शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

स्वच्छता अभियानाला टंचाईचा ब्रेक

By admin | Updated: June 23, 2014 00:24 IST

बाळासाहेब जाधव , लातूर गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यावर अवर्षणाचे ढग दाटून राहिल्याने त्याचा परिणाम स्वच्छता अभियानावरही झाला आहे.

बाळासाहेब जाधव , लातूरगेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यावर अवर्षणाचे ढग दाटून राहिल्याने त्याचा परिणाम स्वच्छता अभियानावरही झाला आहे. चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यास देण्यात आलेले शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट अडीच महिन्यानंतरही १० टक्क्यांच्या आतच राहिले आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानाची यावेळी पाणीटंचाईने मोठीच गोची केली आहे. एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या आर्थिक वर्षात शौचालय बांधकामात लातूर जिल्हा परिषद राज्यात पहिल्या तीनमध्ये होती. गतवेळी २१ हजार ५५४ शौचालय बांधकामांचे उद्दिष्ट जिल्ह्यास देण्यात आले होते. परंतु, त्याहून चार हजार अधिक शौचालये बांधण्यात आली. जवळपास १२० टक्के उद्दिष्ट जिल्हा परिषदेने गाठले होते. या कामामुळे लातूर जिल्हा परिषद राज्यात तिसरी, तर औरंगाबाद विभागात पहिल्या क्रमांकावर राहिली. दरम्यान, एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यास ३६ हजार ३३ शौचालय बांधकामांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी लातूर तालुक्यास २७८०, औसा २९१९, निलंगा ३०६६, शिरूर अनंतपाळ ३१८३, देवणी १७८२, उदगीर १२०६२, जळकोट २१४२, अहमदपूर २५११, चाकूर २९९०, तर रेणापूर तालुक्यास २५९१ शौचालय बांधकामांचे उद्दिष्ट आहे. परंतु, या कामावर यंदा पाणीटंचाईचे सावट राहिले. गावोगाव पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने बांधकामांवर परिणाम झाला. शिवाय, दोन महिने लोकसभा निवडणूक प्रक्रियेत गेल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पाठपुरावाही कमी राहिला. त्याचा परिणाम अभियानावर होऊन अडीच महिन्यांत उद्दिष्ट १० टक्क्यांच्या आतच राहिले आहे. एप्रिल, मे महिन्यात २३१० शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. शिवाय, जवळपास दोन हजार शौचालयांचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत. पहिल्या तिमाहीतील बॅकलॉग भरून काढण्यासाठी आता जिल्हा परिषदेला स्वच्छता अभियानात मोठा वेग घ्यावा लागणार आहे. अनुदान बँक खात्यावर...एखाद्या कुटुंबाने शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून त्याचा प्रस्ताव ग्रामसेवकामार्फत पंचायत समितीकडे सादर केल्यास त्याची पाहणी करून कुटुंबप्रमुखास ४६०० रुपये अनुदान देण्यात येत आहे. दरम्यान, हे अनुदान कुटुंबप्रमुखाच्या बँक खात्यावरच जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर उदगीर व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील लाभार्थ्यांना बँक खात्यावर अनुदान देण्यात आले आहे. टप्प्या-टप्प्याने जिल्ह्यातील इतरही तालुक्यांत त्याच पद्धतीने अनुदान वाटप होणार आहे. दोन महिन्यांत गावे हागणदारीमुक्त...गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत शौचालयासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली़ पाण्याच्या टंचाईमुळे शौचालयांची कामे काही प्रमाणात रखडली आहेत; परंतु जिल्यातील ५२ गावांतील शौचालयांची कामे १५ आॅगस्टपर्यंत पूर्ण करणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़पाणीटंचाईचा परिणाम... गतवर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पाणीटंचाईचे सावट जिल्ह्यावर राहिले आहे. त्यामुळे बांधकामावर परिणाम झाला. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या कामकाजात अधिकारी राहिल्याने शौचालयाच्या कामाला खिळ बसली. परिणामी, उद्दिष्टपूर्ती होऊ शकली नाही. एप्रिल, मे या दोन महिन्यांत केवळ २ हजार ३१० शौचालयाचे बांधकाम झाले आहेत. केवळ १० टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद आता उद्दिष्टपूर्तीसाठी सरसावली आहे. दोन महिन्यांत गावे हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे.