शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

एकीकडे टंचाई, दुसरीकडे अवकाळी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६३ हेक्टरचे नुकसान

By विकास राऊत | Updated: April 13, 2024 19:31 IST

२९२ शेतकऱ्यांच्या पिकांवर गारपीट

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात ९ ते ११ एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे २९२ शेतकऱ्यांचे १६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. एकीकडे टंचाई तर दुसरीकडे अवकाळी संकट अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात आहे. बागायत पिकांचे तीन दिवसांत सर्वाधिक नुकसान झाले, तर ३ जनावरांचा मृत्यू झाला. सहा मालमत्तांचे कमी-अधिक प्रमाणात पावसामुळे नुकसान झाले आहे. सिल्लोड तालुक्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला. त्यानंतर कन्नड तालुक्यातील काही गावांमध्ये नुकसान झाले. जिल्ह्यात २.१ मि. मी. अवकाळी पावसाची नोंद झाली.

दरम्यान, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी टंचाईचा आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रकल्पांत उपलब्ध पाणीसाठा, अधिग्रहित विहिरी, लाभक्षेत्रातील विहिरींच्या अधिग्रहणाबाबत भूजल अधिनियमातील तरतुदी तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदींना अनुसरून प्रस्ताव पाठवावे. पाण्याचा अतिरिक्त वापर थांबवावा, असे आदेश त्यांनी दिले. 

टँकरने पाणीपुरवठा करताना टँकरला जीपीएस लावण्यात यावे. टँकरच्या फेऱ्यांचे नियोजन करावे. त्याचे गावात रजिस्टर ठेवून त्यावर गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्या. लॉगबुक तयार करावे. टँकरच्या फेऱ्या व टँकर भरण्याचे ठिकाण याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करावी. जिल्ह्यात टंचाई उपाययोजना राबवताना जलपुनर्भरण, गाळ काढणे अशी कामे प्राधान्याने घ्यावी. जेणेकरून पुढील वर्षात टंचाई निर्माण होणार नाही, अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्ह्यातील चारा बाहेर नेऊ नये, असे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. जिल्ह्यातील चाऱ्याची बाहेर वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तसे पोलिसांना कळवावे. पशुधनासाठीही पिण्याच्या पाण्याची सोय करावी, असे ते बैठकीत म्हणाले.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीAurangabadऔरंगाबाद