शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

वसतिगृहातील दूषित पाण्याच्या बाधेची व्याप्ती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:30 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहातील ५० पेक्षा अधिक मुलींना दूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाबचा त्रास सुरू आहे. यामध्ये मंगळवारी आणखी मोठी भर पडली. रसायनशास्त्र विभागातील २५ पेक्षा अधिक मुलींनी त्रास होत असल्यामुळे १ मेपासून सुरू होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देविद्यापीठ : रसायनशास्त्र विभागातील २५ पेक्षा अधिक मुलींना त्रास; संख्या ५० वर पोहोचली

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहातील ५० पेक्षा अधिक मुलींना दूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाबचा त्रास सुरू आहे. यामध्ये मंगळवारी आणखी मोठी भर पडली. रसायनशास्त्र विभागातील २५ पेक्षा अधिक मुलींनी त्रास होत असल्यामुळे १ मेपासून सुरू होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. एवढा गंभीर प्रकार होऊनही प्रशासनातर्फे दिवसभर कोणीही वसतिगृहाला भेट दिली नाही. शेवटी सायंकाळी ८ वाजता प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. त्यांनाही विद्यार्थिनींच्या रोषाचा सामना करावा लागला.विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहात दोन दिवसांपूर्वी दूषित पाणीपुरवठा झाल्यामुळे मुलींना जुलाब, उलट्यांचा त्रास सुरू झाला आहे. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी सोमवारी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना कार्यालयातच घेराव घातला होता. त्रास होत असलेल्या विद्यार्थिनींची संख्या दुसऱ्या दिवशी ५० पेक्षा अधिक झाली आहे. या विद्यार्थिनींवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली. याचवेळी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील २५ पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी त्रास होत असल्यामुळे २ मेपासून सुरू होणाºया परीक्षेला उपस्थित राहू शकत नाही. अभ्यास करण्याची मन:स्थिती नसल्यामुळे ४ दिवस परीक्षा लांबविण्याची मागणी विभागप्रमुख कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांची भेट घेऊन केली. यावर डॉ. गायकवाड यांनी प्रकुलगुरूं कडून मार्गदर्शन मागविले आहे.चौकट,कुलगुरू, कुलसचिव नॉटरिचेबलवसतिगृहातील विद्यार्थिनींची परिस्थिती बिघडत असताना कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे मंगळवारी दौºयावर रवाना झाले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. याशिवाय वसतिगृहांच्या प्रमुख कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनीही घडलेल्या प्रकारानंतर वसतिगृहाकडे जाण्याचे औदार्य दाखविले नाही. शहरातील विविध समारंभांना त्यांनी हजेरी लावली. मात्र, विद्यार्थिनी वसतिगृहाला भेट दिली नाही. याविषयी त्यांच्या कार्यालयाला भेट दिली असता, त्या कार्यक्रमाला गेल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.प्रकुलगुरूंना पुन्हा घातला घेरावप्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी सायंकाळी ८ वाजता विद्यार्थिनी वसतिगृहाला भेट दिली. तेव्हा संतप्त विद्यार्थिनींना त्यांना घेराव घालत संताप व्यक्त केला. उद्या दिवसभरात सर्व परिस्थिती आटोक्यात आणली जाईल, सर्वांना स्वच्छ पाणी पिण्यास मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. एसएफआय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत दोन दिवसात पाणीपुरवठा व्यवस्थित न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी स्टॅलीन आडे, लोकशे कांबळे, कावेरी गोरे, सपना वाघमारे, श्रीनिवास लटके, नम्रता कुरील, प्रतीक्षा गोरे, सारिका शिंदे, रवी खंदारे आदींची उपस्थिती होती.शिवसेना, ‘अभाविप’ची प्रशासनाला तंबीशिवसेनेचे शहर उपप्रमुख हिरा सलामपुरे, भाविसेचे संघटक डॉ. तुकाराम सराफ, पूनम सलामपुरे आदींच्या शिष्टमंडळाने विद्यार्थ्यांसह प्रकुलगुरूंची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोषी अधिकारी, कर्मचाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. विद्यार्थिनी पूनम पाटील, उत्कर्षा सदावर्ते, पूनम बनसोड, अजिंक्य वाघमारे, अजय बिडला, अतुल पाटील आदी उपस्थित होते. अभाविपच्या शिष्टमंडळानेही प्रकुलगुरूंची भेट घेतली. दोषींवर कारवाई करीत अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून तपासणी करण्याची मागणी केली. यावेळी अधिसभा तथा विद्यार्थिनी वसतिगृह समिती सदस्या डॉ. योगिता होके पाटील, महानगरमंत्री शिवा देखणे, रामेश्वर काळे, डिंपल भोजवानी, महेंद्र मुंडे आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Educationशिक्षणHealthआरोग्यWaterपाणीuniversityविद्यापीठ