शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणे औरंगाबादेत २०० चार्जिंग स्टेशन; पण कागदावरच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 17:55 IST

चार्जिंग स्टेशन स्मार्ट सिटी कार्यालयापर्यंतच मर्यादित

औरंगाबाद : कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी केंद्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर जास्तीत जास्त वाढविण्याचे धोरण आखले आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांना सबसिडीसुद्धा दिली जात आहे. औरंगाबाद महापालिकेने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात तब्बल २०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याची घोषणा सहा महिन्यांपूर्वी केली. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून हे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. स्मार्ट सिटीचे कार्यालय वगळता उर्वरित स्टेशन कागदावरच आहेत.

वातावरणीय बदलाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवणार असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने विविध उपाययोजना राबविण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयांनी खरेदी करण्याची सूचना करण्यात आली आहे. १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून ८५ टक्के निधी ई-वाहने, ई-चार्जिंग सेंटर यावर खर्च केला जाईल, असेही जाहीर करण्यात आले होते.

महापालिकेने स्मार्ट सिटीच्या सहकार्याने वातावरणीय बदलाचा परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. स्मार्ट सिटी कार्यालयाने पाच ई-वाहने खरेदी केली असून, महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी १५ व्या वित्त आयोगातून ई-वाहने खरेदी केली जातील. त्यासोबतच ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात २०० ठिकाणी चार्जिंग सेंटर उभारले जातील. महापालिकेच्या कार्यालयापासून त्याची सुरुवात केली जाईल. सर्व सरकारी कार्यालयात ई-चार्जिंग सेंटर राहणार असून पेट्रोल पंप, मॉल, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, व्यापारी संकुल या ठिकाणीही ई-चार्जिंग सेंटर केले जाणार असल्याचे जाहीर केले होते.

स्मार्ट सिटीत ३ स्टेशनसध्या स्मार्ट सिटीच्या कार्यालयात तीन चार्जिंग स्टेशन उभारले आहेत. त्याचप्रमाणे मध्यवर्ती जकात नाका येथील पेट्रोल पंपावरही चार्जिंगची सोय आहे. चार्जिंगचे दर काय असतील, हे नंतर ठरणार आहे. मात्र सर्वसामान्यांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रियाही मनपाने सुरू केली नाही.

वाहन संख्या वाढू लागलीपेट्रोल, डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे अनेक नागरिक ई-दुचाकीचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्याचप्रमाणे चारचाकी वाहनांची संख्याही शहरात बऱ्यापैकी वाढली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन असणे आवश्यक आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका