सेनेचा अभूतपूर्व विजय
By Admin | Updated: May 17, 2014 00:18 IST2014-05-17T00:12:40+5:302014-05-17T00:18:34+5:30
उस्मानाबाद : राष्टÑवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील दोन विद्यमान मंत्री आघाडीच्या राज्य मंत्रिमंडळात आहेत.

सेनेचा अभूतपूर्व विजय
उस्मानाबाद : राष्टÑवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील दोन विद्यमान मंत्री आघाडीच्या राज्य मंत्रिमंडळात आहेत. असे असतानाही डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवाराचा सव्वादोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव करीत शिवसेनेने उस्मानाबादेत अभूतपूर्व विजयाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, मतदारसंघातील आजवरच्या लोकसभा निवडणुकीत इतके विक्रमी मताधिक्य प्रथमच सेनेला मिळाले आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडून प्रा. रवींद्र गायकवाड यांचा ६ हजार ७८७ अशा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर प्रा. गायकवाड पक्ष कार्यापासूनही काहीसे दूर होते. तर दुसरीकडे डॉ. पद्मसिंह पाटील सक्रीय झाल्याचे चित्र असतानाच राष्टÑवादीला या दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांच्या बार्शी विधानसभा मतदारसंघातून गायकवाड यांना सुमारे ५४ हजारांचे मताधिक्य आहे. तर पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या तुळजापूर मतदारसंघातूनही सुमारे ३४ हजारांचे मताधिक्य सेनेला प्राप्त झाले आहे. सुमारे सव्वादोन लाखांपेक्षा अधिकच्या मताधिक्यामुळे शिवसेनेसह महायुतीमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसत असून, लोकसभेप्रमाणेच येणार्या विधानसभा निवडणुकीतही महायुतीला यश मिळेल, असा दावा आता सेनेच्या पदाधिकार्यांकडून केला जात आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही केवळ उस्मानाबाद आणि उमरगा या दोन मतदारसंघावर सेनेचा झेंडा फडकला होता. मात्र, तरीही राज्यातील सत्ता आघाडीच्या हाती असल्याने सेनेची कोंडी होत होती. मात्र, काँग्रेस आणि राष्टÑवादी या आघाडीतील दोन मित्रपक्षच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आमने-सामने उभे ठाकल्याचे चित्र होते. याचा नेमका फायदा शिवसेनेने उचलला. जिल्हा परिषद, जिल्हा बँकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांतही काँग्रेस-सेना एकत्र आल्याने सेनेला नवसंजीवनी मिळाली. त्यातच गुजरातेतून सुटलेल्या नरेंद्र मोदींच्या लाटेत महाराष्टÑातील अनेक दिग्गजांसह राष्टÑवादीच्या डॉ. पद्मसिंह पाटील यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. जिंकल्याचे कारण देशभरात असलेली मोदींची लाट. कार्यक़र्त्यांचा प्रचारातील सक्रीय सहभाग. मागील पराभवाबाबत सहानुभूती महायुतीच्या पदाधिकार्यांतील समन्वय हरल्याचे कारण देशभरात असलेली मोदींची लाट. आघाडीच्या पदाधिकार्यांतील बेबनाव. जिल्ह्याबाहेरील मतदारसंघांकडे दुर्लक्ष. सत्तेविरोधात असलेला असंतोष.