भाताची गोडी वाढली, वरण बेचव बनले
By Admin | Updated: January 7, 2015 01:06 IST2015-01-07T00:47:12+5:302015-01-07T01:06:09+5:30
औरंगाबाद : यंदा वर्षभराचा बासमती तांदूळ खरेदी केला असे कोणी म्हटले तर आपल्या भुवया उंचाविण्याची गरज नाही. कारण, बासमती सध्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल या दरात विकला जात आहे.

भाताची गोडी वाढली, वरण बेचव बनले
औरंगाबाद : यंदा वर्षभराचा बासमती तांदूळ खरेदी केला असे कोणी म्हटले तर आपल्या भुवया उंचाविण्याची गरज नाही. कारण, बासमती सध्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल या दरात विकला जात आहे. मात्र, डाळींचे भाव कडाडल्याने त्या खरेदीसाठी खिसा सैल करावा लागणार आहे.
मागील तीन वर्षांपासून बासमतीच्या दराने किलोमागे शंभरी गाठल्याने बासमती श्रीमंतांचा तांदूळ बनला होता. मात्र, यंदा इराण, इराकमधून बासमतीची आयातच बंद झाल्याने उच्च प्रतीचा बासमती ग्रामीण भागापर्यंत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
बासमतीचे दर एवढे गडगडले की, सेला बासमती ३२ रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. मागील वर्षी १३० रुपयांत विक्री झालेला पंजाब व हरियाणातील शुद्ध बासमती सध्या ९० रुपये किलोने विकला जात आहे. राजस्थानचा बासमती ७० रुपयांवरून ४० रुपयांपर्यंत खाली उतरला आहे. ९५ रुपये विक्री होणारा पुसा बासमती सध्या ६० किलोने विक्री होत
आहे.
बासमतीचे दर घसरल्याने अन्य तांदळांचे भावही कमी झाले. किलोमागे १५ ते २० रुपयांपर्यंत कमी होऊन अंबेमोहर ४५ ते ५० रुपये, काली मूँछ ४५ ते ५० रुपये, कोलम ४४ ते ४८ रुपये प्रतिकिलो विकला जात आहे.
तांदळाचे व्यापारी जगदीश भंडारी यांनी सांगितले की, तांदळाच्या ५० पेक्षा अधिक व्हरायटी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. ३२ ते ९० रुपयांदरम्यान बासमती मिळत असल्याने ग्राहक अंबेमोहर, कोलम, काली मूँछऐवजी बासमती
खरेदी करणे पसंत करीत
आहेत.