शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

धक्कादायक! ३ हजार १५७ सातबाऱ्यातील फेरफारांना जिल्ह्यात लागलाय ब्रेक

By विकास राऊत | Updated: July 25, 2023 19:26 IST

शासनाने ३१ जुलैपर्यंत सात-बारा दुरुस्ती न केल्यास तलाठ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ३ हजार १५७ सातबाऱ्यातील फेरफाराला तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार पातळीवर ब्रेक लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ७/१२ मधील लबाड्यांना लगाम लागावा, यासाठी शासनाने मे महिन्यात ३१ जुलैपर्यंत सात-बारा दुरुस्ती न केल्यास तलाठ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात ४५१६ फेरफार रखडल्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर १३५९ फेरफार दुरुस्त्या झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर येणाऱ्या सात दिवसांत सर्व फेरफार पूर्ण होणार की नाही, याकडे लक्ष आहे.

शेती, मालमत्ता खरेदीनंतर त्यांचे फेर महिन्याभरात पूर्ण करण्याचे आदेश असताना मंडळ अधिकारी स्तरावर तब्बल ३ हजार १५७ फेरफार रखडले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना चांगलेच फैलावर घेत रखडलेले सर्व फेरफार तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर महसूल यंत्रणा कामाला लागली. मंडळ अधिकारी, तलाठी प्रलंबित फेरफारची प्रकरणे ३१ जुलैपर्यंत मार्गी लावतात की नाही, याकडे लक्ष आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड मंगळवारी मराठवाड्यातील सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार असून, बैठकीपूर्वी महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचे आदेश त्यांना दिले आहेत.

काय होते शासनाचे आदेश....राज्यातील सर्व जिल्ह्यातील सातबारे दुरुस्तीचा प्रस्ताव जमाबंदी आयुक्तांना मे २०२३ मध्ये राज्य संचालक ई-फेरफार प्रकल्प विभागाने दिला आहे. त्यानुसार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देखील आदेश दिले होते. तलाठ्यांनी ३१ जुलैपर्यंत साताबाऱ्यातील फेरफार दुरुस्ती न केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा ई-फेरफार प्रकल्प विभागाच्या अप्पर जिल्हाधिकारी सरिता नरके यांनी दिला होता.

फेरफार लवकर झाल्यास काय.....सातबाऱ्यातील दुरुस्ती तातडीने झाल्यास संबंधित शेतकरी, जमीनमालकांना नव्याने फेरफार तसेच जमिनींचे व्यवहार करता येतील. काही उताऱ्यातील क्षेत्र आणि जमिनीचे क्षेत्र जुळत नाही. परिणामी क्षेत्र नावावर असलेल्या जमीन मालक, शेतकऱ्यांना भूमी अभिलेख विभागाच्या ऑनलाइन यंत्रणेमुळे कोणतेही व्यवहार करता येत नाहीत. दुरुस्तीनंतर जमिनीच्या क्षेत्राचा नेमका आकडाही शासनाला जिल्हानिहाय कळू शकेल. त्याचा फायदा वेगवेगळ्या योजनांसाठी होऊ शकेल.

फेरफारचा फेरा अन् खिशाला झळा...फेर घेण्यासाठी तलाठ्यांच्या, मंडळ अधिकाऱ्यांच्या मागे-मागे फिरावे लागते. तलाठ्यांचे फोन बंद असतात. ते भेटत नाहीत, भेटले तर जोपर्यंत त्यांची मर्जी राखली जात नाही तोवर ते लॅपटॉप, संगणक सुरू करीत नाहीत. तलाठ्यांनी सातबाऱ्यातील दुरुस्ती, फेर मंजूर केला तर पुढे मंडळ अधिकारी अडवणूक करतात. मंडळ अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली तर तहसीलदार आणि तेथील कारकून शेतकरी, जमीन मालकांची अडवणूक करतात. असा हा सगळा फेरा सातबाऱ्यातील फेरफार, दुरुस्तीसाठी असून, यात प्रत्यके टप्प्यावर शेतकऱ्यांच्या खिशाला झळा बसतात. असे चित्र महसूल प्रशासनात रोज पाहायला मिळते.

जिल्ह्यातील तालुकानिहाय प्रकरणेतालुका.........................प्रकरणेऔरंगाबाद ...........२८६कन्नड.......................३५९सोयगांव.............१४०सिल्लोड.................३५०फुलंब्री......................३२७खुलताबाद.............१३०वैजापूर..............३७९गंगापूर..............४७८पैठण .............७०८एकूण.............३१५७

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद