शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

सत्तार यांच्या बंडाने शिवसेना तोंडघशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 06:33 IST

विधानसभेचे सहा व विधान परिषदेचा एक, असे सात आमदार असताना शनिवारी औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना तोंडघशी पडली.

औरंगाबाद : विधानसभेचे सहा व विधान परिषदेचा एक, असे सात आमदार असताना शनिवारी औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना तोंडघशी पडली. असंगासी संग केला की हाती धुपाटणे येते, अशी सेनेची अवस्था झाली. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या मीना शेळके व शिवसेनेच्या बंडखोर देवयानी डोणगावकर यांना प्रत्येकी ३० मते मिळाल्याने चिठ्ठी काढण्यात आली. यात शेळके विजयी ठरल्या. उपाध्यक्षपदासाठी भाजपचे लहानू गायकवाड व शिवसेनेच्या शुभांगी काजे यांच्यातील लढतीत महाविकास आघाडीची दोन मते फुटल्याने भाजपचा विजय झाला.महाविकास आघाडीकडे संख्याबळ असूनही सेनेत आलेल्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीमुळे उपाध्यक्षपद भाजपकडे गेल्याने सेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तारांचा ‘गद्दार’ असा उल्लेख केला; आयारामांनीच येथे शिवसेनेचा ‘गेम’ केला. शिवसेनेत येऊन अध्यक्ष बनलेल्या देवयानी डोणगावकरांनी बंडखोरी करून सेनेला प्रारंभीच धक्का दिला. त्यातून सावरत असताना सत्तारांनी ६ समर्थकांना बंडखोरांच्या दावणीला बांधले. सेनेतील अंतर्गत हाणामारीला येथूनच प्रारंभ झाला.सत्तार यांनी वाहिन्यांद्वारे आपल्या राजीनाम्याची बातमी पेरल्याने फायर फायटर म्हणून माजी मंत्री अर्जुन खोतकर धावत आले. सत्तार राजीनामा देणार नाहीत. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, अशी सारवासारव त्यांनी केली; पण तोपर्यंत या स्वपक्षीयांच्या बंडखोरीने सेनेचे व्हायचे ते नुकसान झाले. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या मीना शेळके केवळ चिठ्ठीमुळे विजयी झाल्या, तरी उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मते फुटली आणि भाजपचा विजय झाला.डोणगावकर व सत्तार हे खरे शिवसैनिक नसल्याने सेनेत खळबळ उडाली. डोणगावकरांना अध्यक्ष व किशोर बलांडे यांना उपाध्यक्ष करून जिल्हा परिषदेवर नियंत्रण कायम ठेवण्याची सत्तारांची खेळी अयशस्वी झाली. या खेळीत सेनेच्या हाती धुपाटणे आले.या पराभवाला शिवसेनेतील खैरे-दानवे गटबाजीही कारणीभूत आहे. उपाध्यक्षपदी उमेदवार शुभांगी काजे या खैरेंच्या उमेदवार होत्या. दानवे गटाला त्यांचा विजय परवडणारा नव्हता. मतदारसंघात प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये म्हणून अध्यक्ष व उपाध्यक्षपद आपल्याकडे नसावे, असा शिवसेनेच्या सर्वच आमदारांचा प्रयत्न होता. जिल्ह्यात सेनेत आ. दानवे यांचे वर्चस्व असल्याने त्यांना खैरेंचा हस्तक्षेप नको होता.>सत्तार यांनी सेनेतील ‘बिभीषणा’च्या मदतीने ही खेळी खेळली; पण हा बिभीषण कोण, याचा शोध सेनेलाच घ्यावा लागणार आहे. जिल्ह्यावर सत्ता असताना जिल्हा परिषदेची सत्ता राखता न येणे हीच नामुष्की सेनेवर आली आहे.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तार