शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

औरंगाबादेत १०० कोटींतून बांधण्यात येणाऱ्या रस्ते कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:55 PM

शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना सोमवारी रात्री उशिरा मंजुरी देण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला. ज्या कंत्राटदारांना ही कामे देण्यात येणार आहेत, त्यांच्यावर असंख्य आरोप आहेत.

ठळक मुद्देकंत्राटदरावर अनेक आरोप: अनेक शासकीय कार्यालयांनी त्यांना केले होते ‘ब्लॅकलिस्ट’

औरंगाबाद : शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना सोमवारी रात्री उशिरा मंजुरी देण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला. ज्या कंत्राटदारांना ही कामे देण्यात येणार आहेत, त्यांच्यावर असंख्य आरोप आहेत. विविध शासकीय कार्यालयांनी या कंत्राटदारांवर ब्लॅकलिस्टची कारवाईसुद्धा केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा कंत्राटदारांची सखोल चौकशी करा, असे आदेश मनपा प्रशासनाला दिले होते. ब्लॅकलिस्ट कंत्राटदारांना सिडको, सार्वजनिक बांधकाम विभागाने चक्क क्लीन चिट दिली. त्यामुळे मनपा प्रशासनाने १०० कोटींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली.रस्त्यांच्या कामाबाबत २ नोव्हेंबरपर्यंत महापालिकेने अंतिम निर्णय न घेतल्यास निधी परत शासनाकडे पाठविण्याचा इशारा खंडपीठाने मागील आठवड्यात दिला आहे. त्यामुळे महापालिकेत आठ दिवसांपासून जोरदार धावपळ सुरू आहे. कसेही करून प्राप्त निविदा अंतिम करण्यासाठी खटाटोप सुरू आहे. १०० कोटीतील काही कंत्राटदारांवर ब्लॅकलिस्टचे आरोप आहेत. सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या कंत्राटदारांना चक्क क्लीन चिट देऊन टाकली. त्यामुळे महापालिकेचे मनोधैर्य उंचावले होते. पैठण प्राधिकरणाची कामे बोगस केल्याच्या आरोपावरून याच कंत्राटदारांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीचा अंतिम निर्णय अद्याप आलेला नाही.१०० कोटींतील ४७ कोटींच्या कामाची फाईल अलीकडेच प्रभारी आयुक्त उदय चौधरी यांच्यासमोर ठेवण्यात आली होती. त्यांनी या वादग्रस्त फाईलवर सही करण्यास नकार दिला होता. नियमित आयुक्त डॉ. निपुण विनायक यावर अंतिम निर्णय घेतील, असे चौधरी यांनी मनपा अधिकाºयांना बजावले होते. सोमवारी सकाळी डॉ. निपुण विनायक महापालिकेत दाखल झाले. त्यांनी संबंधित अधिकाºयांसोबत बराच वेळ चर्चा केली. चर्चेनंतर १०० कोटी रुपयांची कामे मंजूर करून स्थायी समितीत पाठविण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरा या फाईलवर आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सही केली. त्यामुळे स्थायी समितीची बैठक आयोजित करण्याच्या हालचालींनाही वेग आला आहे.३ टक्के देण्याची मागणी१०० कोटींच्या रस्त्यांची कामे अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीत लवकरच येणार आहेत. त्यामुळे स्थायी समितीने आतापासून कंबर कसली आहे. रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यासाठी स्थायी समितीला ३ टक्के हवे आहेत. यातील काही कंत्राटदारांनी ३ टक्केही देण्यास होकार दर्शविला आहे. या मुद्यावरून कंत्राटदारांमध्ये जोरदार धूमश्चक्री सुरू झाली आहे. स्थायी समितीने २११ कोटींच्या कचºयाच्या ठेक्याला मंजुरी दिली. ३६ कोटींच्या मशीन खरेदीला मंजुरी दिली. तेव्हा ३ टक्के दिले होते का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका