शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

रिपाइं (ए)ला भाजपकडून १६ ते १८ जागा मिळतील, सेनेनेही जागा द्यायला हव्यात : अविनाश महातेकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 18:57 IST

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेलाही आमचा फायदा झालाच आहे.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांचा भरवसा वाढला...‘संविधान बदलणार’ या आवईपासून सावधान

औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून रिपाइं (ए)ला १६ ते १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेलाही आमचा फायदा झालाच आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातूनही आम्हाला जागा मिळायला पाहिजे, असा आग्रह  महाराष्ट्राचे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी धरला. 

मंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच ते औरंगाबादला आले होते. सकाळपासूनच सुभेदारी गेस्ट हाऊस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा येथे त्यांनी विविध योजनांच्या आढावा बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. 

त्यांनी सांगितले की, ८ जुलै रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत किती जागा मिळतील, संभाव्य उमेदवार कोण, अशी चर्चा झाली. भाजपच्या कोट्यातून आम्हाला १६ ते १८ जागा मिळतील. विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचा काय परिणाम राहील, असे विचारता महातेकर यांनी स्पष्टपणे सांगितले, लोकसभा निवडणुकीत झाला तसाच परिणाम होईल. 

आरक्षणाबद्दल विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना त्यांनी सांगितले, आरक्षण हे आर्थिक निकषावर देण्याची तरतूद असायला हवी. मराठा आरक्षणाला तर आमचा पूर्वीपासूनच पाठिंबा होता. धनगर व मुस्लिम आरक्षणही मिळायला पाहिजे. पण सर्वांना सोबत आणण्यासाठी आर्थिक निकषावर आरक्षण देता आले पाहिजे. 

कार्यकर्त्यांचा भरवसा वाढला...रिपाइंला मंत्रीपद मिळत नाही, या धारणेला मी मंत्री झाल्यामुळे तडा बसला आहे. यावेळी रामदास आठवले यांना मंत्री करा, अशी मागणी करण्याची वेळ आली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असून, भरवसा वाढला आहे.  त्यामुळे भाजपचे मी अभिनंदन  करतो, असे उद्गार महातेकर यांनी काढले. 

‘संविधान बदलणार’ या आवईपासून सावधानसंविधान बदलणार, असे सांगून घाबरविणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला सत्काराला उत्तर देताना महातेकर यांनी दिला. संविधान कोण बदलणार, कसे बदलणार, या प्रश्नाचे उत्तर कुणी देत नाही. संविधानात छोटे-मोठे बदल होतात; पण ते संवैधानिक मार्गानेच. ज्या दिवशी संविधान बदलेल, त्यादिवशी तुम्ही अमेरिकेचा गुलाम बनून जाल, असा इशाराही त्यांनी दिला. 

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभाAurangabadऔरंगाबाद