शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका वॉर्ड रचनेच्या विरोधात शिवसेना जाणार कोर्टात

By admin | Updated: February 10, 2015 00:32 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकांसाठी ११३ वॉर्डांची रचना नैसर्गिक सीमा ओलांडून तयार करण्यात आली आहे. त्यातील २७ वॉर्डांच्या सीमा डी. पी. रोड, नद्या,

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकांसाठी ११३ वॉर्डांची रचना नैसर्गिक सीमा ओलांडून तयार करण्यात आली आहे. त्यातील २७ वॉर्डांच्या सीमा डी. पी. रोड, नद्या, नाले ओलांडून केल्या आहेत. यामध्ये निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे ११३ वॉर्डांची सोडत रद्द करून नव्याने घेण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज मनपा आयुक्त पी. एम. महाजन यांच्याकडे केली. याप्रकरणी जैस्वाल म्हणाले, मनपाने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली कामच केले नाही. २००१ च्या जनगणनेनुसार वॉर्ड रचना होऊन ९९ वॉर्ड झाले. त्या आधारे मनपाने २०१५ च्या निवडणुकीसाठी काम करणे गरजेचे होते. निवडणूक आयोग, विभागीय आयुक्तांना मनपाने टाकलेले आरक्षण रद्द करण्याची मागणी करण्यात येईल. उस्मानपुऱ्यासारखा ऐतिहासिक लढत म्हणून ओळखला जाणारा वॉर्डच नकाशातून गायब झाला आहे. वॉर्डाचे चार तुकडे चार वॉर्डांना जोडले गेले आहेत. तसाच प्रकार सिल्लेखाना, चिकलठाणा, कोकणवाडी, समर्थनगर, समतानगर या वॉर्डांबाबत झाला आहे. गारखेडा परिसरात वाढलेल्या तीन वॉर्डांच्या सीमा डी. पी. रोडला मध्ये घेऊन टाकण्यात आल्या आहेत. शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, किशोर नागरे, वीरभद्र गादगे आदींची उपस्थिती होती. भाजपाचे आयोगाला निवेदनभाजपाचे नगरसेवक मधुकर सावंत यांनी विभागीय आयुक्त आणि निवडणूक आयोग आयुक्तांना निवेदन देऊन मनपा निवडणुकीसाठी टाकण्यात आलेले आरक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे. रमानगर वॉर्ड क्र.७३ हा अनुसूचित जाती नागरिकबहुल भाग आहे. परंतु तो महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. राखीव करण्यामागे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला. मनपा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या सोडतीमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या वॉर्डांवरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनपाकडे सोडतीवरून मोठ्या प्रमाणात हरकती व सूचनांचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. आज दिवसभरात सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये नागरिकांनी सूचना व हरकतींची माहिती घेण्यासाठी गर्दी केली होती. परंतु ११ फेबु्रवारीपासून हरकती घेण्यात येणार असल्यामुळे आज मनपाने कुणाच्याही हरकती घेतल्या नाहीत.