शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

एकीकडे टंचाई, दुसरीकडे अवकाळी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६३ हेक्टरचे नुकसान

By विकास राऊत | Updated: April 13, 2024 19:31 IST

२९२ शेतकऱ्यांच्या पिकांवर गारपीट

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात ९ ते ११ एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे २९२ शेतकऱ्यांचे १६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. एकीकडे टंचाई तर दुसरीकडे अवकाळी संकट अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात आहे. बागायत पिकांचे तीन दिवसांत सर्वाधिक नुकसान झाले, तर ३ जनावरांचा मृत्यू झाला. सहा मालमत्तांचे कमी-अधिक प्रमाणात पावसामुळे नुकसान झाले आहे. सिल्लोड तालुक्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला. त्यानंतर कन्नड तालुक्यातील काही गावांमध्ये नुकसान झाले. जिल्ह्यात २.१ मि. मी. अवकाळी पावसाची नोंद झाली.

दरम्यान, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी टंचाईचा आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रकल्पांत उपलब्ध पाणीसाठा, अधिग्रहित विहिरी, लाभक्षेत्रातील विहिरींच्या अधिग्रहणाबाबत भूजल अधिनियमातील तरतुदी तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदींना अनुसरून प्रस्ताव पाठवावे. पाण्याचा अतिरिक्त वापर थांबवावा, असे आदेश त्यांनी दिले. 

टँकरने पाणीपुरवठा करताना टँकरला जीपीएस लावण्यात यावे. टँकरच्या फेऱ्यांचे नियोजन करावे. त्याचे गावात रजिस्टर ठेवून त्यावर गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्या. लॉगबुक तयार करावे. टँकरच्या फेऱ्या व टँकर भरण्याचे ठिकाण याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करावी. जिल्ह्यात टंचाई उपाययोजना राबवताना जलपुनर्भरण, गाळ काढणे अशी कामे प्राधान्याने घ्यावी. जेणेकरून पुढील वर्षात टंचाई निर्माण होणार नाही, अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्ह्यातील चारा बाहेर नेऊ नये, असे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. जिल्ह्यातील चाऱ्याची बाहेर वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तसे पोलिसांना कळवावे. पशुधनासाठीही पिण्याच्या पाण्याची सोय करावी, असे ते बैठकीत म्हणाले.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीAurangabadऔरंगाबाद