टंचाईच्या झळा तीव्र; टँकरने गाठले शतक
By Admin | Updated: April 1, 2015 00:56 IST2015-04-01T00:46:39+5:302015-04-01T00:56:56+5:30
जालना : जिल्ह्यातील ९४ गावे आणि २१ वाड्यांना ११३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात अंबड तालुक्यात सर्वाधिक ४१ टँकरने बदनापूर तालुक्यात २६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

टंचाईच्या झळा तीव्र; टँकरने गाठले शतक
जालना : जिल्ह्यातील ९४ गावे आणि २१ वाड्यांना ११३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात अंबड तालुक्यात सर्वाधिक ४१ टँकरने बदनापूर तालुक्यात २६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर जिल्ह्यातील २२८ गावांसाठी २२६ विहिरी अधिग्रहन करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या ५० टक्केपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती ओढावलेली आहे. कमी पावसामुळे या वर्षी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. तसेच काही ठिकाणी धरणेही कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील ९४ गावे आणि २१ वाड्यांमधील २ लाख ९ हजार ८५४ ग्रामस्थांना पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. या लोकांसाठी प्रशासनाने ११३ टँकरद्वारे २५८ खेपा करून पाणी पुरवठा सुरू केला आहे.
जालना तालुक्यातील विरेगाव, सोलगव्हाण, नेर, डुकरी पिंप्री, सेवली, वरखेडा, मोती गव्हाण, एरंडवडगाव या सात गावांत १० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच ५९ गावांसाठी ६१ विहिरींचे अधिग्रहन करण्यात आले.
बदनापूर तालुक्यात २१ गावे आणि ६ वाड्यांना २६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यात रोषणगाव, धोपटेश्वर, बदनापूर, दगडवाडी, दुधनवाडी, कडेगाव, वाघु्रळ, बाजार वाहेगाव, देव पिंपळगाव, राजेवाडी, वंजारवाडी, ढोकसाळ, अकोला, भाकरवाडी, मांजरगाव, वरूडी, शेलगाव, वाकुळणी, मेहुणा, चिखली या गावांचा समावेश आहे. तसेच तालुक्यातील ३८ गावांसाठी ४० विहिरींचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे.
भोकरदन तालुक्यातील सावरखेडा, तळेगाववाडी, विटा, रामनगर, पिंप्री, पळसखेडा लोणगाव, या पाच गावात सात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. तसेच सात विहिरींचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे.
जाफराबाद तालुक्यातील भातोडी, ठोकवाडी, कुंभारी, पापळ, दुनगाव, यागावात पाच टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात येत आहे. तसेच ८ विहीरीचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. परतूर तालुक्यात मागील आठवड्यापर्यंत एकही टँकरर सुरू नव्हते. या आठवड्यात तालुक्यातील सुरूमगाव येथे एका टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. तर तालुक्यातील १० गावांसाठी ९ विहिरींचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
मंठा तालुक्यातील मंठा शहर, हिवरखेडा, पांगरी गोसावी, कंठाळा, गुलखंड या पाच गावात पाच टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच ५ विहीरीचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी, मच्छिंद्रनाथ चिंचोली, राणी उंचेगाव, रवना, राहेरा, राहेरातांडा, बाहिरगाव, शिंदे वडगाव, पांडोळी, देव हिवरा, देवहिवरा वस्ती, देवनगर तांडा, डहाळेगाव, डहाळेगाव तांडा, रांजणी, चित्रवडगाव, भेंडाळा, बोरगाव, बोरगा खुर्द, जांबसमर्र्थ, शिंदखेड तांडा, चित्रवडगाव, बेलगाव, रामगव्हाण खुर्द, या गावांना आणि वाड्यांना २ शासकीय व १६ खाजगी असे १८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच ४८ गावांसाठी ४४५विहीरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)