शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

सात आठवड्यांनंतर मराठवाडा चिंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 5:34 PM

विभागात रविवारी सकाळपर्यंत सरासरी ६१.७२ मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये १०४.५५ मि.मी.सह सर्वाधिक पाऊस लातूर जिल्ह्यात तर औरंगाबाद (३५.४७ मि.मी.) व जालना (३२.१९ मि.मी.) या दोन जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली.

ठळक मुद्देदिवसभरात ६१.७२ मि.मी. पाऊस  वार्षिक सरासरीच्या मात्र केवळ ४३.१७ टक्के पर्जन्यमान ५२ दिवसाच्या दीर्घ खंडानंतर मराठवाडा चिंब

औरंगाबाद, दि. 20  : ५२ दिवसाचा दीर्घ खंड, दुबार पेरणीचे संकट, जलसाठ्यांमधील घटते प्रमाण अशा परिस्थितीत मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट घोंघावत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विभागात रविवारी सकाळपर्यंत सरासरी ६१.७२ मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये १०४.५५ मि.मी.सह सर्वाधिक पाऊस लातूर जिल्ह्यात तर औरंगाबाद (३५.४७ मि.मी.) व जालना (३२.१९ मि.मी.) या दोन जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगल्या पाऊस पडल्यानंतर वरुणराजाने ओढ दिली. श्रावण कोरडा गेल्यानंतर हवामान खात्याने जेव्हा १९ आॅगस्ट रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला तेव्हा सर्वांचे डोळे शनिवारी आकाशाकडे लागले होते. पावसानेही निराश न करता शनिवारी पहाटेपासुनच रिपरिप सुरू केली. 

नांदेड जिल्ह्यात सर्वत्रच चांगला पाऊस झाला असून मुदखेडमध्ये बारड गावात सर्वाधिक २०५ मि.मी. पावसाची नोंद झाली. नांदेड शहरातही १७८ मि.मी. पाऊस पडला. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणा-या विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली झाली असून सध्या प्रकल्पात ४८ द.ल.घ.मी. पाणी आहे. तसेच जायकवाडी धरणात गेल्या २४ तासांमध्ये २२.६० द.ल.घ.मी. आवाक झाली असून सध्या धरणात ३८.५३ टीएमसी जलसाठा उपलब्ध आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर जलसाठ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येला मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने शेतकºयांमध्ये आनंददायी वातावरण आहे. 

गावांचा संपर्क तुटला परभणी जिल्ह्यातील लेंडी नदीला पूर आल्याने सकाळी १० वाजेपर्यंत पाच गावांचा तर धामोडी नदीला पूर आल्याने आठ गावांचा संपर्क तुटला होता. मुदखेडचा नांदेडसह इतर तालुक्यांशी संपर्क काही काळ तुटला होता. नांदेड महापालिका आयुक्त व अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या घरात पाणी घुसले. जिल्ह्यातील अनेक छोट्या छोट्या पुलांवरून पाणी ओसंडुन वाहात होते. विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीमुळे सतर्क राहण्याचे आदेश दिले होते.

नद्यांना आले पाणीरविवारी मराठवाड्यातील अनेक नदी-नाले भरून वाहू लागले. पैठण तालुक्यातील विरभद्रा नदी, सुलोचना नदी, गलाठी नदी, शिरुर अनंतपाल तालुक्यातील येरोळ-कारेवाडी नदी, निलंगा तालुक्यातील मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली. उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे लहान-मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठ्यांत वाढ झाली आहे. लातूर तालुक्यातील नागझरी येथील उच्चतम बंधाराचे दारे उघडण्यात आले आहेत. 

अजूनही चिंता कायमदोन दिवसांपासून जरी पाऊस पडत असला तरी खूप विलंब झाला आहे हेदेखील सत्य आहे. मराठवाड्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ४३.१७ टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षीच याच काळात ५७.५२ टक्के पावसाची नोंद आहे. विभागात २० आॅगस्टपर्यंत सरासरी पर्जन्यमान ४७१.१८ मि.मी एवढे असून आतापर्यंत केवळ ३३६.३२ मि.मी. पाऊस पडला आहे. सोयाबीन व काही प्रमाणात खरिपाच्या लाभा व्यतिरिक्त फारसे समाधानकारक चित्र नाही. 

मराठवाड्यातील जिल्हानिहाय पर्जन्यमान

जिल्ह्यांचे नाव        पाऊस (मि.मी.)लातूर                      १०४.५५नांदेड                      १००.८६बीड                         ६८.४७उस्मानाबद            ६५.०९हिंगोली                  ४४.९६परभणी                   ४२.२१औरंगाबाद             ३५.४७जालना                   ३२.१९