शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘समृद्धी’वरून सुसाट जाल तर वाजणार आरटीओचा ‘सायरन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 07:03 IST

वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांचे अर्धा तास समुपदेशन

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर ताशी १२० कि.मी.ची वेगमर्यादा आहे. परंतु, अनेक वाहनचालक यापेक्षा अधिक वेगाने वाहन पळवत आहेत. अशा सुसाट वाहनांचे चित्रण अद्ययावत यंत्रणेद्वारे टिपले जात आहे. इतकेच नाही तर वाहनचालक ज्या ठिकाणाहून समृद्धी महामार्गावरून बाहेर पडतील, तेथे सायरन वाजतो. या सुसाट वाहनचालकांना तेथेच थांबवून आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून आता समुपदेशन केले जात आहे. ‘समृद्धी’वर तब्बल १८० कि.मी. वेगाने वाहन चालविले जात असल्याचे आरटीओ कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. 

अतिवेगामुळेच ‘समृद्धी’वर अपघात होत असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे अतिवेगाला पायबंद घालण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून जनजागृतीबरोबर कारवाईचा बडगाही उगारला जात आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अर्धा तास थांबवून समुपदेशनाद्वारे वाहतूक नियमांचे आणि सुरक्षेचे धडे दिले जात आहेत.

गुळगुळीत टायर असलेली ३२१ वाहने माघारीआरटीओ कार्यालयाने गेल्या काही दिवसांत या महामार्गावर ५ हजार २८० वाहनांच्या टायरची तपासणी केली. त्यात गुळगुळीत टायर आढळलेल्या ३२१ वाहनांना परत पाठविली. 

किती जणांवर कारवाई?     अतिवेगाने जाणाऱ्या २१६ वाहनचालकांचे समुपदेशन     ‘समृद्धी’वर कुठेही वाहन उभे करणाऱ्या १४०१ वाहनांवर कारवाई     ५७० वाहनांवर ‘लेन कटिंग’ची कारवाई

पाच जणांचे पथक तैनात औरंगाबाद जिल्ह्यातून ११२ कि.मी. समृद्धी महामार्ग जात आहे. या अंतरात आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. त्यासाठी ५ जणांचे पथक आहे. एखादे वाहन ३०० मीटरवर असताना ते किती वेगात आहे, हे लक्षात येते, असे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सांगितले.

१६ जणांचा मृत्यू १२ जण गंभीर जिल्ह्याच्या ११२ किलोमीटरच्या हद्दीत आतापर्यंत नऊ अपघातात १६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १२ प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnagpurनागपूरAccidentअपघात