शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

रिपाइं (ए)ला भाजपकडून १६ ते १८ जागा मिळतील, सेनेनेही जागा द्यायला हव्यात : अविनाश महातेकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 18:57 IST

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेलाही आमचा फायदा झालाच आहे.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांचा भरवसा वाढला...‘संविधान बदलणार’ या आवईपासून सावधान

औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून रिपाइं (ए)ला १६ ते १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेलाही आमचा फायदा झालाच आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातूनही आम्हाला जागा मिळायला पाहिजे, असा आग्रह  महाराष्ट्राचे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी धरला. 

मंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच ते औरंगाबादला आले होते. सकाळपासूनच सुभेदारी गेस्ट हाऊस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा येथे त्यांनी विविध योजनांच्या आढावा बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. 

त्यांनी सांगितले की, ८ जुलै रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत किती जागा मिळतील, संभाव्य उमेदवार कोण, अशी चर्चा झाली. भाजपच्या कोट्यातून आम्हाला १६ ते १८ जागा मिळतील. विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचा काय परिणाम राहील, असे विचारता महातेकर यांनी स्पष्टपणे सांगितले, लोकसभा निवडणुकीत झाला तसाच परिणाम होईल. 

आरक्षणाबद्दल विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना त्यांनी सांगितले, आरक्षण हे आर्थिक निकषावर देण्याची तरतूद असायला हवी. मराठा आरक्षणाला तर आमचा पूर्वीपासूनच पाठिंबा होता. धनगर व मुस्लिम आरक्षणही मिळायला पाहिजे. पण सर्वांना सोबत आणण्यासाठी आर्थिक निकषावर आरक्षण देता आले पाहिजे. 

कार्यकर्त्यांचा भरवसा वाढला...रिपाइंला मंत्रीपद मिळत नाही, या धारणेला मी मंत्री झाल्यामुळे तडा बसला आहे. यावेळी रामदास आठवले यांना मंत्री करा, अशी मागणी करण्याची वेळ आली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असून, भरवसा वाढला आहे.  त्यामुळे भाजपचे मी अभिनंदन  करतो, असे उद्गार महातेकर यांनी काढले. 

‘संविधान बदलणार’ या आवईपासून सावधानसंविधान बदलणार, असे सांगून घाबरविणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला सत्काराला उत्तर देताना महातेकर यांनी दिला. संविधान कोण बदलणार, कसे बदलणार, या प्रश्नाचे उत्तर कुणी देत नाही. संविधानात छोटे-मोठे बदल होतात; पण ते संवैधानिक मार्गानेच. ज्या दिवशी संविधान बदलेल, त्यादिवशी तुम्ही अमेरिकेचा गुलाम बनून जाल, असा इशाराही त्यांनी दिला. 

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभाAurangabadऔरंगाबाद