शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

लिलावातून सरपंच, उपसरपंचासह सदस्य निवडले; आता उपसरपंच म्हणतो सर्वांची निवड रद्द करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 13:29 IST

निवडून आलेल्या उपसरपंचांचीच फेरनिवडणूक घेण्यासाठी उच्च न्यायालयात धाव

औरंगाबाद : लोकशाहीला हरताळ फासून प्रत्यक्ष मतदान न घेता सरपंच, उपसरपंच आणि ८ सदस्य एकूण २८ लाख ५६ हजार रुपयांची बोली लावून (लिलावाद्वारे) औरंगाबाद जिल्ह्यातील ‘सेलूद’ ग्रामपंचायतीमध्ये निवडून आले. मात्र, ४ लाखांची बोली लावून निवडून आलेल्यांपैकी उपसरपंच राजू गणपत म्हस्के यांचा अंतरात्मा जागा झाला. त्यांनी पदाचा राजीनामा देऊन ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत थेट औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन निवडून आलेल्या ग्रामपंचायतीची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करून व सर्व पदाधिकाऱ्यांची निवड रद्द करून फेरनिवडणूक घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली आहे.

या याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील आणि न्या. संतोष चपळगावकर यांनी प्रतिवादी राज्य निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, निवडून आलेले सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. या याचिकेवर ३ आठवड्यांनंतर पुढील सुनावणी आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यात सेलूद ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा जाहीर झाली. मात्र, प्रत्यक्ष मतदान न घेता ग्रामस्थांनी सभा बोलावून त्यात इच्छुक उमेदवारांनी पदनिहाय लाखो रुपयांची बोली लावली. सर्वाधिक बोली लावणारा उमेदवार त्या पदावर निवडून आल्याचे घोषित केले. सरपंच पदासाठी सर्वाधिक म्हणजे १४ लाख ५० हजार रुपये आणि उपसरपंचपदासाठी ४ लाख रुपये बोली लागली. तर उर्वरित ८ सदस्यपदांसाठी एकूण १० लाख ६ हजार रुपयांची बोली लागली होती. अशाप्रकारे पदाधिकाऱ्यांच्या बोलीद्वारे जमा झालेले २८ लाख ५६ हजार रुपये लाडसावंगी येथील नमोकार अर्बन को-ऑप. बँकेत जमा करण्यात आले. दरम्यान, निवडून आलेले उपसरपंच राजू म्हस्के यांनी वरीलप्रमाणे याचिका दाखल केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठgram panchayatग्राम पंचायत