शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कानाची काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगरात महिन्याला शंभरावर लोकांची श्रवणशक्ती होते गायब

By संतोष हिरेमठ | Updated: June 27, 2024 13:55 IST

कानाचे आरोग्य धोक्यात, गायिका अलका याज्ञिक यांची श्रवणशक्ती गेल्यानंतर एकच चर्चा

छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वीच चार दशकांपासून आपल्या सुमधुर गायकीने रसिकांवर मोहिनी घालणाऱ्या पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांची अचानकपणे श्रवणशक्ती गेल्याचे समोर आले. त्यामुळे याविषयी एकच चर्चा सुरू आहे. मात्र, शहरात महिन्याला शंभरावर लोकांची श्रवणशक्ती अचानक गायब होते. ‘व्हायरल इन्फेक्शन’सह काही इतर कारणांनी असे होते, शिवाय सतत हेडफोन, इअरफोन वापरत असाल आणि तेही मोठ्या आवाजात तर त्याचा वापर कमी करावा, आवाज कमी ठेवावा. नाही तर बहिरेपणा येण्याचा धोका नाकारता येत नाही, असे कान-नाक-घसा तज्ज्ञ म्हणाले.

अगदी ध्यानिमनी नसताना अचानक एका किंवा काही वेळा दोन्ही कानांची ऐकू येण्याची क्रिया बंद पडते. शास्त्रीय भाषेत या आजाराला ‘ सडन सेन्सोरी न्यूरल हेअरिंग लाॅस’ असे नाव आहे. सध्या प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना झालेल्या या आजारामुळे सर्वत्र याची चर्चा सुरू आहे. ‘लोकमत’ने विविध कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे गेल्या महिनाभरात अचानक बहिरेपणा आलेल्या रुग्णांची संख्या जाणून घेतली, तेव्हा ही आकडेवारी चिंतादायक असल्याचे समोर आले. अचानक बहिरेपणा येणे हा आजार दुर्मीळ नसून, बऱ्याच रुग्णांमध्ये आढळतो, असेही कान-नाक-घसा तज्ज्ञांनी सांगितले.

शहरात कान-नाक-घसा तज्ज्ञ- ६५

१०० पैकी ३० टक्के रुग्णांना हेडफोन, इअरफोनचे दुखणेकोरोना प्रादुर्भावानंतर कानाचे दुखणे घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढल्याचे कान-नाक-घसा तज्ज्ञांनी नमूद केले. वर्क फ्राॅम होममध्ये आणि त्यानंतरही वाढलेला हेडफोनचा वापर, मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने, तसेच वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळेही बहिरेपणा वाढत आहे. शहरातील ईएनटी तज्ज्ञांकडे येणाऱ्या शंभर रुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण हे हेडफोन, इअरफोनचे दुखणे घेऊन येत आहेत.

का होते असे?अनेक प्रकारचे विषाणू, तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, वयोमानानुसार येणाऱ्या बहिरेपणासह ‘डीजे’च्या खूप मोठ्या आवाजाने, हेडफोन लावून सतत मोठा आवाज कानावर पडत राहिल्याने आणि अशा आणखी काही कारणांनी ही व्याधी उद्भवते.

इमर्जन्सी उपचार आवश्यकज्याप्रमाणे हृदयविकार किंवा अर्धांगवायू या आजारामध्ये इमर्जन्सी उपचार आवश्यक असतात. त्याचप्रमाणे, अचानक उद्भवलेल्या बहिरेपणामध्येही गरजेचे असते. सुरुवातीला दिलेल्या या उपचाराने फायदा न झालेल्या रुग्णांना श्रवणयंत्र, ‘काॅक्लिअर इम्प्लांट’सारख्या शस्त्रक्रियांचा पर्याय उपलब्ध आहे. अचानक आलेल्या बहिरेपणाचे निदान केल्यानंतर जितक्या लवकर उपचार सुरू होतील, तितका त्याचा जास्तीतजास्त फायदा होतो.- डाॅ.रमेश राेहिवाल, माजी राज्य अध्यक्ष, कान-नाक-घसा तज्ज्ञ संघटना.

घाटीत महिन्याला ५ ते ६ रुग्णकान-नाक-घसा विभागात महिन्याला अचानक बहिरेपणा आलेले ५ ते ६ रुग्ण येतात. बहुतेक वेळा ‘व्हायरल इन्फेक्शन’मुळे असे होते. योग्य वेळी स्टिरॉइड्स आणि प्रतिजैविकांनी उपचार केल्यास श्रवणशक्ती पुन्हा मिळू शकते.- डाॅ.सुनील देशमुख, कान-नाक-घसा विभागप्रमुख, घाटी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealth Tipsहेल्थ टिप्स