शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

सत्तार यांच्या बंडाने शिवसेना तोंडघशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 06:33 IST

विधानसभेचे सहा व विधान परिषदेचा एक, असे सात आमदार असताना शनिवारी औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना तोंडघशी पडली.

औरंगाबाद : विधानसभेचे सहा व विधान परिषदेचा एक, असे सात आमदार असताना शनिवारी औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना तोंडघशी पडली. असंगासी संग केला की हाती धुपाटणे येते, अशी सेनेची अवस्था झाली. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या मीना शेळके व शिवसेनेच्या बंडखोर देवयानी डोणगावकर यांना प्रत्येकी ३० मते मिळाल्याने चिठ्ठी काढण्यात आली. यात शेळके विजयी ठरल्या. उपाध्यक्षपदासाठी भाजपचे लहानू गायकवाड व शिवसेनेच्या शुभांगी काजे यांच्यातील लढतीत महाविकास आघाडीची दोन मते फुटल्याने भाजपचा विजय झाला.महाविकास आघाडीकडे संख्याबळ असूनही सेनेत आलेल्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीमुळे उपाध्यक्षपद भाजपकडे गेल्याने सेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तारांचा ‘गद्दार’ असा उल्लेख केला; आयारामांनीच येथे शिवसेनेचा ‘गेम’ केला. शिवसेनेत येऊन अध्यक्ष बनलेल्या देवयानी डोणगावकरांनी बंडखोरी करून सेनेला प्रारंभीच धक्का दिला. त्यातून सावरत असताना सत्तारांनी ६ समर्थकांना बंडखोरांच्या दावणीला बांधले. सेनेतील अंतर्गत हाणामारीला येथूनच प्रारंभ झाला.सत्तार यांनी वाहिन्यांद्वारे आपल्या राजीनाम्याची बातमी पेरल्याने फायर फायटर म्हणून माजी मंत्री अर्जुन खोतकर धावत आले. सत्तार राजीनामा देणार नाहीत. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, अशी सारवासारव त्यांनी केली; पण तोपर्यंत या स्वपक्षीयांच्या बंडखोरीने सेनेचे व्हायचे ते नुकसान झाले. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या मीना शेळके केवळ चिठ्ठीमुळे विजयी झाल्या, तरी उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मते फुटली आणि भाजपचा विजय झाला.डोणगावकर व सत्तार हे खरे शिवसैनिक नसल्याने सेनेत खळबळ उडाली. डोणगावकरांना अध्यक्ष व किशोर बलांडे यांना उपाध्यक्ष करून जिल्हा परिषदेवर नियंत्रण कायम ठेवण्याची सत्तारांची खेळी अयशस्वी झाली. या खेळीत सेनेच्या हाती धुपाटणे आले.या पराभवाला शिवसेनेतील खैरे-दानवे गटबाजीही कारणीभूत आहे. उपाध्यक्षपदी उमेदवार शुभांगी काजे या खैरेंच्या उमेदवार होत्या. दानवे गटाला त्यांचा विजय परवडणारा नव्हता. मतदारसंघात प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये म्हणून अध्यक्ष व उपाध्यक्षपद आपल्याकडे नसावे, असा शिवसेनेच्या सर्वच आमदारांचा प्रयत्न होता. जिल्ह्यात सेनेत आ. दानवे यांचे वर्चस्व असल्याने त्यांना खैरेंचा हस्तक्षेप नको होता.>सत्तार यांनी सेनेतील ‘बिभीषणा’च्या मदतीने ही खेळी खेळली; पण हा बिभीषण कोण, याचा शोध सेनेलाच घ्यावा लागणार आहे. जिल्ह्यावर सत्ता असताना जिल्हा परिषदेची सत्ता राखता न येणे हीच नामुष्की सेनेवर आली आहे.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तार