शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

महसूल आणि गृह विभाग लाचखोरीत पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:34 IST

‘न खाऊंगा, न खाने दूँगा’, अशी घोषणा पंतप्रधानांनी दिली असली तरी तिची अंमलबजावणी किती कठीण आहे, याचा प्रत्यय लाचखोरीच्या गुन्ह्यांवरून येतो. मागील सात महिन्यांत तब्बल ६९९ लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात अटक केली आहे. विशेष म्हणजे राज्यात उत्पन्नाच्या बाबतीत सर्वात पुढे असलेल्या महसूल विभागाने लाचखोरीतही अव्वल क्रमांक मिळविला आहे. शिवाय गुन्हेगारीला आळा घालण्याची आणि लाचखोरांना पकडण्याची जबाबदारी असलेल्या गृह विभागाचा दुसरा क्रमांक आहे.

ठळक मुद्देसात महिन्यांत ६९९ लाचखोर जाळ्यात; राज्यात ५२६ सापळे

बापू सोळुंकेऔरंगाबाद : ‘न खाऊंगा, न खाने दूँगा’, अशी घोषणा पंतप्रधानांनी दिली असली तरी तिची अंमलबजावणी किती कठीण आहे, याचा प्रत्यय लाचखोरीच्या गुन्ह्यांवरून येतो. मागील सात महिन्यांत तब्बल ६९९ लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात अटक केली आहे. विशेष म्हणजे राज्यात उत्पन्नाच्या बाबतीत सर्वात पुढे असलेल्या महसूल विभागाने लाचखोरीतही अव्वल क्रमांक मिळविला आहे. शिवाय गुन्हेगारीला आळा घालण्याची आणि लाचखोरांना पकडण्याची जबाबदारी असलेल्या गृह विभागाचा दुसरा क्रमांक आहे.पकडण्यात आलेल्या लाचखोरांमध्ये वर्ग १ च्या २४, तर वर्ग २ च्या ५७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या आरोपींना पकडल्यामुळे १ कोटी २१ लाख ३६ हजार ३३५ रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी लाचखोरांवरील कारवाईचे प्रमाण पाच टक्क्यांनी अधिक आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद, मुंबई, नाशिक, पुणे, अमरावती, नांदेड आणि नागपूर आदी ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची परिक्षेत्रीय कार्यालये आहेत. पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी प्रत्येक परिक्षेत्राचा प्रमुख असतो. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्याच्या ठिकाणीही अधिकारी कार्यरत असतात. प्राप्त माहितीनुसार १ जानेवारी ते १ आॅगस्टदरम्यान राज्यात तब्बल ५२६ तक्रारी राज्यातील विविध कार्यालयांत दाखल झाल्या होत्या. या तक्रारीनुसार अधिकाऱ्यांनी सापळे रचले. या कारवाईत लाच घेताना ६९९ सरकारी अधिकारी, कर्मचाºयांना आणि त्यांच्या पंटर्सना लाचेच्या रकमेसह रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. लाचखोरीमध्ये महसूल विभाग नेहमीप्रमाणे अव्वल असल्याचे समोर आले आहे. सात महिन्यांत महसूल, भूमी अभिलेख आणि नोंदणी विभागातील तब्बल १७० जणांना लाच प्रकरणात अटक झाली. यात वर्ग १ चे पाच, तर वर्ग दोनचे सात अधिकारी आहेत. या आरोपींना पकडल्यामुळे १ कोटी २१ लाख ३६ हजार ३३५ रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे.बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी १८ अटकेतशासकीय पदावर कार्यरत असताना मिळणाºया उत्पन्नापेक्षा वरकमाई करणाºया अधिकारी, कर्मचाºयांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली जाते. या चौकशीत बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी १८ जणांविरोधात ११ गुन्ह्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नोंद करण्यात आली. याशिवाय अन्य भ्रष्टाचार प्रकरणांतील चार गुन्हे नोंदवून पोलिसांनी १० जणांना अटक केली.बडतर्फीच्या इशाºयानंतरही पोलीस दुसºया क्रमांकावरलाच घेताना पकडल्यानंतर पोलीस कर्मचाºयांवर थेट बडतर्फीची कारवाई करण्याचा इशारा राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिला होता. या इशाºयानंतरही हे खाते राज्यात लाचखोरीमध्ये दुसºया क्रमांकावर असल्याचे समोर आले. सात महिन्यांच्या कालावधीत राज्यातील १६० पोलिसांना लाच घेताना पकडण्यात आले. यात वर्ग एक आणि दोनचे प्रत्येकी सात अधिकारी आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग