अनधिकृत नळ जोडण्यांचा मनपाकडून शोध
By Admin | Updated: December 8, 2015 00:06 IST2015-12-07T23:39:07+5:302015-12-08T00:06:08+5:30
आशपाक पठाण , लातूर पाणीटंचाईची ओरड दिवसेंदिवस वाढत असल्याने मनपा प्रशासनाला जाग आली आहे़ अनेक ठिकाणी एकाच डिमांडवर २ ते ५ जोडण्या घेऊन पाणी

अनधिकृत नळ जोडण्यांचा मनपाकडून शोध
आशपाक पठाण , लातूर
पाणीटंचाईची ओरड दिवसेंदिवस वाढत असल्याने मनपा प्रशासनाला जाग आली आहे़ अनेक ठिकाणी एकाच डिमांडवर २ ते ५ जोडण्या घेऊन पाणी घेणाऱ्यांच्या जोडण्या बंद करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने २० जणांचे पथक तयार केले आहे़ त्यानुसार शाखा अभियंत्यांच्या नेतृत्वात विभागनिहाय अचानक मोहीम राबविण्यात येणार असून यातून अनधिकृत जोडण्या बंद केल्या जाणार आहेत़
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पाने तळ गाठल्याने पाण्याची आवक घटली आहे़ परिणामी, अत्यंत तोलून मापून मिळणाऱ्या पाण्याचे वितरण मनपाकडून व्यवस्थित होत नसल्याने पाणीपुरवठा विभागावर नागरिकांचा रोष वाढत आहे़ दहा दिवसाला नळाला येणारे पाणी ठराविक लोकांना दिवसभर मिळते तर काहीजणांच्या नळाला थेंबही येत नाही़ पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी एकदा व्हॉल्व फिरविला की, निवांत झोप घेतात़ कुठे पाणी येतेय अन् कुठे नाही, याची खबरदारी कोणीच घेत नाही़ नागरिकांनी पाण्यासाठी तक्रार केल्यावर वरिष्ठांकडून होकार मिळतो पण आश्वासनांची अंमलबजावणी होत नाही़ पाणी मिळत नसल्याच्या तक्रारींचा मनपात पाऊस सुरू आहे़ पाणी पुरवठा विभागाकडून तक्रारीची दखलही घेतली जात नसल्याने मनपात येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणाऱ्या महिलांचा टक्का वाढत आहे़ पाणी गळती आणि अनधिकृत जोडणी बंद केल्यास पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल, या अपेक्षेने मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडून २० जणांचे पथक कामाला लावण्यात आले आहे़ ३० नोव्हेंबर रोजी पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी आदेश काढला असून ७ दिवस लोटले तरी अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही़
शाखा अभियंता एस़एऩ काझी म्हणाले, सरस्वती कॉलनी, खाडगाव रोड, समता नगर भागात १३ अनधिकृत नळ जोडण्यांचे कनेक्शन बंद करण्यात आले आहे़ दोन दिवसांत मोहिमेला गती येईल़ त्यानंतर अनाधिकृत कनेक्शन तोडून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे़
लातूर शहर पाणीपुरवठा योजना सुरळीत चालविण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत़ सर्व जलकुंभावरील अनधिकृत नळ जोडण्यांचा शोध घेऊन त्याची नोंदणी करणे, रजिस्टरमध्ये नोंद झाल्यावर त्याच्या याद्या तयार करणे, तसेच तात्काळ जोडणी बंद करण्याची कार्यवाही संबंधित जलकुंभावरील पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्यांच्या मार्गदर्शनात करण्याच्या सूचना नगर अभियंत्यांनी दिल्या आहेत़ शाखा अभियंता यु़डी़ स्वामी, एस़एनक़ाझी, पी़सी़घंटे, आऱ एम़मुंढे, डी़डी़ बिराजदार, श्रीमती यु़ एच़ शिंदे यांच्या मार्गदर्शनात कार्यवाही मोहीम राबविण्यात येणार असून एकाच वेळी २० कर्मचारी संबंधित भागात मोहीम राबवतील, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे अभियंता डी़जी़यादव यांनी दिली़