रुपये द्या : खडसे मुंबई : मराठवाड्यात १०० दिवसात १७०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विविध कारणांमुळे १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात आहेत. माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या सर्व्हेतून ही बाब समोर आली. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना प्रतिमहिना ५०० रुपये देण्याऐवजी ५ ते ६ हजार रुपये द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केली.  शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान मिळावे, १२ तास वीज चालू करावी, कृषी विभागातील रिक्त ५० टक्के जागांची भरती करावी, अशा मागण्याही खडसे यांनी केल्या. केंद्रेकर हे महसूल विभागात होते. महसूलला अहवाल दिला असेल तर तो मागवून घेऊ, असे यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीIndiaभारत