शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

वाळू तस्कर मोकाट

By admin | Updated: May 13, 2014 00:56 IST

वैजापूर : तालुक्यात गोदावरी काठावर वाळूची साठेबाजी करून ठेवणारे वाळूमाफिया मोकाट असून वीरगाव पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आले नाही.

वैजापूर : तालुक्यात गोदावरी काठावर वाळूची साठेबाजी करून ठेवणारे वाळूमाफिया मोकाट असून वीरगाव पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आले नाही. माफिया फरार असल्याच्या नावाखाली पोलीस त्यांना ‘अभय’ देत असल्याचा संशय निर्माण होत आहे. तालुक्यातील गोदापात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून वाळूची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू आहे. हायवा व ट्रकसारख्या मोठ्या अवजड वाहनामधून होणार्‍या वाळू वाहतुकीमुळे तालुक्यातील गंगथडी भागातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांनी गंगथडी भागात जाऊन पाहणी केली असता त्यांना गोदानदीच्या काठावर अनेक अवैध वाळूसाठे आढळून आले. त्यामुळे लवांडे यांनी स्थानिक संबंधित अधिकार्‍यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सोमवारी उपविभागीय अधिकारी नारायण उबाळे, तहसीलदार डॉ. प्रशांत पडघन, वीरगाव पोलीस ठाण्याचे फौजदार सोनवणे, खनिकर्म अधिकारी, मंडळाधिकारी व तलाठी यांच्या पथकाने छापे टाकले होते. याप्रकरणी तालुक्यातील पुरणगाव येथील मधुकर ठोंबरे, रामा ठोंबरे, सूरज ठोंबरे, मनोठ ठोंबरे, मिथुन ठोंबरे, लाखगंगा येथील रमेश सोनवणे, प्रवीण तुरकणे, प्रभाकर पडवळ, बाभूळगावगंगा येथील सोपान तुरकणे, सुभाष तुरकणे, विठ्ठल तुरकणे, वाल्मीक तुरकणे, राजू बोराडे, जालिंदर कुंजीर व बाबासाहेब कुंजीर या १५ जणांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या कारवाईस आठ दिवसांचा कालावधी उलटूनही हे सर्व वाळूमाफिया अजून मोकाट आहेत. आठ दिवसांत पोलिसांना एकही आरोपी पकडण्यात यश आले नाही. पोलिसांना आरोपी पकडणे फारसे अवघड नाही; परंतु आरोपी खरेच फरारी आहे की पोलिसांनीच त्यांना फरारी घोषित केले? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर) गेल्या सोमवारी महसूल अधिकार्‍यांनी तालुक्यातील पुरणगाव, लाखगंगा व बाभूळगावगंगा येथील गोदावरी नदीच्या काठावर वाळूची साठेबाजी करून ठेवणार्‍या १५ माफियांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून धडाकेबाज कारवाई केली होती. उपविभागीय अधिकारी नारायण उबाळे, तहसीलदार डॉ. प्रशांत पडघन व महसूल विभागाच्या अन्य कर्मचार्‍यांच्या पथकाने तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर १५ ठिकाणी छापे टाकून ४३ लाख रुपये किमतीची १४४० ब्रास अवैध वाळू जप्त केली होती. या प्रकरणी १५ जणांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. वाळू जप्त झाली पण माफियांना पकडण्यात यश आलेले नाही. दरम्यान याबाबत वीरगाव ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डी. एन. रयतूवार यांच्याशी संपर्क साधला असता आरोपींचा आम्ही पुणतांबा, लाखगंगा, बाभूळगावगंगा, सावखेडगंगा, भालगाव व म्हस्की येथे शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु ते सापडत नसल्याचे त्यांनी सांगितले.