शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; मराठवाड्यात आज तिघांनी संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 19:10 IST

हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या घटना घडल्या.

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता समाजातील तरूण टोकाची पाऊले उचलू लागली आहेत. आत्महत्या करू नका,असे आवाहन मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजबांधवांना केले आहे, यानंतरही आज मराठवाड्यात तिघांनी जीवन संपवल्याच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या घटना घडल्या.

मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आंदोलन करीत आहेत. जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी(जि. जालना) येथील गत महिन्यात उपोषण सोडताना आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ४० दिवसांचा वेळ मागवून घेतला होता. यादरम्यान छत्रपती संभाजीनगरातील राजनगर येथील रहिवासी सुनील कावळे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर कोणीही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील  यांनी केले होते. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे राज्यसरकारने आरक्षणाचा प्रश्न न सोडविल्यामुळे त्यांनी २५ ऑक्टोबरपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये साखळी उपोषण आणि नेत्यांना गावबंदी करत जरांगे यांना पाठिंबा सुरू आहे. यातच आज मराठवाड्यात तिघांनी आरक्षणासाठी युवक टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले. या घटनांमुळे मराठा समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मराठवाड्यात आज मराठा युवकाच्या आत्महत्येची पहिली घटना हिंगोली जिल्हयातून पुढे आली. आखाडा बाळापूर तालुक्यातील २५ वर्षीय तरुण नाव कृष्णा उर्फ लहू यशवंतराव कल्याणकर याने आज सकाळी एकरा वाजेच्या सुमारास देवजना शिवारात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. कृष्णा शेतमजूरी आणि ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत असे.

तर दुसरी घटना जालना जिल्ह्यात घडली. मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या भावनेने व्यथित होऊन घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथील शिवाजी अण्णाकिसन माने (45) याने टोकाचे पाऊल उचलले. आज सकाळी साडेअकरा वाजता राहत्या घरामध्ये गळफास घेऊन माने याने आत्महत्या केली.

दरम्यान, आजची तिसरी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली.जरांगे यांच्या आंदोलनात सक्रीय सहभागी असलेल्या  गणेश काकासाहेब कुबेर (२८) या तरुणाने आज दुपारी मराठा आरक्षण मागणीसाठी राहत्या घरात गळफास घेऊन मृत्यूला कवटळाले.आत्महत्येपूर्वी त्याने एका बोर्डवर मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही,तोपर्यंत माझा मृतदेह जाळू नका,असे लिहून ठेवल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच, शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील कोटकर, सचीन हावळे पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी आपगाव गाव गाठले. सुनील कावळे यांच्यानंतर जिल्ह्यात दुसरी आत्महत्या तालुक्यातील आपतगाव येथे घडली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील