शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

चोरट्यांची हिंमत बघा; ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांच्या शेतातूनच पळवल्या तीन बकऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2022 12:17 IST

पैठण तालुक्यातील कातपूर शिवारात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे शेत आहे.

जायकवाडी ( औरंगाबाद ) : पैठण तालुक्यातील कातपूर शिवारात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे शेत आहे. त्यांच्या शेतातील शेतमजुराच्या तीन बकऱ्या सोमवारी रात्री चोरट्यांनी चोरुन नेल्या. याप्रकरणी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, कातपूर शिवारातील गट क्रमांक ६७ मध्ये मंत्री अशोक चव्हाण यांची शेती आहे. त्यांच्या शेतात गेल्या वीस वर्षांपासून गणेश अभंग हे आई-वडिलांसोबत शेतमजुरी करतात. गणेश अभंग हे तेथेच शेतवस्तीवर राहतात. शेतवस्तीवरील घराच्या पाठीमागे त्यांनी जनावरे बांधण्यासाठी गोठा बनविलेला आहे. सोमवारी रात्री या गोठ्यातून गणेश अभंग यांच्या तीन बकऱ्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. तसेच येथून थोड्या अंतरावर असलेल्या दीपक मोरे यांच्या शेतवस्तीवर ऊसतोडणीसाठी आलेल्या कामगारांच्या झोपड्यांमधून तीन मोबाईलदेखील लंपास करण्यात आले आहे. 

या प्रकरणी गणेश अभंग यांनी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. भागवत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादtheftचोरीAshok Chavanअशोक चव्हाण