शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भारतीय मुस्लीम या मातीतील; त्यांना परकीय कसे म्हणावे : डॉ. श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 10:39 IST

धर्म परका असू शकतो; परंतु त्यांचे मूळ येथील आहे, असे श्रीपाल सबनीस यांनी म्हणाले.

औरंगाबाद : देशभरात सिएए आणि एनआरसीला मोठ्याप्रमाणावर विरोध केला जात आहे. सरकार विरोधात लोकं रस्त्यावर उतरत आहे, तर अनेक कवी, लेखक, अभ्यासक आपल्या लेखणीतून या कायद्याला विरोध करत असल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, समीक्षक प्रा. श्रीपाल सबनीस यांनी सुद्धा यावर भाष्य केलं आहे.

भारतीय बहुसंख्य मुस्लिम हे या मातीतीलच आहेत. धर्मातर झाले असेल तरी त्यांना परकीय कुण्या अर्थाने म्हणावे. धर्म परका असू शकतो; परंतु त्यांचे मूळ येथील आहे, असे श्रीपाल सबनीस यांनी म्हणाले. कवी डॉ. इक्बाल मित्रेलिखित 'मी टेकले नाहीत हात अजून' या कवितासंग्रहावर मंगळवारी गांधी भवन येथे आयोजित चर्चासत्रात अध्यक्षीय समारोप्रसंगी ते बोलत होते.

तर पुढे बोलताना श्रीपाल सबनीस म्हणाले, सर्व हिंदू सनातनी आहेत, कर्मठ आहेत, असे म्हटले जाते; परंतु तसे नाही. जगात इस्लाम बदनाम करणारे इस्लामिकच आहेत; परंतु त्यांचा इस्लाम खरा नाही. त्यांचा इस्लाम महंमद पैगंबरांचा नाही. कविता ही काळजाचा भाग आहे. कविता समाजात परिवर्तन करू शकते. हे सर्व प्रवाह डॉ. इक्याल यांच्या कवितेत आहेत, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. कैलास अंभोरे, प्रा. डॉ. समिता जाधव, प्रा. शेख आरीफ ताजुद्दीन यांनी कवितासग्रहावर भाष्य केले.