शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
4
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
5
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
6
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
7
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
8
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
9
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
11
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
12
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
13
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
14
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
15
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
16
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
17
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
18
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
19
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
20
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी अनास्थेतून ‘शतकोटी’ला घरघर

By admin | Updated: July 23, 2014 00:21 IST

हिंगोली : पर्यावरण वाढीसाठी राज्य शासनाने सुरू केलेली शतकोटी वृक्ष -लागवड योजनेला प्रशासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे घरघर लागली

हिंगोली : पर्यावरण वाढीसाठी राज्य शासनाने सुरू केलेली शतकोटी वृक्ष -लागवड योजनेला प्रशासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे घरघर लागली असून, रोपच उपलब्ध होत नसल्याने शतकोटीची संकल्पानाच मोडीत निघत असल्याचा प्रकार जिल्ह्यातून होताना दिसून येत आहे.
वाढत चाललेला पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्याच्या दृष्टिकोनातून व वृक्षलागवड वाढावी यासाठी शासनाने शतकोटी वृक्षलागवड योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत प्रारंभी चांगले काम करण्यात आले; परंतु कामातील सातत्य टिकविण्यात प्रशासकीय यंत्रणा कमी पडल्याने या योजनेला घरघर लागल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत गतवर्षी जिल्ह्यात ११ लाख ८९ हजार ८५७ रोपांची लागवड करण्यात आली होती. त्यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यात २ लाख ४९ हजार ४६९, वसमत तालुक्यात २ लाख ३८ हजार ५, हिंगोली तालुक्यात ४२ हजार ५९०, कळमनुरी तालुक्यात २ लाख ४८ हजार ४३३ आणि सेनगाव तालुक्यात २ लाख ११ हजार ३६० रोपांची लागवड केल्याचा अहवाल शासनदरबारी आहे. हा कागदोपत्री अहवाल असला तरी आजघडीला यामधील किती रोपे जिवंंत आहेत? हा एक संशोधनाचा विषय ठरणार आहे. अनेक ग्रामपंचायतींनी वृक्ष लागवडीची ही मोहीम कागदावरच राबविली. त्यांचे पितळ उघड पडेल अशी भूमिकाही प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धन करणेही तितकेच महत्वाचे आहे; परंतु याकडे मात्र सर्वच शासकीय यंत्रणांनी दुर्लक्ष केले. परिणामी लाखांवर लावलेली रोपे आजघडीला हजारातही सापडतील की नाही? याविषयी साशंकता आहे.
गतवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड केल्याचा अहवाल जिल्हास्तरीय यंत्रणेचा असला तरी चालूवर्षी मात्र अत्यंत वाईट अवस्था या योजनेची असल्याचे दिसून येत आहे. शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्याला ५ लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये प्रत्येक तालुक्याने १ लाखाचा वाटा उचलायचा आहे. जुलै महिना संपत आला तरी अद्याप वृक्षारोपणाची मोहीम सुरू झालेली नाही. सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या रोप- वाटिकांमध्ये एकूण ६ लाख रोपे उपलब्ध आहेत. हीच रोपे ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहेत; परंतु ती कधी देण्यात येतील, याचा मुहूर्त मात्र अद्याप काढण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा या योजनेसंदर्भात किती गंभीर आहे, हेच यावरून स्पष्ट होते.
गतवर्षी ११ लाख ८९ हजार ८५७ रोपांची लागवड आणि यावर्षी मात्र ५ लाखांचे उद्दिष्ट या दोन विरोधाभास निर्माण करणाऱ्या बाबी आहेत. रोप वाटिकांमध्ये रोपच उपलब्ध नसल्याने यावर्षी वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही घटले आहे. त्यामुळे रोपवाटिकेमध्ये जास्तीत जास्त रोपे लावण्याची जबाबदारी आहे तरी कोणाची? असा सवाल उपस्थित होत आहे.
गेल्या ३ वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये रोपांची लागवड करण्यात आलेली नाही. कारण गेल्या ३ वर्षांपूर्वी ज्या ग्रामपंचायतींनी रोपे तयार केली होती, त्यांची रोपे एक तर खरेदी केली गेली नाहीत व ज्यांची रोपे खरेदी केली गेली त्यांना मोबदला वेळेवर दिला गेला नाही. त्यामुळेच या रोपवाटिका बंद करण्यात आल्या असल्याचे समजते.
(जिल्हा प्रतिनिधी)
अद्यापही वृक्षलागवड सुरू नाही
गतवर्षी शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात ११ लाख ८९ हजार ८५७ रोपांची करण्यात आली होती लागवड.
लाखांवर रोपांची लागवड केली असली तरी या रोपांचे संवर्धन करण्यात आले नसल्याने सध्या जिवंत रोपांची संख्या कमीच.
चालू वर्षी रोपांची उपलब्धता कमी असल्याने जिल्ह्याचे केवळ ५ लाख रोप लागवडीचे ‘शतकोटी’ उद्दिष्ट.
सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या रोपवाटिकांमधून जिल्हा परिषद घेणार रोपे.
गेल्या ३ वर्षांपासून जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीने उभारली नाही रोपवाटिका.
३ वर्षांपूर्वी जि.प.ने सांगितलेल्या रोपांची बिले करण्यात आली नव्हती अदा.