४० गावांच्या अभिलेखांचे जतन

By Admin | Updated: April 1, 2015 01:00 IST2015-04-01T00:47:49+5:302015-04-01T01:00:31+5:30

लातूर : लातूर जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार केला आहे़ या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यालयीन गतिमानता आणण्याचे कार्य केले जात आहे़

Save the records of 40 villages | ४० गावांच्या अभिलेखांचे जतन

४० गावांच्या अभिलेखांचे जतन


लातूर : लातूर जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार केला आहे़ या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यालयीन गतिमानता आणण्याचे कार्य केले जात आहे़ त्या अंतर्गत सर्व्हेनंबरची टीपण, आकार बंद, एकत्रिकरण योजनेचे पुस्तक, पक्का बुक तसेच ब्रिटीश काळातील असणारे ४० गावांचे सर्व जुने अभिलेखांचे स्कॅनिंग एका महिन्यात पूर्ण केले आहे़ तसेच दुसऱ्या टप्प्यात ८९ गावांचे स्कॅनिंगही पूर्ण केले जाणार आहे़
लातूर येथील भूमी अभिलेख कार्यालयाने राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अभियाना अंतर्गत आपल्या कार्यालयाची गतीमानता वाढवण्यासाठी कार्यालयात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार केला आहे़ त्यात आॅनलाईन मोजणी प्रणाली, फेरफार करणे, आदी सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत़
शासनाच्या निर्देशानुसार ब्रिटीशकालीन तसेच त्यानंतरचे अभिलेखे जतन करण्याची मोहीम शासनाने हाती घेतली आहे़ या मोहिमेत एका महिन्यात ४० गावांचे जुने अभिलेख्याचे स्कॅनिंग करण्यात आले आहे़ या जुन्या अभिलेखात आकार बंद, एकत्रिकरण योजनेचे पुस्तक,पक्का बुक, आणि टीपण यांचा समावेश आहे़ ११९ गावांचे टीपण या अभिलेख्याचे स्कॅनिंग पूर्ण करण्यात आले आहे़ तर ८९ गावांच्या अभिलेखांचे काम सुरू असून येत्या महिन्यात काम पूर्ण करणार असल्याचे उपअधिक्षक दिनेश ढोकले यांनी सांगीतले़ तसेच १९९४ नंतर सिटीसर्व्हेंचे कार्यालय बंद झाल्यानंतर मागील काही दिवसांत लातूर तालुक्यातील जेवळी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील थेरगांवचे मोजणी करून आखिवपत्रीका तयार केले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Save the records of 40 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.