शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

शिवसेनेला धास्ती मतं फुटीची; मतदारांसाठी ‘व्हीप’ बजावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 7:59 PM

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारावजा सूचना

ठळक मुद्देऔरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक

औरंगाबाद : शिवसेनेच्या सर्व मतदारांनी आदेशाचे पालन करायचे आहे. ‘व्हीप’ प्रमाणे मतदान करायचे आहे. आपल्यावर कुठलाही डाग लागता कामा नये. मुंबईतील निवडणुकीत सर्व सदस्यांना ताकीद दिली होती, तीच पद्धत येथे अवलंबिण्यात येईल, अशी इशारावजा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी महायुतीच्या मेळाव्यात केली. 

अंबादास दानवे यांनी गुरुवारी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर पालकमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना-भाजप नेते, पदाधिकारी, नगरसेवकांचा मेळावा सरस्वती भुवनच्या नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, दानवे विजयी होतील, उमेदवारीसाठी अनेक इच्छुक होते. परंतु उमेदवारी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि दानवे यांची भेट घडवून आणली आहे. त्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. या निवडणुकीत सर्व काही उघडपणे होते. त्यामुळे पक्ष आदेशानुसार मतदान करा. क्षुल्लक कारणासाठी स्वत:ला डाग लावून घेऊ नका. विधानसभेची ही रंगीत तालीम आहे. कुचराई होऊ देऊ नका, मतदान होईपर्यंत आपल्याच विभागात थांबा. राज्यमंत्री खोतकर, आ.दानवे म्हणाले, जालना जिल्ह्यातून उमेदवार दानवे यांना मोठ्या प्रमाणात मते मिळतील. यावेळी प्रदीप जैस्वाल, नरेंद्र त्रिवेदी, डॉ.भागवत कराड, किशनचंद तनवाणी, विनोद घोसाळकर, राजू वैद्य, शिरीष बोराळकर, जि. प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर, अनिरुद्ध खोतकर, एकनाथ जाधव यांच्यासह औरंगाबाद-जालना महायुतीचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती तसेच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

( कुलकर्णी म्हणाले, ‘मी मायक्रो मायनॉरिटी’; अंबादास दानवे म्हणाले, ‘मला आशीर्वाद द्या...!’)

दानवे गरीब आहेत, त्यांच्याकडे पैसे नाहीतमाजी खा.चंद्रकांत खैरे म्हणाले, माझ्यात आणि अंबादासमध्ये कोणतेही भांडण नाही. अभ्यासू कार्यकर्ता म्हणून मला त्याची गरज आहे. ही विधानसभेची रंगीत तालीम आहे. लोकसभेत अनेक जण पाणीपुरवठ्याच्या कारणावरून जलकुंभांवर चढले. आता पाणी नसताना कुणीही जलकुंभावर चढत नाही. या निवडणुकीत कुणीही कुठे जाणार नाही. १३ आॅगस्ट रोजी सर्वांना सहलीला जायचे आहे. अंबादास गरीब कार्यकर्ता आहे. त्याच्याकडे पैसे नाहीत. कुणीही काही अपेक्षा ठेवू नये. आम्ही आमच्या पातळीवर सर्व बघून घेऊ, असे खैरे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादJalanaजालना