शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शिवसेनेचीही तारखेनुसार शिवजयंती? एकच 'तारीख' ठरविण्याची सेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 15:57 IST

शहरात उद्यापासून चार दिवसांच्या 'शिवजागर' उत्सवाचे आयोजन

औरंगाबाद: १९ फेब्रुवारी रोजीच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात चार दिवशीय 'शिवजागर' उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे आज शिवसेना आमदार, पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. जनभावना लक्षात घेता तिथी किंवा तारीख यापैकी एक काहीही ठरवा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचेही यावेळी शिवसेना आमदारांनी स्पष्ट केले. मात्र, क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कधी होणार याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. पालकमंत्री सुभाष देसाई अनावरणाची तारीख जाहीर करतील अशी माहिती त्यांनी दिली. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा क्रांतीचौक येथे स्थापित झाला असून शिवजयंतीच्या निमित्ताने दिनांक १५, १६, १७ व १८ फेब्रुवारी रोजी शहरात 'शिवजागर' उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट ,महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश जैस्वाल, नितीन घोगरे काका यांनी सांगितले आहे. या उत्सवात शहरात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, शिवसेना कायम तिथी नुसार शिवजयंती साजरी करण्याच्या आग्रही मताची  राहिली आहे. यामुळे शहरात तारखेनुसार शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर उत्सवाचे आयोजन केल्याने शिवसेनेने तिथीचा आग्रह बाजूला ठेवला का ? अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, जनभावना लक्षात घेता तिथी किंवा तारीख यापैकी एक काहीही ठरवा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.  

१५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान शिवजागरशिवसेना नेते पालकमंत्री सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या या उत्सवास ध्वजारोहणाने १५ फेब्रुवारी रोजी क्रांती चौकात सुरुवात होणार आहे. १५ ते १७ फेब्रुवारी रोजी शहरातून तब्बल ३६  शिवमशाल एका रथावरून क्रांतीचौकात पोहोचणार आहेत. या शिवमशाल यात्रेचे नेतृत्व शिवसेनेचे सर्व उपशहर प्रमुख करतील ,त्याचप्रमाणे महिला  आघाडी, दलित आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, वाहतूक आघाडी ,व्यापारी आघाडी स्वतंत्रपणे शिवमशाल यात्रा काढणार आहेत. दररोज सकाळी १० आणि सायंकाळी ४ वाजाता शहरातील नावाजलेले वाद्यवृंद मानवंदना देणार आहेत. तर या दरम्यान, रोज सायंकाळी ४ वाजात महाअभिषेक आणि छत्रपती शिवरायांच्या आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. 

असे असतील कार्यक्रम१५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्रावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी युवा शाहीर गणेश गलांडे आपली शाहीरी सादर करणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुप्रसिद्ध शिवचरित्राचे अभ्यासक प्रदीप साळुंके यांचे व्याख्यान होणार आहे.  तसेच दि.१८ तारखेला सकाळी १० वाजता मानवंदना व रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत १००० तरुण तरुणींचे पथक महामानवंदना देणार आहे. या उत्सवात शिवप्रेमींनी  मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, संतोष जेजुरकर, जयवंत ओक, अनिल पोलकर, विनायक पांडे, आनंद तांदुळवाडीकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, विधानसभा संघटक राजु वैद्य ,गोपाळ कुलकर्णी, सुशील खेडकर, महिला आघाडीच्या जिल्हा  संघटिका प्रतिभा जगताप, संपर्क संघटिका सुनीता आऊलवार, सहसंपर्क संघटिका सुनिता देव, समन्वयक कला ओझा, युवा सेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे यांनी केले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाShivjayantiशिवजयंतीAurangabadऔरंगाबादShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज