शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

स्वच्छता अभियानाला टंचाईचा ब्रेक

By admin | Updated: June 23, 2014 00:24 IST

बाळासाहेब जाधव , लातूर गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यावर अवर्षणाचे ढग दाटून राहिल्याने त्याचा परिणाम स्वच्छता अभियानावरही झाला आहे.

बाळासाहेब जाधव , लातूरगेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यावर अवर्षणाचे ढग दाटून राहिल्याने त्याचा परिणाम स्वच्छता अभियानावरही झाला आहे. चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यास देण्यात आलेले शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट अडीच महिन्यानंतरही १० टक्क्यांच्या आतच राहिले आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानाची यावेळी पाणीटंचाईने मोठीच गोची केली आहे. एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या आर्थिक वर्षात शौचालय बांधकामात लातूर जिल्हा परिषद राज्यात पहिल्या तीनमध्ये होती. गतवेळी २१ हजार ५५४ शौचालय बांधकामांचे उद्दिष्ट जिल्ह्यास देण्यात आले होते. परंतु, त्याहून चार हजार अधिक शौचालये बांधण्यात आली. जवळपास १२० टक्के उद्दिष्ट जिल्हा परिषदेने गाठले होते. या कामामुळे लातूर जिल्हा परिषद राज्यात तिसरी, तर औरंगाबाद विभागात पहिल्या क्रमांकावर राहिली. दरम्यान, एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यास ३६ हजार ३३ शौचालय बांधकामांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी लातूर तालुक्यास २७८०, औसा २९१९, निलंगा ३०६६, शिरूर अनंतपाळ ३१८३, देवणी १७८२, उदगीर १२०६२, जळकोट २१४२, अहमदपूर २५११, चाकूर २९९०, तर रेणापूर तालुक्यास २५९१ शौचालय बांधकामांचे उद्दिष्ट आहे. परंतु, या कामावर यंदा पाणीटंचाईचे सावट राहिले. गावोगाव पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने बांधकामांवर परिणाम झाला. शिवाय, दोन महिने लोकसभा निवडणूक प्रक्रियेत गेल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पाठपुरावाही कमी राहिला. त्याचा परिणाम अभियानावर होऊन अडीच महिन्यांत उद्दिष्ट १० टक्क्यांच्या आतच राहिले आहे. एप्रिल, मे महिन्यात २३१० शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. शिवाय, जवळपास दोन हजार शौचालयांचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत. पहिल्या तिमाहीतील बॅकलॉग भरून काढण्यासाठी आता जिल्हा परिषदेला स्वच्छता अभियानात मोठा वेग घ्यावा लागणार आहे. अनुदान बँक खात्यावर...एखाद्या कुटुंबाने शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून त्याचा प्रस्ताव ग्रामसेवकामार्फत पंचायत समितीकडे सादर केल्यास त्याची पाहणी करून कुटुंबप्रमुखास ४६०० रुपये अनुदान देण्यात येत आहे. दरम्यान, हे अनुदान कुटुंबप्रमुखाच्या बँक खात्यावरच जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर उदगीर व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील लाभार्थ्यांना बँक खात्यावर अनुदान देण्यात आले आहे. टप्प्या-टप्प्याने जिल्ह्यातील इतरही तालुक्यांत त्याच पद्धतीने अनुदान वाटप होणार आहे. दोन महिन्यांत गावे हागणदारीमुक्त...गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत शौचालयासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली़ पाण्याच्या टंचाईमुळे शौचालयांची कामे काही प्रमाणात रखडली आहेत; परंतु जिल्यातील ५२ गावांतील शौचालयांची कामे १५ आॅगस्टपर्यंत पूर्ण करणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़पाणीटंचाईचा परिणाम... गतवर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पाणीटंचाईचे सावट जिल्ह्यावर राहिले आहे. त्यामुळे बांधकामावर परिणाम झाला. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या कामकाजात अधिकारी राहिल्याने शौचालयाच्या कामाला खिळ बसली. परिणामी, उद्दिष्टपूर्ती होऊ शकली नाही. एप्रिल, मे या दोन महिन्यांत केवळ २ हजार ३१० शौचालयाचे बांधकाम झाले आहेत. केवळ १० टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद आता उद्दिष्टपूर्तीसाठी सरसावली आहे. दोन महिन्यांत गावे हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे.