शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

'हरित' महाराष्ट्रासाठी पुढचे पाऊल; राज्यातील रिक्षा आता ‘सोलार’वर धावणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 18:05 IST

महाविकास आघाडी सरकारचे मोठे पाऊल

औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्यात रिक्षाचालक, मालकांवर मोठे संकट कोसळले होते. या संकटाला तोंड देत आता त्यांचा उदरनिर्वाह पूर्ववत होत आहे. सरकारने लॉकडाऊनमध्ये ७ लाखांहून अधिक रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये दिले. वाढत्या इंधन दरवाढीमुळे रिक्षाचालक वर्ग मेटाकुटीला आला आहे. त्यातून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मोठे पाऊल उचलले. राज्यातील काही रिक्षा सोलार एनर्जीवर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. पायलट प्रोजेक्ट म्हणून पुणे, औरंगाबादेत काही रिक्षा सोलारमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. मात्र, भाड्यात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले. त्यातच लॉकडऊनमुळे अनेक रिक्षाचालक, मालकांचे आर्थिकरीत्या कंबरडे मोडले. पोटाची खळगी कशी भागवावी, असा प्रश्नही आजही त्यांना भेडसावतोय. रिक्षाचालकांसाठी काहीतरी ठोस केले पाहिजे ही कल्पना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्यातील ७ लाख १५ हजार रिक्षाचालकांना प्रत्येकी १५ हजार रुपये देण्याचा निर्णय झाला. रिक्षाचालकांच्या बँक खात्यात १०७ कोटी रुपये जमाही करण्यात आले.

पेट्रोल-डिझेलवरील रिक्षा आता परवडत नाहीत. दिवसभर मेहनत करूनही १०० ते २०० रुपयेही शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे सरकारने राज्यातील काही रिक्षा सोलारवर चालविण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी येणारा खर्च राज्य शासन काही प्रमाणात उचलणार आहे. रिक्षाचालकांना काही भार उचलावा लागेल. त्यातही सबसिडी दिली जाईल. कायमस्वरूपी रिक्षा सोलारवर धावणार आहे. हवेचे प्रदूषण कमी करण्यातही मोठा हातभार लागेल, असे शासनाला वाटत आहे.

औरंगाबाद, पुण्याची निवडऔरंगाबाद शहरात साधारणपणे १३ हजारांपेक्षा अधिक रिक्षा रेकॉर्डवर आहेत. त्यातील किमान ५ हजार रिक्षा सोलारवर चालविण्याचा मानस आहे. पुणे शहरात रिक्षांची संख्या ८७ हजारांहून अधिक आहे. त्यातील १४ हजारांहून अधिक रिक्षा सोलारवर करण्यात येतील. हा पायलट प्रोजेक्ट आहे. सध्या पेट्रोल-डिझेलवर जेवढे प्रवासी नेता येतात तेवढेच प्रवासी सोलारवरही नेता येतील. रिक्षाची वहन क्षमता कमी होणार नाही.- आस्तिककुमार पाण्डेय, सीईओ स्मार्ट सिटी, औरंगाबाद.

टॅग्स :environmentपर्यावरणAurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्र