शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

छत्रपती संभाजीनगरातील शिवाजीनगर भुयारी मार्ग ठरतोय ‘मनस्ताप मार्ग’!

By सुमित डोळे | Updated: May 20, 2025 13:39 IST

चार विभागांमध्ये विसंवाद असल्याने सगळाच घोळ; अवजड वाहनांचा प्रवेश बंद केल्याशिवाय गत्यंतर नाही, पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष

छत्रपती संभाजीनगर : रविवारी पावसाचे पाणी कंबरेपर्यंत साचल्यानंतर सर्वच स्तरातून टीका होत आहे. शिवाजीनगर भुयारीमार्गाच्या लांबी, उंची व रुंदीवरूनही संभ्रम निर्माण झाला आहे. या भुयारी मार्गातून बस, अवजड वाहन पास होत असताना रोज किमान २० पेक्षा अधिक वेळा, किमान १० ते १५ मिनिटे वाहतुकीचा खोळंबा होत असतो. यासाठी वाहतुक पोलिसांनी लोखंडी कमानीची उंची वाढविण्याची सातत्याने सूचना केली. पत्रव्यवहारही केला. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

नागरिकांनी १४ वर्षे या भुयारी मार्गासाठी लढा दिला. सातारा, देवळाई परिसरात जवळपास पाच लाख नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेला शिवाजीनगर भुयारीमार्ग चार शासकीय विभागांच्या विसंवादामुळे डोकेदुखी सिद्ध होत आहे. लोकार्पण होताच मार्गाच्या दोन्ही बाजूला रिक्षाचालकांचा विळखा पडला. शिवाय, भुयारी मार्गाच्या बांधकामादरम्यान जड, अवजड वाहनांचा विचारच केला गेला नाही. परिणामी, रोज दिवसाला किमान २० पेक्षा अधिक वेळा येथे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे हा भुयारी मार्ग 'नसून अडचण असून मनस्ताप', अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

काय आहेत अडचणी ?-भुयारी मार्गासाठी वाहनांच्या वजनाबाबत कोणताही नियम नाही.-देवळाईकडून शिवाजीनगर चौकात येताच शिवाजीनगरच्या दोन्ही दिशेला जड, अवजड वाहनांना वळण घेण्यासाठी पुरेशी जागाच नसल्याने वाहनांची गती मंदावते.-चौकाच्या दोन्ही दिशेला रिक्षाचालक, दुकानांसमोर वाहने रस्त्यावरच उभी केली जातात.-जड, अवजड वाहनांसह अक्षरश: वाळूच्या हायवांची येथून ये-जा होते. परिणामी, जड वाहनांचा जाताना वेग कमी होऊन वाहतूक मुंगीच्या गतीने पुढे सरकते.-देवळाई चौकात छोटे बेट असणे अपेक्षित होते. मात्र, ते नसल्याने बेशिस्तपणे वाहनांची ये-जा होते.

लोखंडी कमानीची उंची कमी करणे अत्यावश्यकपुलाच्या कामादरम्यान पोलिसांचे मत विचारात घेतले नाही. आता मात्र अवजड वाहनांमुळे रोज वाहतुकीचा खोळंबा होतो. मनपाने बसवलेली लोखंडी कमानीची उंची मोठी ठेवली. जड वाहनाला देवळाई व शिवाजीनगर चौकात पुरेशी जागाच नसल्याने नियमित कोंडी होते. परिणामी जड, उंच वाहने जाण्यास बंदी घालून लोखंडी कमानीची उंची कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जागतिक बँकेच्या प्रकल्प विभागाला पत्र लिहिले. मात्र, त्याला प्रतिसाद दिला गेला नाही.

चौकातील रस्ता अरुंदभुयारी मार्गातून देवळाई चौकाकडे बाहेर पडल्यानंतर चौकातील चारही बाजुला अर्धाअधिक रस्ता मातीचा आहे. परिणामी, रस्ता अरुंद झाल्याने वळण घेणारी वाहने थेट चौकापर्यंत जातात. परिणामी, रोज कार्यालयीन वेळेत येथे वाहतूक मंदगतीने पुढे सरकते.

उड्डाणपुलाची मागणी ते भुयारी मार्ग लोकार्पणापर्यंतची प्रक्रिया-२०११ पासून सात वर्षे नागरिकांचा शिवाजीनगर चौकात उड्डाणपुलासाठी संघर्ष.-२०१४ मध्ये उड्डाणपूल शक्य नसल्याचे विभागांनी सांगितल्याने भुयारी मार्गाचा पर्याय.-२०१७ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल.-२०२१ मध्ये न्यायालयाच्या आदेशावरून चार विभागांची समिती स्थापन.-ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात.-१५ ऑक्टोबर २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन.-१४ फेब्रुवारी २०२५ रोजी लोकार्पण.

असा आहे भुयारी मार्ग-जवळपास २५ कोटींची गुंतवणूक.-६.९२ कोटींत जवळपास १,८०० चौरस मीटर जागेचे भूसंपादन.- संपूर्ण भुयारी मार्ग २२.७६ मीटर लांब व ३.५ मीटर उंच.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRainपाऊस