शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

‘त्या’ अपघातग्रस्त स्कूल बसला आरटीओने आॅगस्टमध्येच दिले होते ‘फिटनेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:04 IST

‘आरटीओ’चाही हातभार : अपघातानंतर ‘फिटनेस’ रद्द करण्याचा सोपस्कार; रस्त्यावर धावणाऱ्या अन्य स्कूल बसची अवस्था शोधण्याची गरज औरंगाबाद : पंढरपूरकडे जाणाºया स्कूल बसची मागील काच निखळल्याने दोन विद्यार्थी रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. आरटीओ कार्यालयाने या बसला आॅगस्टमध्येच फिटनेस प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे स्कूल बसच्या अपघातात आरटीओ कार्यालयाचाही हातभार लागला आहे

अपघातास ‘आरटीओ’चाही हातभार : अपघातानंतर ‘फिटनेस’ रद्द करण्याचा सोपस्कार; रस्त्यावर धावणाऱ्या अन्य स्कूल बसची अवस्था शोधण्याची गरजऔरंगाबाद : पंढरपूरकडे जाणाºया स्कूल बसची मागील काच निखळल्याने दोन विद्यार्थी रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. आरटीओ कार्यालयाने या बसला आॅगस्टमध्येच फिटनेस प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे स्कूल बसच्या अपघातात आरटीओ कार्यालयाचाही हातभार लागला आहे. फिटनेस प्रमाणपत्र देणारे अधिकारी कोण आहेत आणि जिल्ह्यात धावणाºया इतर स्कूलची अवस्था काय आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे.आरटीओ कार्यालयाच्या पथकाने अपघातग्रस्त स्कू ल बसची (एमएच-२०, डब्ल्यू ९७५०) मंगळवारी तांत्रिक तपासणी केली. तपासणीदरम्यान काचेसाठी लावलेले रबर कुजल्याचे समोर आले. त्यामुळे या स्कूल बसचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) रद्द करण्यात आले. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते, मोटार वाहन निरीक्षक रवींद्र यादव, आरती देसाई यांनी ही तपासणी केली. तपासणीदरम्यान फिटनेस आणि अन्य कागदपत्रे वैध असल्याचे आढळून आले; परंतु पीयूसी नव्हते. बसची काच नेमकी कोणत्या कारणामुळे निखळली, याची तपासणी केली. तेव्हा काच बसविण्यासाठीचे रबर पॅकिंग खराब झालेले निदर्शनास आले. अगदी हाताने ओढल्यानंतर हे रबर तुटत असल्याचे आढळले.या बसची २००८ मध्ये नोंदणी झालेली आहे. दहा वर्षे झालेल्या बसला आॅगस्टमध्येच फिटनेस तपासणी करून प्रमाणपत्र देण्यात आले होते. विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होण्यासाठी बसमधील खिडक्यांची रचना, सुरक्षेसाठी लावण्यात येणारे ग्रील, पायºयांची उंची, अग्निशमन सुविधा आदींची पाहणी केली जाते; परंतु फिटनेस तपासणीच्या अवघ्या तीन महिन्यांनंतरच या बसची काच निखळून अपघाताची घटना घडली. त्यामुळे स्कूल बसच्या तपासणीकडे किती गांभीर्याने पाहिले जाते, हेदेखील समोर आले आहे. त्यामुळे झालेल्या अपघाताला आरटीओ कार्यालयदेखील दोषी असल्याचे दिसते.स्कूल बसची तपासणी करणारतांत्रिक पाहणीनंतर संबंधित बसचे फिटनेस प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले आहे. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्यासंदर्भात पोलिसांकडून अहवाल आल्यास बसचा परवाना निलंबित केला जाईल, शिवाय क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया स्कूल बसची तपासणी करून कारवाई केली जाईल, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी सांगितले.जिल्ह्यात १८८७ स्कूल बसजिल्ह्यातील १ हजार ८८७ स्कूल बस असल्याची आरटीओ कार्यालयात नोंद आहे. यामध्ये ३३२ स्कूल बस शाळेच्या मालकीच्या आहेत, तर १५५५ स्कूल बस खाजगी मालकांच्या आहेत. या सर्व वाहनांतून दररोज हजारो विद्यार्थ्यांची वाहतूक होत आहे. आरटीओ कार्यालयाने फेब्रुवारीत कारवाईचा बडगा उगारला होता. तेव्हा तब्बल १०६ स्कूल बसचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित केले; परंतु या कारवाईनंतरही अनेक बसमालकांनी आरटीओ कार्यालयात येण्याचे टाळले आहे. या बससह फिटनेस प्रमाणत्र घेणाºया बसची खरी अवस्था काय, याची गांभीर्याने पाहणी करण्याची वेळ आली आहे.केवळ १९७ शाळांमध्ये स्कूल बस समित्याविद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शाळांमध्ये परिवहन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत; परंतु बहुतांश शाळांनी समित्या स्थापन करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. आरटीओ कार्यालयात अवघ्या १९७ समित्यांची नोंद आहे. या समित्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय जिल्हास्तरीय समितीच्याही वर्षभरात केवळ १५ बैठका झालेल्या आहेत.

टॅग्स :SchoolशाळाAccidentअपघातAurangabadऔरंगाबाद