शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

...म्हणे औरंगाबादेत २०० चार्जिंग स्टेशन; पण कागदावरच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 17:55 IST

चार्जिंग स्टेशन स्मार्ट सिटी कार्यालयापर्यंतच मर्यादित

औरंगाबाद : कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी केंद्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर जास्तीत जास्त वाढविण्याचे धोरण आखले आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांना सबसिडीसुद्धा दिली जात आहे. औरंगाबाद महापालिकेने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात तब्बल २०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याची घोषणा सहा महिन्यांपूर्वी केली. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून हे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. स्मार्ट सिटीचे कार्यालय वगळता उर्वरित स्टेशन कागदावरच आहेत.

वातावरणीय बदलाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवणार असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने विविध उपाययोजना राबविण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयांनी खरेदी करण्याची सूचना करण्यात आली आहे. १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून ८५ टक्के निधी ई-वाहने, ई-चार्जिंग सेंटर यावर खर्च केला जाईल, असेही जाहीर करण्यात आले होते.

महापालिकेने स्मार्ट सिटीच्या सहकार्याने वातावरणीय बदलाचा परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. स्मार्ट सिटी कार्यालयाने पाच ई-वाहने खरेदी केली असून, महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी १५ व्या वित्त आयोगातून ई-वाहने खरेदी केली जातील. त्यासोबतच ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात २०० ठिकाणी चार्जिंग सेंटर उभारले जातील. महापालिकेच्या कार्यालयापासून त्याची सुरुवात केली जाईल. सर्व सरकारी कार्यालयात ई-चार्जिंग सेंटर राहणार असून पेट्रोल पंप, मॉल, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, व्यापारी संकुल या ठिकाणीही ई-चार्जिंग सेंटर केले जाणार असल्याचे जाहीर केले होते.

स्मार्ट सिटीत ३ स्टेशनसध्या स्मार्ट सिटीच्या कार्यालयात तीन चार्जिंग स्टेशन उभारले आहेत. त्याचप्रमाणे मध्यवर्ती जकात नाका येथील पेट्रोल पंपावरही चार्जिंगची सोय आहे. चार्जिंगचे दर काय असतील, हे नंतर ठरणार आहे. मात्र सर्वसामान्यांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रियाही मनपाने सुरू केली नाही.

वाहन संख्या वाढू लागलीपेट्रोल, डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे अनेक नागरिक ई-दुचाकीचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्याचप्रमाणे चारचाकी वाहनांची संख्याही शहरात बऱ्यापैकी वाढली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन असणे आवश्यक आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका