शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

महिलांना टाइप- २ मधुमेहाचा धोका; कारण काय? लक्षणे कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 18:50 IST

वजन जास्त असल्याने शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्यप्रकारे प्रतिसाद देत नाहीत, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

छत्रपती संभाजीनगर : एखाद्या समारंभात ‘मी गोड खाणे बंद केले आहे, शुगर आहे,’ असे कोणाकडून तरी हमखास ऐकण्यात येते. महिलांना टाइप-२ मधुमेहाचा धोका असतो. विशेषत: जास्त वजन असल्यास हा धोका अधिक असतो. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासह आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात केली पाहिजे, असा सल्ला मधुमेहतज्ज्ञांनी दिला.

काय आहे टाइप- २ मधुमेह?रक्तातील साखरेचे प्रमाण जेव्हा मर्यादेपेक्षा जास्त वाढते, तेव्हा त्यास मधुमेह म्हणतात. टाइप- २ मधुमेह हा अयोग्य जीवनशैलीमुळे होतो. यात शरीरात इन्सुलिनचे काम नीट होत नाही व इन्सुलिनचा स्राव कमी प्रमाणात होतो.

कारणे काय?वजन जास्त असल्याने शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्यप्रकारे प्रतिसाद देत नाहीत, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. अनियमित आहार, जास्त प्रमाणात साखर आणि चरबीयुक्त पदार्थांचे सेवन, तसेच शारीरिक व्यायामाचा अभाव हे मधुमेहाचे जोखमीचे घटक आहेत. अनुवांशिकता, कमी झोप, उच्च रक्तदाब आदींमुळेही टाइप-२ मधुमेह होतो.

लक्षणे काय?वारंवार लघवीस जावे लागणे, मूत्रमार्गावर जंतुसंसर्ग होणे, खूप भूक लागणे, वजन कमी होणे, जखम बरी न होणे, अंगाला खाज येणे आदी लक्षणे टाइप-२ मधुमेहात दिसतात. मधुमेहामुळे गर्भावस्थेत गुंतागुंत होऊ शकते. मधुमेहामुळे बाळाची नीट वाढ न होणे, रक्तदाब वाढणे, बाळाचे वजन जास्त झाल्यामुळे सिझेरियन करावे लागणे इत्यादी त्रास होऊ शकतात.

काय काळजी घ्याल?महिलांनी स्वतःचे आरोग्य टिकवून ठेवण्याची त्रिसूत्री म्हणजे योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार. रक्तातील लोहाचे, जीवनसत्त्वांचे व इतर घटकांचे (आयोडिन, मग्नेशिअम, कॅल्शिअम) प्रमाण योग्य राहण्यासाठी सर्व पालेभाज्या, मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी, डाळी, ऋतुमानाप्रमाणे मिळणाऱ्या फळभाज्या, परवडणारी फळे, सुकामेवा, दूध यांचा आहारात समावेश असावा.

योग्य जीवनशैली हवीमहिलांनी योग्य जीवनशैली आत्मसात करून शक्यतो आरोग्याच्या समस्या होऊ न देणेच चांगले. झाल्यास त्या लवकरात लवकर नियंत्रित करणे गरजेचे आहे. उष्मांक वापरून होणारे व्यायाम जसे की, चालणे, पळणे, खेळणे इत्यादी रोज साधरणत: चाळीस मिनिटे करावे. त्यानंतर योगासने व प्राणायम करावा. मांसपेशींना बळकट करणारे व्यायाम आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस करावेत.- डॉ. मयुरा काळे, अध्यक्ष, मधुमेहतज्ज्ञ संघटना, छत्रपती संभाजीनगर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादdiabetesमधुमेहHealthआरोग्य