शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

आता वैद्यकीय कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया; ‘बायोटेक’ने केला दोन महिन्यांत कायापालट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 16:22 IST

गेवराई तांडा येथे मनपाच्या या प्रकल्पात आता शास्त्रोक्त पद्धतीने वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहर आणि परिसरातील तब्बल १३०० रुग्णालयांमधील वैद्यकीय कचऱ्यावर आता शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जात आहे. ही किमया गोवा येथील बायोटेक कंपनीने केली. एवढे करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रकल्प चालविण्यासाठी महापालिकेला एनओसी द्यायला तयार नाही.

वैद्यकीय कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचा दांडगा अनुभव असलेल्या बायोटेक कंपनीने महापालिकेची निविदा भरून प्रक्रिया करण्याचे काम मिळविले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा संनियंत्रण समितीच्या आदेशानुसार गेवराई तांडा येथील जुना प्रकल्प मनपाने ताब्यात घेतला. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवीन प्रकल्प हस्तांतरित केला. मागील दोन महिन्यांत कंपनीने प्रकल्पाचा अक्षरश: कायापालट केला. पूर्वी येथे दोन मिनिटेही थांबता येत नव्हते. एवढी प्रचंड दुर्गंधी, अस्वच्छता, कोणतेही निकष पाळले जात नव्हते. कचरा अर्धवट जाळून फेकून दिला जात होता. मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्यासह पत्रकारांनी बुधवारी या प्रकल्पाची पाहणी केली.

पूर्वी आणि आता फरक काय?१) पूर्वी उघड्यावर वैद्यकीय कचरा जाळला जात होता. मानवी शरीराच्या विविध अवयवांचा त्यात समावेश असायचा. निघणारी राख, घाण पाणी याचा निचरा शास्त्रोक्त पद्धतीने केला जात नव्हता, त्यामुळे दुर्गंधी पसरत होती.२) कचऱ्याचे निर्जंतुकीकरण होत नव्हते. कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुविधा नाहीत. दुर्गंधीने कर्मचाऱ्यांना उलट्या होत. आता संपूर्ण कचरा निर्जंतुक केला जातो. वर्गीकरणानंतर जाळण्याची प्रक्रिया केली जाते. ८०० डि. सेल्सियस तापमानात कचरा जाळला जातो.३) घाण पाण्याचा पुनर्वापर होतो. रोज पंधरा हजार लिटर पाण्याचा वापर होतो, असे या प्रकल्पाचे प्रमुख संजीवकुमार यांनी सांगितले.

१२ वाहनांद्वारे कलेक्शनबारा वाहनांच्या माध्यमातून दररोज ४ टन कचऱ्याचे संकलन केले जाते. प्रकल्पासाठी ८० कामगार नियुक्त केले आहेत. पूर्वी ८ कामगार होते. प्रत्येकाला मास्क, टोपी, बूट आणि गणवेश आहे. अत्याधुनिक पद्धतीने चालवण्यात येत असलेल्या या प्रकल्पाची पाहणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करायला तयार नाही. उलट एनओसीही देत नाही. मनपा एनओसीसाठी प्रयत्न करीत आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरGarbage Disposal Issueकचरा प्रश्न