शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

साडेसाती संपली, आता मनसेला चांगले दिवस येणार; अमित ठाकरेंना विश्वास

By बापू सोळुंके | Updated: October 14, 2022 21:12 IST

शिवसेनेत फुट पडल्याने जनतेसमोर मनसे चांगला पर्याय

औरंगाबाद: प्रत्येकाच्या जीवनात एक वाईट काळ असतो. त्याप्रमाणे मीही पक्षाच्या वाईट काळ असताना २०१५ साली राजकारणात आलो. तेव्हापासून मी पक्ष, संघटनेचे काम करीत आहोत. आता पक्षाची साडेसाती संपली असून चांगले दिवस आले आहेत. शिवसेनेत पडलेल्या फुटीचा महाराष्ट्र नवनिर्मान सेनेला लाभ होईल, मनसेच उत्तम पर्याय जनतेसमोर असेल, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

महासंपर्क अभियानानिमित्त अमित कालपासून औरंगाबादच्या दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी दिवसभर त्यांनी जालना रोडवरील पंचतारांकित हॉटेलमध्ये महाविद्यालयीन युवक,युवतींशी संवाद साधला. दिवसभर झालेल्या या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची महाविद्यालय तेथे शाखा स्थापन केली जाणार आहे. याचेच नियोजन करण्यासाठी महासंपर्क अभियान हा दौरा आहे. 

या दौऱ्यात मराठवाड्यातील तरूण, तरूणींचे प्रश्न, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेता आल्या. हे प्रश्न मला मुंबईत बसून कळाले नसते. दोन महिन्यानंतर मी पुन्हा राज्याचा दौरा करणार आहे. राज्यातील राजकीय घडामोडीविषयी त्यांना विचारले असता, मुंबईत दसऱ्याला दोन मेळावे झाल्याचे कळाले. मी ते मेळावे पाहिले नाही ना त्याविषयी काही ऐकले नाही. मात्र शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेन पक्षाकडे अर्थात राज ठाकरे यांच्याकडे जनता उत्तम पर्याय म्हणून पाहू लागली आहे. मनसेची राज्यात सत्ता नसताना भाेंगा आंदोलनाची दखल राज्यातच नव्हे तर परराज्यातही घेतली गेली. मराठी पाटीचा मुद्दा हाती घेतल्यानंतर राज्यात बदल झाल्याचे दिसू लागले. मनसेकडे सत्ता नसताना पक्ष काय करू शकतो, हे जनतेला दिसत आहे. यामुळे मनसे सत्तेत आल्यानंतर अनेक प्रश्न मार्गी लागतील, याची जनतेला खात्री पटत असल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेMNSमनसेAurangabadऔरंगाबाद