शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

शिवसेनेचीही तारखेनुसार शिवजयंती? एकच 'तारीख' ठरविण्याची सेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 15:57 IST

शहरात उद्यापासून चार दिवसांच्या 'शिवजागर' उत्सवाचे आयोजन

औरंगाबाद: १९ फेब्रुवारी रोजीच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात चार दिवशीय 'शिवजागर' उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे आज शिवसेना आमदार, पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. जनभावना लक्षात घेता तिथी किंवा तारीख यापैकी एक काहीही ठरवा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचेही यावेळी शिवसेना आमदारांनी स्पष्ट केले. मात्र, क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कधी होणार याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. पालकमंत्री सुभाष देसाई अनावरणाची तारीख जाहीर करतील अशी माहिती त्यांनी दिली. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा क्रांतीचौक येथे स्थापित झाला असून शिवजयंतीच्या निमित्ताने दिनांक १५, १६, १७ व १८ फेब्रुवारी रोजी शहरात 'शिवजागर' उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट ,महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश जैस्वाल, नितीन घोगरे काका यांनी सांगितले आहे. या उत्सवात शहरात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, शिवसेना कायम तिथी नुसार शिवजयंती साजरी करण्याच्या आग्रही मताची  राहिली आहे. यामुळे शहरात तारखेनुसार शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर उत्सवाचे आयोजन केल्याने शिवसेनेने तिथीचा आग्रह बाजूला ठेवला का ? अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, जनभावना लक्षात घेता तिथी किंवा तारीख यापैकी एक काहीही ठरवा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.  

१५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान शिवजागरशिवसेना नेते पालकमंत्री सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या या उत्सवास ध्वजारोहणाने १५ फेब्रुवारी रोजी क्रांती चौकात सुरुवात होणार आहे. १५ ते १७ फेब्रुवारी रोजी शहरातून तब्बल ३६  शिवमशाल एका रथावरून क्रांतीचौकात पोहोचणार आहेत. या शिवमशाल यात्रेचे नेतृत्व शिवसेनेचे सर्व उपशहर प्रमुख करतील ,त्याचप्रमाणे महिला  आघाडी, दलित आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, वाहतूक आघाडी ,व्यापारी आघाडी स्वतंत्रपणे शिवमशाल यात्रा काढणार आहेत. दररोज सकाळी १० आणि सायंकाळी ४ वाजाता शहरातील नावाजलेले वाद्यवृंद मानवंदना देणार आहेत. तर या दरम्यान, रोज सायंकाळी ४ वाजात महाअभिषेक आणि छत्रपती शिवरायांच्या आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. 

असे असतील कार्यक्रम१५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्रावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी युवा शाहीर गणेश गलांडे आपली शाहीरी सादर करणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुप्रसिद्ध शिवचरित्राचे अभ्यासक प्रदीप साळुंके यांचे व्याख्यान होणार आहे.  तसेच दि.१८ तारखेला सकाळी १० वाजता मानवंदना व रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत १००० तरुण तरुणींचे पथक महामानवंदना देणार आहे. या उत्सवात शिवप्रेमींनी  मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, संतोष जेजुरकर, जयवंत ओक, अनिल पोलकर, विनायक पांडे, आनंद तांदुळवाडीकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, विधानसभा संघटक राजु वैद्य ,गोपाळ कुलकर्णी, सुशील खेडकर, महिला आघाडीच्या जिल्हा  संघटिका प्रतिभा जगताप, संपर्क संघटिका सुनीता आऊलवार, सहसंपर्क संघटिका सुनिता देव, समन्वयक कला ओझा, युवा सेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे यांनी केले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाShivjayantiशिवजयंतीAurangabadऔरंगाबादShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज