शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

समान पाणीटंचाई धोरणात लातूर जिल्ह्याला टँकर कमीच !

By admin | Updated: September 3, 2015 00:29 IST

लातूर/औसा : प्रत्येक जिल्ह्यात समान पाणीटंचाईचा निकष लावला असल्याचा दावा शासन करीत असले तरी बीडला ७०० टँकर, उस्मानाबादला ५०० टँकर मंजूर केले आहेत.

लातूर/औसा : प्रत्येक जिल्ह्यात समान पाणीटंचाईचा निकष लावला असल्याचा दावा शासन करीत असले तरी बीडला ७०० टँकर, उस्मानाबादला ५०० टँकर मंजूर केले आहेत. मात्र २४ लाख लोकसंख्या असलेल्या लातूर जिल्ह्यात केवळ ११२ टँकर आहेत़ समान टंचाई धोरणात लातूरवर अन्याय का, असा प्रश्न लोकप्रतिनिधींसह नागरिक उपस्थित करीत आहेत़ मुख्यमंत्र्यांसमोरही लातूरकरांनी नाराजी व्यक्त करुन टँकर वाढविण्याची मागणी केली आहे़लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे़ पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे भीषण टंचाईचा सामना लातूरकरांना करावा लागत आहे़ त्यामुळे टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे़ परंतु, टँकर मंजुरीच्या प्रस्तावाला तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळत नाही़ सध्या जिल्ह्यात एकूण ५० गावांनी टँकरसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत़ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून तहसीलदारांकडे हे प्रस्ताव जातात़ प्रस्ताव आलेल्या गावांची पाहणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत केली जाते़ मागणी झालेल्या गावाच्या परिसरात किमान दीड किलोमीटर अंतरावर पाण्याचा स्त्रोत नसेल तर त्या गावच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाते़ पाण्याचा स्त्रोत दीड कि़मी़ अंतरावर असेल तर टँकरला मंजुरी दिली जात नाही़ या अटीनुसार क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा अहवाल तहसीलदारांकडे जातो़ त्यानंतर तहसीलदार टँकरला परवानगी देतात़ हे प्रशासकीय नियम आहेत़ या नियमानुसारच सध्या टँकरला मंजुरी दिली जात आहे़ त्यामुळे लातूर जिल्ह्यात टँकरची संख्या कमी आहे़ शेजारील उस्मानाबाद जिल्ह्यात ५०० टँकर तर बीड जिल्ह्यात ७०० टँकर आहेत़ आपल्याकडे मात्र ११२ टँकरने पाणीपुरवठा होत आहे़ महानगरपालिकेने स्वत:च्या अधिकारात ४६ टँकर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी लावले आहेत़ (प्रतिनिधी)लातूर जिल्ह्यात ९४२ अधिग्रहण करुन पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ अधिग्रहण केलेल्या स्त्रोतांमध्ये पाणी आहे़ हे स्त्रोत गावांच्या दीड किलोमीटर अंतराच्या आत आहेत़ त्यामुळे टँकरची संख्या कमी आहे़ अधिग्रहणावर भागत नसेल तर टँकर हा पर्याय आहे़ सध्या अधिग्रहण केलेल्या ९४२ स्त्रोतातून पाणी मिळत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे़ कमी खर्च करुन दुष्काळाच्या परिस्थितीचे निवारण केले आणि शासनाचा खर्च वाचविला अशी पाठ थोपटून घेण्यासाठी जिल्ह्यातील अधिकारी टँकरला मंजुरी देत नाहीत, अशी तक्रार शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणे केली़ लातूर, बीडची दुष्काळी परिस्थिती सारखीच आहे़ परंतु, बीडला एक आणि लातूरला एक असा न्याय का असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आला़ परंतु, मुख्यमंत्र्यांनी यावर काही भाष्य केले नाही़ परिणामी, दुजाभाव होत असल्याची भावना लातूरकरांची झाली आहे़ जिल्ह्यातील दहाही तालुक्यातून टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत़ मात्र या प्रस्तावाच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून पाहणी होत नसल्याने ते प्रलंबित आहेत़ तहसीलदारांपर्यंत क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा अहवाल आला नसल्यामुळे संबंधीत गावांना टँकरची प्रतीक्षा आहे़