शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

भारतीय मुस्लीम या मातीतील; त्यांना परकीय कसे म्हणावे : डॉ. श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 10:39 IST

धर्म परका असू शकतो; परंतु त्यांचे मूळ येथील आहे, असे श्रीपाल सबनीस यांनी म्हणाले.

औरंगाबाद : देशभरात सिएए आणि एनआरसीला मोठ्याप्रमाणावर विरोध केला जात आहे. सरकार विरोधात लोकं रस्त्यावर उतरत आहे, तर अनेक कवी, लेखक, अभ्यासक आपल्या लेखणीतून या कायद्याला विरोध करत असल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, समीक्षक प्रा. श्रीपाल सबनीस यांनी सुद्धा यावर भाष्य केलं आहे.

भारतीय बहुसंख्य मुस्लिम हे या मातीतीलच आहेत. धर्मातर झाले असेल तरी त्यांना परकीय कुण्या अर्थाने म्हणावे. धर्म परका असू शकतो; परंतु त्यांचे मूळ येथील आहे, असे श्रीपाल सबनीस यांनी म्हणाले. कवी डॉ. इक्बाल मित्रेलिखित 'मी टेकले नाहीत हात अजून' या कवितासंग्रहावर मंगळवारी गांधी भवन येथे आयोजित चर्चासत्रात अध्यक्षीय समारोप्रसंगी ते बोलत होते.

तर पुढे बोलताना श्रीपाल सबनीस म्हणाले, सर्व हिंदू सनातनी आहेत, कर्मठ आहेत, असे म्हटले जाते; परंतु तसे नाही. जगात इस्लाम बदनाम करणारे इस्लामिकच आहेत; परंतु त्यांचा इस्लाम खरा नाही. त्यांचा इस्लाम महंमद पैगंबरांचा नाही. कविता ही काळजाचा भाग आहे. कविता समाजात परिवर्तन करू शकते. हे सर्व प्रवाह डॉ. इक्याल यांच्या कवितेत आहेत, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. कैलास अंभोरे, प्रा. डॉ. समिता जाधव, प्रा. शेख आरीफ ताजुद्दीन यांनी कवितासग्रहावर भाष्य केले.