शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

निराधार योजनेचा बट्ट्याबोळ; पैसे असूनही लाभार्थी वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 4:29 PM

संजय गांधी निराधार योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून, खात्यात पैसे असूनही शेकडो लाभार्थी लाभापासून वंचित राहत आहेत.

- स.सो. खंडाळकर  

औरंगाबाद : युती शासनाच्या काळात संजय गांधी निराधार योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून, खात्यात पैसे असूनही शेकडो लाभार्थी लाभापासून वंचित राहत आहेत. यात वयोवृद्ध लाभार्थ्यांचे कंबरडे रोज रोज बँकेत जाऊन व बँकेने टोलवाटोलवी केली की, पुन्हा संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात चकरा मारून मारून मोडत आहे. 

‘अकाऊंट ब्लॉकड्’ असे शेरे मारलेले कागद हातात घेऊन हे लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार भवनात रोजच येत आहेत. याच आधार भवनात संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालय आहे. तेथे कर्मचाऱ्यांची प्रचंड वानवा आहे. पूर्णवेळ  तहसीलदार नाही.  सतत बैठका होण्याचा सिलसिला नाही.  

पासबुकही देत नाहीत... सुमारे चार हजार लाभार्थ्यांना बँक पासबुकच द्यायला तयार नसल्याची धक्कादायक माहिती ऐकावयास मिळाली. ३० लाभार्थ्यांच्या खात्यात त्यांच्या मानधनाचे पैसे जमा आहेत; परंतु येनकेनप्रकारेण बँक द्यायला तयार नसल्याने अनेक लाभार्थी या लाभापासून गेले नऊ महिन्यांपासून वंचित आहेत. ‘अब मरने को आ गये. तोभी पैसे नहीं मिल रहे है,’ अशा शब्दात आपला संताप एका लाभार्थ्याने व्यक्त केला. 

जिथे काम जास्त तेथेच कर्मचारी कमीस्वत: जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याची गरज आहे. बँकेतून काही अडवणूक होत असेल तर बँक अधिकाऱ्यांची बैठक बोलावली पाहिजे, संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयानेच असा कोणता गुन्हा केला आहे की, येथे पुरेसे कर्मचारी नाहीत. जिथे काम जास्त आहे, जे काम आशीर्वाद घेण्याचे आहे, माणुसकीचे आहे, निराधारांना आधार देण्याचे आहे, तेथे कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या! हेच का ते पारदर्शक व सक्षम प्रशासन? असा सवाल उपस्थित होत आहे. 

पेट्रोलचे भाव रोज वाढत आहेत. आॅटोने येणे-जाणे परवडत नाही. घरून पायीच निघतो आणि कधी बँकेत तर कधी आधार भवनात चकरा मारून जाण्यातच आमचा दिवस जातो; पण काम काही होत नाही, असे एकाआजीबाईने सांगितले. या निराधारांना न्याय मिळाला नाही तर त्यांना सोबत घेऊन आपण आता बेमुदत उपोषणास बसणार आहोत, अशी घोषणा समितीचे माजी अध्यक्ष तकी हसन खान यांनी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादgovernment schemeसरकारी योजना