शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

महसूल आणि गृह विभाग लाचखोरीत पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:34 IST

‘न खाऊंगा, न खाने दूँगा’, अशी घोषणा पंतप्रधानांनी दिली असली तरी तिची अंमलबजावणी किती कठीण आहे, याचा प्रत्यय लाचखोरीच्या गुन्ह्यांवरून येतो. मागील सात महिन्यांत तब्बल ६९९ लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात अटक केली आहे. विशेष म्हणजे राज्यात उत्पन्नाच्या बाबतीत सर्वात पुढे असलेल्या महसूल विभागाने लाचखोरीतही अव्वल क्रमांक मिळविला आहे. शिवाय गुन्हेगारीला आळा घालण्याची आणि लाचखोरांना पकडण्याची जबाबदारी असलेल्या गृह विभागाचा दुसरा क्रमांक आहे.

ठळक मुद्देसात महिन्यांत ६९९ लाचखोर जाळ्यात; राज्यात ५२६ सापळे

बापू सोळुंकेऔरंगाबाद : ‘न खाऊंगा, न खाने दूँगा’, अशी घोषणा पंतप्रधानांनी दिली असली तरी तिची अंमलबजावणी किती कठीण आहे, याचा प्रत्यय लाचखोरीच्या गुन्ह्यांवरून येतो. मागील सात महिन्यांत तब्बल ६९९ लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात अटक केली आहे. विशेष म्हणजे राज्यात उत्पन्नाच्या बाबतीत सर्वात पुढे असलेल्या महसूल विभागाने लाचखोरीतही अव्वल क्रमांक मिळविला आहे. शिवाय गुन्हेगारीला आळा घालण्याची आणि लाचखोरांना पकडण्याची जबाबदारी असलेल्या गृह विभागाचा दुसरा क्रमांक आहे.पकडण्यात आलेल्या लाचखोरांमध्ये वर्ग १ च्या २४, तर वर्ग २ च्या ५७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या आरोपींना पकडल्यामुळे १ कोटी २१ लाख ३६ हजार ३३५ रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी लाचखोरांवरील कारवाईचे प्रमाण पाच टक्क्यांनी अधिक आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद, मुंबई, नाशिक, पुणे, अमरावती, नांदेड आणि नागपूर आदी ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची परिक्षेत्रीय कार्यालये आहेत. पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी प्रत्येक परिक्षेत्राचा प्रमुख असतो. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्याच्या ठिकाणीही अधिकारी कार्यरत असतात. प्राप्त माहितीनुसार १ जानेवारी ते १ आॅगस्टदरम्यान राज्यात तब्बल ५२६ तक्रारी राज्यातील विविध कार्यालयांत दाखल झाल्या होत्या. या तक्रारीनुसार अधिकाऱ्यांनी सापळे रचले. या कारवाईत लाच घेताना ६९९ सरकारी अधिकारी, कर्मचाºयांना आणि त्यांच्या पंटर्सना लाचेच्या रकमेसह रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. लाचखोरीमध्ये महसूल विभाग नेहमीप्रमाणे अव्वल असल्याचे समोर आले आहे. सात महिन्यांत महसूल, भूमी अभिलेख आणि नोंदणी विभागातील तब्बल १७० जणांना लाच प्रकरणात अटक झाली. यात वर्ग १ चे पाच, तर वर्ग दोनचे सात अधिकारी आहेत. या आरोपींना पकडल्यामुळे १ कोटी २१ लाख ३६ हजार ३३५ रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे.बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी १८ अटकेतशासकीय पदावर कार्यरत असताना मिळणाºया उत्पन्नापेक्षा वरकमाई करणाºया अधिकारी, कर्मचाºयांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली जाते. या चौकशीत बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी १८ जणांविरोधात ११ गुन्ह्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नोंद करण्यात आली. याशिवाय अन्य भ्रष्टाचार प्रकरणांतील चार गुन्हे नोंदवून पोलिसांनी १० जणांना अटक केली.बडतर्फीच्या इशाºयानंतरही पोलीस दुसºया क्रमांकावरलाच घेताना पकडल्यानंतर पोलीस कर्मचाºयांवर थेट बडतर्फीची कारवाई करण्याचा इशारा राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिला होता. या इशाºयानंतरही हे खाते राज्यात लाचखोरीमध्ये दुसºया क्रमांकावर असल्याचे समोर आले. सात महिन्यांच्या कालावधीत राज्यातील १६० पोलिसांना लाच घेताना पकडण्यात आले. यात वर्ग एक आणि दोनचे प्रत्येकी सात अधिकारी आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग