शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वसतिगृहातील दूषित पाण्याच्या बाधेची व्याप्ती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:30 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहातील ५० पेक्षा अधिक मुलींना दूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाबचा त्रास सुरू आहे. यामध्ये मंगळवारी आणखी मोठी भर पडली. रसायनशास्त्र विभागातील २५ पेक्षा अधिक मुलींनी त्रास होत असल्यामुळे १ मेपासून सुरू होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देविद्यापीठ : रसायनशास्त्र विभागातील २५ पेक्षा अधिक मुलींना त्रास; संख्या ५० वर पोहोचली

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहातील ५० पेक्षा अधिक मुलींना दूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाबचा त्रास सुरू आहे. यामध्ये मंगळवारी आणखी मोठी भर पडली. रसायनशास्त्र विभागातील २५ पेक्षा अधिक मुलींनी त्रास होत असल्यामुळे १ मेपासून सुरू होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. एवढा गंभीर प्रकार होऊनही प्रशासनातर्फे दिवसभर कोणीही वसतिगृहाला भेट दिली नाही. शेवटी सायंकाळी ८ वाजता प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. त्यांनाही विद्यार्थिनींच्या रोषाचा सामना करावा लागला.विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहात दोन दिवसांपूर्वी दूषित पाणीपुरवठा झाल्यामुळे मुलींना जुलाब, उलट्यांचा त्रास सुरू झाला आहे. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी सोमवारी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना कार्यालयातच घेराव घातला होता. त्रास होत असलेल्या विद्यार्थिनींची संख्या दुसऱ्या दिवशी ५० पेक्षा अधिक झाली आहे. या विद्यार्थिनींवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली. याचवेळी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील २५ पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी त्रास होत असल्यामुळे २ मेपासून सुरू होणाºया परीक्षेला उपस्थित राहू शकत नाही. अभ्यास करण्याची मन:स्थिती नसल्यामुळे ४ दिवस परीक्षा लांबविण्याची मागणी विभागप्रमुख कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांची भेट घेऊन केली. यावर डॉ. गायकवाड यांनी प्रकुलगुरूं कडून मार्गदर्शन मागविले आहे.चौकट,कुलगुरू, कुलसचिव नॉटरिचेबलवसतिगृहातील विद्यार्थिनींची परिस्थिती बिघडत असताना कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे मंगळवारी दौºयावर रवाना झाले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. याशिवाय वसतिगृहांच्या प्रमुख कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनीही घडलेल्या प्रकारानंतर वसतिगृहाकडे जाण्याचे औदार्य दाखविले नाही. शहरातील विविध समारंभांना त्यांनी हजेरी लावली. मात्र, विद्यार्थिनी वसतिगृहाला भेट दिली नाही. याविषयी त्यांच्या कार्यालयाला भेट दिली असता, त्या कार्यक्रमाला गेल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.प्रकुलगुरूंना पुन्हा घातला घेरावप्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी सायंकाळी ८ वाजता विद्यार्थिनी वसतिगृहाला भेट दिली. तेव्हा संतप्त विद्यार्थिनींना त्यांना घेराव घालत संताप व्यक्त केला. उद्या दिवसभरात सर्व परिस्थिती आटोक्यात आणली जाईल, सर्वांना स्वच्छ पाणी पिण्यास मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. एसएफआय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत दोन दिवसात पाणीपुरवठा व्यवस्थित न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी स्टॅलीन आडे, लोकशे कांबळे, कावेरी गोरे, सपना वाघमारे, श्रीनिवास लटके, नम्रता कुरील, प्रतीक्षा गोरे, सारिका शिंदे, रवी खंदारे आदींची उपस्थिती होती.शिवसेना, ‘अभाविप’ची प्रशासनाला तंबीशिवसेनेचे शहर उपप्रमुख हिरा सलामपुरे, भाविसेचे संघटक डॉ. तुकाराम सराफ, पूनम सलामपुरे आदींच्या शिष्टमंडळाने विद्यार्थ्यांसह प्रकुलगुरूंची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोषी अधिकारी, कर्मचाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. विद्यार्थिनी पूनम पाटील, उत्कर्षा सदावर्ते, पूनम बनसोड, अजिंक्य वाघमारे, अजय बिडला, अतुल पाटील आदी उपस्थित होते. अभाविपच्या शिष्टमंडळानेही प्रकुलगुरूंची भेट घेतली. दोषींवर कारवाई करीत अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून तपासणी करण्याची मागणी केली. यावेळी अधिसभा तथा विद्यार्थिनी वसतिगृह समिती सदस्या डॉ. योगिता होके पाटील, महानगरमंत्री शिवा देखणे, रामेश्वर काळे, डिंपल भोजवानी, महेंद्र मुंडे आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Educationशिक्षणHealthआरोग्यWaterपाणीuniversityविद्यापीठ