शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

राज्यात शिवसेना-भाजपचा पोरखेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:50 AM

मुख्यमंत्री, मंत्री हे केंद्रातून हाकलले जातात. रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोगावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे नियंत्रण आहे. कोणाला काही बोलू दिले जात नाही. देशात ही एक प्रकारे आणीबाणीची परिस्थिती आहे. दुसरीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपचा पोरखेळ सुरू आहे, या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.

ठळक मुद्देराज ठाकरे : पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज्य, केंद्र सरकारवर निशाणा; देशात आणीबाणीची परिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुख्यमंत्री, मंत्री हे केंद्रातून हाकलले जातात. रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोगावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे नियंत्रण आहे. कोणाला काही बोलू दिले जात नाही. देशात ही एक प्रकारे आणीबाणीची परिस्थिती आहे. दुसरीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपचा पोरखेळ सुरू आहे, या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.मनसेनेच्या पदाधिकाºयांचा गुरुवारी (दि. १९) तापडिया नाट्यमंदिरात मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. मनसेचे अभिजित पानसे, राजू पाटील, संदीप देशपांडे, आदित्य शिरोडकर, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरी, राजेश येरुनकर, भास्कर गाडेकर, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, शहर उपाध्यक्ष आशिष सुरडकर, अब्दुल रशीद खान यांची उपस्थिती होती.ठाकरे म्हणाले, सत्तेवर बसलेल्यांना लोक विटले आहेत. लोकांसमोर पर्याय नाही. त्यामुळे मराठवाड्यात अनेक प्रश्न आ वासून उभा आहे. देशात सध्या सदृृढ लोकशाही नाही. नोटाबंदीनंतर देशात साडेतीन कोटी लोकांच्या नोकºया गेल्या. केंद्र सरकार विकासकामे दाखवू शकत नाही. राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दंगली घडविल्या जातात. पुढेही हाच धोका आहे.नोटाबंदीनंतर भाजपकडे पैसानोटाबंदीनंतर भाजपकडे जेवढे पैसे आले तेवढे त्यापूर्वी नव्हते. उद्योगपतींकडे पैसे मागत असे. आता उद्योगपती नको आहेत. निवडणुकीत काळा पैसा बाहेर येत आहे, असा आरोप त्यांनी केला.दंगलीने २५०० कोटींचीगुंतवणूक रद्दविप्रो कंपनी २ हजार ५०० कोटींची गुंतवणूक औरंगाबादेत करणार होती. नवीन नोकºया निर्माण होणार होत्या; परंतु ज्या दिवशी औरंगाबादेत दंगल झाली, त्या दिवशी विप्रो कंपनीने शहरातील प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला. एका दंगलीने हे सगळे झाले.काँग्रेस- राष्टÑवादी परवडलीठाकरे म्हणाले, मोदी सरकार खोटं बोलणारं सरकार असून, काँँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस परवडले, असे म्हणण्याची वेळ येत आहे. शिवसेना-भाजप एकमेकांवर आरोप करतात. केंद्र सरकारवर अविश्वास ठराव येत आहे. त्यात शिवसेना काय करते, हे पाहायचे आहे. शिवसेना नाणार प्रकल्पाला विरोध करीत आहे. केंद्र सरकार पाठिंबा देत आहे.मनपा खाऊन रिकामी करण्यासाठी नाहीऔरंगाबादेत कचºयाचा प्रश्न भीषण बनला आहे. नाशिक महापालिका ५ वर्षे मनसेच्या हातात होती. कचरा व्यवस्थापनाचे तेथे केलेले नियोजन जाऊन पहा. ज्यांच्या हातात २५ ते ३० वर्षे शहराची सत्ता दिली, त्यांच्याकडून हे झाले नाही. शहर बकाल होत आहे. पालिका खाऊन फक्त रिकामी करण्यासाठी नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी मेळाव्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत केली. मनसेने नाशिकमध्ये कचरा व्यवस्थापनाचे उत्तम नियोजन केले आहे. डम्पिंग ग्राऊंड, कचरा गोळा करण्याची पद्धत, घंटागाड्यांना जीपीआरएसने जोडले आहे. त्यावर काटेकोर निरीक्षण ठेवले जाते. ओला-सुक्या कचºयातून खत प्रकल्प केला. प्लास्टिक पिशव्यांपासून इथोनॉल बनविले जाते. ते उद्योगांकडून विकत घेतले जाते. ही सर्व यंत्रणा केवळ पाच वर्षात उभारली. औरंगाबादेत शिवसेनेच्या हातात इतके वर्षे सत्ता दिली. सत्ताधाºयांनी काहीही केले नाही, याबाबत नागरिकांनी जाब विचारला पाहिजे.‘लोकमत’चे कौतुकसरकारवर टीका करू नये, अशी परिस्थिती देशात निर्माण केली जात आहे. काही लिहू द्यायचे नाही, बोलू द्यायचे नाही. माध्यमांवर दबाव आणला जातो. याविरुद्ध कुणीच काही बोलत नाही. काही जण सरकारच्या धोरणांवर टीका करीत आहेत, आपली जबाबदारी पार पाडत आहेत, असे सांगत राज ठाकरे यांनी ‘लोकमत’चे कौतुक केले. यावेळी त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीचा अणि दोन वर्तमानपत्रांचाही उल्लेख केला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबादMNSमनसेState Governmentराज्य सरकार