शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
2
"महात्मा गांधींना जगभरात कोणीही ओळखत नव्हतं"; पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?
3
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
4
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
5
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
6
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
7
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
8
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
9
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
10
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
11
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
12
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
13
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?
14
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?
15
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
16
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
17
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
18
Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट
19
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
20
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले

वाहून गेली १ लाख कोटींची शेतमाल उलाढाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 4:33 PM

विभागीय आयुक्तालयाचा अंदाज 

ठळक मुद्देमराठवाडा विभागात विदारक चित्र  अवकाळी पावसाने केले नुकसान

- विकास राऊत 

औरंगाबाद : मराठवाड्यातील खरीप हंगामाचे अवकाळी पावसाने नुकसान केल्यामुळे विभागातील कृषी उत्पादनातून होणाऱ्या अंदाजे १ लाख कोटींहून अधिक रुपयांच्या उलाढालीवर पाणी फेरले गेले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी नांगरणी, मोगडणी, चरी पाडणे, बियाणे, निंदणे, खत खरेदी, युरिया आणि फवारणी, अंदाजे ४ वेळा वखरणी करण्यासाठी केलेला खर्च वाया गेला. आता सरकारी मदतीविना शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही राहिले नाही. पूर्ण १०० टक्के खरीप हंगाम हाती लागला असता, तर मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा कृषी उत्पादकता वाढण्याची शक्यता होती. 

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने सुरुवातीला कमी-अधिक हजेरी लावली. आॅक्टोबर पूर्वार्धापर्यंत पिकांची पस्थिती चांगली असतानाच उत्तरार्धात परतीच्या पावसाने मराठवाड्याला झोडपले. त्यात हाती आलेल्या खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ४२ लाख हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा पिकांची उत्पादकता चांगली राहील असा अंदाज होता. मात्र, पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून नेला.

विभागात एकूण ५२ लाख ६५ हजार १६५.९६ हेक्टर खरीप हंगामाचे पेरणीलायक क्षेत्र आहे. त्यातील ४८ लाख ७० हजार १९४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. विभागातील ८ हजार ५१४ पैकी ८,४५० गावांना आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसाचा फटका बसला आहे. ४३ लाख १ हजार ४३६ पैकी ३० लाख २५ हजार ७६२ शेतकरी बाधित झाले. जिरायती आणि बागायती, फळबागा मिळून सुमारे ४१ लाख हेक्टर क्षेत्र आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे नष्ट झाले आहे. २,९०४ कोटी रुपयांची मदत शासनाकडून मिळण्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. त्यातील ८१९ कोटी रुपयांचा पहिला टप्पा विभागाला प्राप्त झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात ५०० कोटींचे अनुदान मिळणे शक्य आहे. 

विभागीय प्रशासनाचे मत असे... खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस या पिकांतून होणाऱ्या आर्थिक उलाढालीचा हिशेब केलेला नाही किंवा तशी आकडेवारी, माहिती अजून संकलित केली नाही; परंतु १ लाख कोटींहून कमी-अधिक उलाढाल होत असावी, असा अंदाज आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद