शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

लिलावातून सरपंच, उपसरपंचासह सदस्य निवडले; आता उपसरपंच म्हणतो सर्वांची निवड रद्द करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 13:29 IST

निवडून आलेल्या उपसरपंचांचीच फेरनिवडणूक घेण्यासाठी उच्च न्यायालयात धाव

औरंगाबाद : लोकशाहीला हरताळ फासून प्रत्यक्ष मतदान न घेता सरपंच, उपसरपंच आणि ८ सदस्य एकूण २८ लाख ५६ हजार रुपयांची बोली लावून (लिलावाद्वारे) औरंगाबाद जिल्ह्यातील ‘सेलूद’ ग्रामपंचायतीमध्ये निवडून आले. मात्र, ४ लाखांची बोली लावून निवडून आलेल्यांपैकी उपसरपंच राजू गणपत म्हस्के यांचा अंतरात्मा जागा झाला. त्यांनी पदाचा राजीनामा देऊन ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत थेट औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन निवडून आलेल्या ग्रामपंचायतीची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करून व सर्व पदाधिकाऱ्यांची निवड रद्द करून फेरनिवडणूक घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली आहे.

या याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील आणि न्या. संतोष चपळगावकर यांनी प्रतिवादी राज्य निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, निवडून आलेले सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. या याचिकेवर ३ आठवड्यांनंतर पुढील सुनावणी आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यात सेलूद ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा जाहीर झाली. मात्र, प्रत्यक्ष मतदान न घेता ग्रामस्थांनी सभा बोलावून त्यात इच्छुक उमेदवारांनी पदनिहाय लाखो रुपयांची बोली लावली. सर्वाधिक बोली लावणारा उमेदवार त्या पदावर निवडून आल्याचे घोषित केले. सरपंच पदासाठी सर्वाधिक म्हणजे १४ लाख ५० हजार रुपये आणि उपसरपंचपदासाठी ४ लाख रुपये बोली लागली. तर उर्वरित ८ सदस्यपदांसाठी एकूण १० लाख ६ हजार रुपयांची बोली लागली होती. अशाप्रकारे पदाधिकाऱ्यांच्या बोलीद्वारे जमा झालेले २८ लाख ५६ हजार रुपये लाडसावंगी येथील नमोकार अर्बन को-ऑप. बँकेत जमा करण्यात आले. दरम्यान, निवडून आलेले उपसरपंच राजू म्हस्के यांनी वरीलप्रमाणे याचिका दाखल केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठgram panchayatग्राम पंचायत