शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

रस्ते मोकळे केले, आता घोडे अडले कुठे ? लोकप्रतिनिधी व स्थानिकांना बायपास सर्व्हिस रोडचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:24 PM

सर्व्हिस रोडसाठी निवडणुकीच्या तोंडावर सर्वजण उतरले.

ठळक मुद्देअतिक्रमण काढण्यात आलेले असल्याने  रस्ता मोठा दिसतो. परंतु, वाहने तर डांबरी रस्त्यावरूनच ये-जा करतात.

औरंगाबाद : बायपासवरील अपघाताच्या घटनांमुळे सर्व्हिस रोडचा विषय समोर आला आहे. त्यामुळे अडसर ठरणाऱ्या मालमत्ता हटविण्यात आल्या. त्यानंतर सर्व्हिस रोडचा लोकप्रतिनिधी व स्थानिकांना विसर पडलेला दिसत आहे. 

बायपासवर जड वाहनांची वर्दळ जास्त असून वाळूज, शेंद्रा,  पैठण, नगर, पुणे, मुंबईकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात आहे. गृहिणी, विद्यार्थी, शिक्षक, कामगार, उद्योजकासह व्यावसायिकांचा या रस्त्याने बळी घेतलेला आहे. आंदोलनाची प्रखरता पाहून पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन सर्व्हिस रोड मोकळा करण्यासाठी पावले उचलली. मनपाने पोलीस बंदोबस्तात रस्त्यात अडसर ठरणारी बांधकामे काढली. ही कारवाई वर्षभर टप्प्याटप्प्यात सुरूच राहिली.

सर्व्हिस रोडसाठी निवडणुकीच्या तोंडावर सर्वजण उतरले. आता अतिक्रमण काढण्यात आलेले असल्याने  रस्ता मोठा दिसतो. परंतु, वाहने तर डांबरी रस्त्यावरूनच ये-जा करतात. जड वाहनांचा ताफा सुरू झाला की, दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना आजही रस्ता पार करणे अत्यंत जिकिरीचे ठरत आहे. मोकळ्या रस्त्यावर फळविक्रेते, मोकळी वाहने, चहा, पानाचे ठेले हळूहळू आपले बस्तान मांडताना दिसत आहेत. रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याचे सांगितले जाते मग कामाचा विसर का पडलेला आहे. याचे कोेडे नागरिकांना उलगडलेले नाही. मनपाचे अतिक्रमण हटाव पथक देवळाई चौकापासून ते महानुभाव चौकापर्यंत फेरफटका मारते. ही अवस्था अजून किती दिवस राहणार, असा सवाल  उपस्थित होत आहे. 

- दोन्ही बाजूला वस्त्या, नागरिकांची परवड, - रस्त्यावरील विद्युत खांब हटविले- मोकळ्या जागेवर वाहने व चहाचे ठेले- जड वाहनांच्या वर्दळीतून जीव मुठीत धरून काढावा लागतो मार्ग- शाळा बंद असल्याने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची गर्दी टळली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडी