शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइं (ए)ला भाजपकडून १६ ते १८ जागा मिळतील, सेनेनेही जागा द्यायला हव्यात : अविनाश महातेकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 18:57 IST

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेलाही आमचा फायदा झालाच आहे.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांचा भरवसा वाढला...‘संविधान बदलणार’ या आवईपासून सावधान

औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून रिपाइं (ए)ला १६ ते १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेलाही आमचा फायदा झालाच आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातूनही आम्हाला जागा मिळायला पाहिजे, असा आग्रह  महाराष्ट्राचे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी धरला. 

मंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच ते औरंगाबादला आले होते. सकाळपासूनच सुभेदारी गेस्ट हाऊस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा येथे त्यांनी विविध योजनांच्या आढावा बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. 

त्यांनी सांगितले की, ८ जुलै रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत किती जागा मिळतील, संभाव्य उमेदवार कोण, अशी चर्चा झाली. भाजपच्या कोट्यातून आम्हाला १६ ते १८ जागा मिळतील. विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचा काय परिणाम राहील, असे विचारता महातेकर यांनी स्पष्टपणे सांगितले, लोकसभा निवडणुकीत झाला तसाच परिणाम होईल. 

आरक्षणाबद्दल विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना त्यांनी सांगितले, आरक्षण हे आर्थिक निकषावर देण्याची तरतूद असायला हवी. मराठा आरक्षणाला तर आमचा पूर्वीपासूनच पाठिंबा होता. धनगर व मुस्लिम आरक्षणही मिळायला पाहिजे. पण सर्वांना सोबत आणण्यासाठी आर्थिक निकषावर आरक्षण देता आले पाहिजे. 

कार्यकर्त्यांचा भरवसा वाढला...रिपाइंला मंत्रीपद मिळत नाही, या धारणेला मी मंत्री झाल्यामुळे तडा बसला आहे. यावेळी रामदास आठवले यांना मंत्री करा, अशी मागणी करण्याची वेळ आली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असून, भरवसा वाढला आहे.  त्यामुळे भाजपचे मी अभिनंदन  करतो, असे उद्गार महातेकर यांनी काढले. 

‘संविधान बदलणार’ या आवईपासून सावधानसंविधान बदलणार, असे सांगून घाबरविणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला सत्काराला उत्तर देताना महातेकर यांनी दिला. संविधान कोण बदलणार, कसे बदलणार, या प्रश्नाचे उत्तर कुणी देत नाही. संविधानात छोटे-मोठे बदल होतात; पण ते संवैधानिक मार्गानेच. ज्या दिवशी संविधान बदलेल, त्यादिवशी तुम्ही अमेरिकेचा गुलाम बनून जाल, असा इशाराही त्यांनी दिला. 

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभाAurangabadऔरंगाबाद