शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

लिलावातून सरपंच, उपसरपंचासह सदस्य निवडले; आता उपसरपंच म्हणतो सर्वांची निवड रद्द करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 13:29 IST

निवडून आलेल्या उपसरपंचांचीच फेरनिवडणूक घेण्यासाठी उच्च न्यायालयात धाव

औरंगाबाद : लोकशाहीला हरताळ फासून प्रत्यक्ष मतदान न घेता सरपंच, उपसरपंच आणि ८ सदस्य एकूण २८ लाख ५६ हजार रुपयांची बोली लावून (लिलावाद्वारे) औरंगाबाद जिल्ह्यातील ‘सेलूद’ ग्रामपंचायतीमध्ये निवडून आले. मात्र, ४ लाखांची बोली लावून निवडून आलेल्यांपैकी उपसरपंच राजू गणपत म्हस्के यांचा अंतरात्मा जागा झाला. त्यांनी पदाचा राजीनामा देऊन ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत थेट औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन निवडून आलेल्या ग्रामपंचायतीची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करून व सर्व पदाधिकाऱ्यांची निवड रद्द करून फेरनिवडणूक घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली आहे.

या याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील आणि न्या. संतोष चपळगावकर यांनी प्रतिवादी राज्य निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, निवडून आलेले सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. या याचिकेवर ३ आठवड्यांनंतर पुढील सुनावणी आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यात सेलूद ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा जाहीर झाली. मात्र, प्रत्यक्ष मतदान न घेता ग्रामस्थांनी सभा बोलावून त्यात इच्छुक उमेदवारांनी पदनिहाय लाखो रुपयांची बोली लावली. सर्वाधिक बोली लावणारा उमेदवार त्या पदावर निवडून आल्याचे घोषित केले. सरपंच पदासाठी सर्वाधिक म्हणजे १४ लाख ५० हजार रुपये आणि उपसरपंचपदासाठी ४ लाख रुपये बोली लागली. तर उर्वरित ८ सदस्यपदांसाठी एकूण १० लाख ६ हजार रुपयांची बोली लागली होती. अशाप्रकारे पदाधिकाऱ्यांच्या बोलीद्वारे जमा झालेले २८ लाख ५६ हजार रुपये लाडसावंगी येथील नमोकार अर्बन को-ऑप. बँकेत जमा करण्यात आले. दरम्यान, निवडून आलेले उपसरपंच राजू म्हस्के यांनी वरीलप्रमाणे याचिका दाखल केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठgram panchayatग्राम पंचायत