शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

धक्कादायक ! निष्काळजीपणे मानगुटीवर बसल्यानेच बिबट्याचा मृत्यू

By गजानन दिवाण | Updated: April 15, 2020 19:02 IST

सहा तासांच्या थरारानंतर पिकात लपलेल्या या बिबट्याला दोन दिवसांपूर्वी वन विभागाने पकडले होते.

ठळक मुद्देबिबट्याला पकडताना निष्काळजीपणा कारणीभूत

- गजानन दिवाण

औरंगाबाद : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या गाईडलाईनचे पालन न केल्यानेच पैठण तालुक्यातील थेरगाव शिवारात बिबट्याचामृत्यू झाला. बेशुद्ध केल्यानंतर कुठलीच काळजी न घेतल्याने त्याचे हृदय बंद पडले. शवविच्छेदन अहवालातूनच ही बाब समोर आली आहे.

सहा तासांच्या थरारानंतर पिकात लपलेल्या या बिबट्याला दोन दिवसांपूर्वी वन विभागाने पकडले होते. गौताळा अभयारण्यात घेऊन जात असताना रविवारी सायंकाळी या बिबट्याने अखेरचा श्वास घेतला. हृदय बंद पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. पोटात अन्न नसल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा दावा वन विभागाने केला असला तरी त्यात तथ्य नाही. प्राणी भुकेला असल्यास अनेक दिवस जगू शकतो. त्यामुळे त्याचे हृदय बंद पडत नाही, अशी माहिती पशुवैद्यकीयतज्ज्ञ डॉ. विजय रहाटे यांनी ‘लोकमत’ला दिली.

वन विभागाच्या कर्मचा-यांनी रेस्क्यू आॅपरेशनदरम्यान काळजी न घेतल्यानेच असे घडल्याचा आरोप विदर्भातील दिशा फाऊंडेशनचे यादव तरटे यांनी केला आहे. या बिबट्याला पकडतानाची क्लिप त्यांनी पाहिल्यानंतर प्रधान मुख्य वन संरक्षकांना यासंदर्भात निवेदन पाठवून घडल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या गाईडलाईनचे पालन केले गेले नाही. पकडल्यानंतर त्याला ट्रँक्विलाईज (भुलीचे इंजेक्शन) का केले? ते केल्यानंतरही योग्य ती काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे बिबट्याचा बळी गेल्याचा आरोप तरटे यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी औरंगाबादेतील वन्यजीवप्रेमी डॉ. किशोर पाठक यांनी केली आहे.

निष्काळजीपणामुळे झाला मृत्यू वन विभागाच्या म्हणण्यानुसार, कन्नड येथील प्रशिक्षित पथकाने ही कामगिरी केली; पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पथक येण्याआधीच बिबट्याला पकडण्याची मोहीम फत्ते झाली होती. बिबट्याला पकडण्यासाठी वेगळे पिंजरे लागतात. याठिकाणी माकडाच्या पिंजऱ्यातच त्याला पकडण्यात आले आणि भूल देऊन त्याच पिंजऱ्यात औरंगाबादला आणले गेले. पकडल्यानंतर बेशुद्धीचे इंजेक्शन देताना बिबट्याच्या मानगुटीवर अनेक जण बसलेले व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये स्पष्ट दिसतात. भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर त्याला मोकळी हवा मिळण्यासाठी काही काळजी घ्यायला हवी. ती न घेतल्याने या बिबट्याने दम तोडला. जमावबंदीचा आदेश असताना मोठ्या संख्येने जमाव एकत्र आला व गोंधळ निर्माण झाला. वन विभागाच्या कर्मचा-यांनाच पकडण्याची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे आणि अनेक जण मानेवर बसल्यानेच बिबट्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पाठक यांनी केला.  

म्हणे भुकेमुळे मृत्यूशवविच्छेदन अहवालात हृदय बंद पडल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. तो उपाशी असावा म्हणून त्याचा मृत्यू झाला असावा, असा दावा मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांनी केला. प्रशिक्षित कर्मचा-यांनीच त्याला पकडले, असेही ते म्हणाले.

भुकेमुळे हृदय बंद पडत नाहीप्राणी उपाशीपोटी अनेक दिवस जगू शकतात. मात्र, पोटात अन्न नसल्याने बिबट्याचे हृदय बंद पडू शकत नाही, अशी माहिती पशुवैद्यकीयतज्ज्ञ अमरावतीचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे यांनी दिली.

टॅग्स :leopardबिबट्याDeathमृत्यूAurangabadऔरंगाबादforestजंगल