शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

एकीकडे टंचाई, दुसरीकडे अवकाळी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६३ हेक्टरचे नुकसान

By विकास राऊत | Updated: April 13, 2024 19:31 IST

२९२ शेतकऱ्यांच्या पिकांवर गारपीट

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात ९ ते ११ एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे २९२ शेतकऱ्यांचे १६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. एकीकडे टंचाई तर दुसरीकडे अवकाळी संकट अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात आहे. बागायत पिकांचे तीन दिवसांत सर्वाधिक नुकसान झाले, तर ३ जनावरांचा मृत्यू झाला. सहा मालमत्तांचे कमी-अधिक प्रमाणात पावसामुळे नुकसान झाले आहे. सिल्लोड तालुक्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला. त्यानंतर कन्नड तालुक्यातील काही गावांमध्ये नुकसान झाले. जिल्ह्यात २.१ मि. मी. अवकाळी पावसाची नोंद झाली.

दरम्यान, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी टंचाईचा आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रकल्पांत उपलब्ध पाणीसाठा, अधिग्रहित विहिरी, लाभक्षेत्रातील विहिरींच्या अधिग्रहणाबाबत भूजल अधिनियमातील तरतुदी तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदींना अनुसरून प्रस्ताव पाठवावे. पाण्याचा अतिरिक्त वापर थांबवावा, असे आदेश त्यांनी दिले. 

टँकरने पाणीपुरवठा करताना टँकरला जीपीएस लावण्यात यावे. टँकरच्या फेऱ्यांचे नियोजन करावे. त्याचे गावात रजिस्टर ठेवून त्यावर गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्या. लॉगबुक तयार करावे. टँकरच्या फेऱ्या व टँकर भरण्याचे ठिकाण याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करावी. जिल्ह्यात टंचाई उपाययोजना राबवताना जलपुनर्भरण, गाळ काढणे अशी कामे प्राधान्याने घ्यावी. जेणेकरून पुढील वर्षात टंचाई निर्माण होणार नाही, अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्ह्यातील चारा बाहेर नेऊ नये, असे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. जिल्ह्यातील चाऱ्याची बाहेर वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तसे पोलिसांना कळवावे. पशुधनासाठीही पिण्याच्या पाण्याची सोय करावी, असे ते बैठकीत म्हणाले.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीAurangabadऔरंगाबाद