नांदेड जिल्ह्यात वीज कोसळून सात ठार
By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:19:11+5:302014-06-14T01:20:47+5:30
नांदेड : नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी वादळी पावसात विविध घटनांत वीज कोसळून सात जण ठार झाले. यात माहूरमध्ये वडिलांसह दोन भाऊ तर कंधार तालुक्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला़

नांदेड जिल्ह्यात वीज कोसळून सात ठार
नांदेड : नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी वादळी पावसात विविध घटनांत वीज कोसळून सात जण ठार झाले. यात माहूरमध्ये वडिलांसह दोन भाऊ तर कंधार तालुक्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला़
मौजे लांजी, ता़ माहूर येथे शेतात पेरणी करत असलेल्या किसन नारायण रिक्कमवार (६७), अनंता किसन रिक्कमवार (३०) व रवींद्र किसन रिक्कमवार (२७) हे पितापुत्र वीज कोसळून ठार झाले. दुपारी एकच्या दरम्यान अचानक वारा सुरू झाल्याने त्यांनी महिलांना घरी पाठवून दिले व नंतर स्वत: तिघेही झाडांना बैल बांधून शेजारी शेख जाफर शेक़रीम कुरेशी यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी अचानक वीज कोसळली. पाऊस थांबल्यानंतर गावातून राजू रिक्कमवार व ऋषिकेश रिक्कमवार हे दोघे शेतात आल्यानंतर किसन जिवंत असल्याने त्यांना माहूरच्या रुग्णालयात नेले. तिथे डॉ़व्ही़एऩ भोसले व डॉ़निरंजन केशवे यांनी प्रथमोपचार करून यवतमाळ येथे नेण्याचा सल्ला दिला़ यवतमाळला जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला़
किसन यांना दोन मुले, तीन मुली आहेत़ तहसीलदार डॉ़आशिषकुमार बिरादार यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत मृतांच्या वारसांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचा धनादेश दिला.